शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारने दिल्ली स्फोटाला दहशतवादी घटना मानले; चौकशीचे दिले आदेश
2
डोक्यात गोळी झाडून मित्रांकडून व्यावसायिकाचा खून; दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडमुखवाडी येथील घटना
3
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
4
Video : ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
5
१५ लाखांची लाच स्विकारताच न्यायाधीशांना कॉल अन्... न्याय देणारे न्यायाधीशच अडकले लाच प्रकरणात!
6
राहुल बनून खुशबूला भुलवलं, लग्न करण्यासाठी धर्म बदलण्याचा दबाव टाकला! कासिमने अखेर तोंड उघडलं
7
देसी गर्ल इज बॅक! 'ग्लोबेट्रोटर'मध्ये 'मंदाकिनी'च्या भूमिकेत प्रियंका चोप्रा, फर्स्ट लूक पाहून चाहते थक्क
8
IPL 2026 Trade Deal : अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्स संघातून OUT? 'ऑल कॅश ट्रान्सफर डील' चर्चेत
9
‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली पावणेतीन कोटींची फसवणूक; सहा संशयिताना बेड्या
10
Delhi Blast : ६ डिसेंबरला मोठ्या हल्ल्याची होती तयारी, पण १० नोव्हेंबरला झाला स्फोट; 'डॉक्टर ऑफ टेरर'चा भयानक कट असा झाला अयशस्वी
11
तुम्ही मित्र-मैत्रिणींशी बोलता अन् लगेच त्याच संदर्भात जाहिराती दिसू लागतात; खरंच तुमचा फोन तुमचं बोलणं ऐकतो?
12
धक्कादायक! झिरकपूर उड्डाणपुलावर 'VIP' एस्कॉर्टचा अहंकार; कारने निवृत्त लेफ्टनंट जनरलच्या गाडीला ठोकले, तसेच पळाले...
13
बिहारमध्ये लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक...
14
Ratnagiri: 'माझ्या पत्नीला भुताने नेऊन मारले,' पतीचा कट पडला उघडा, न्यायालयाने दिली मोठी शिक्षा
15
लग्नातच झाली बैठक, डॉ. आदिल राठर कसा सापडला, त्याच्या काय होती जबाबदारी? इनसाईड स्टोरी
16
"धनंजय मुंडेंना चौकशीला आणा! नाहीतर महागात पडेल!" जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा
17
Bihar Exit Poll : 'बिहार'मधील मागील निवडणुकीतील एक्झिट पोल खरे ठरले? काय होते अंदाज, काय होता निकाल, जाणून घ्या
18
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
19
तीन मुलांची आई प्रेमात पडली, बॉयफ्रेंडला म्हणाली 'माझ्या नवऱ्याला गोळ्या घाल'; मग पुढे जे झालं...
20
६ डॉक्टर, २ मौलवी अन् १८ अटकेत; दिल्ली स्फोटामागे कोण कोण होते, किती जण अजून फरार?

दुष्काळाचा जीआर म्हणजे जनतेची घोर फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2018 00:09 IST

शासनाने काल काढलेला दुष्काळाचा जीआर म्हणजे जनतेची घोर फसवणूक आहे. दुष्काळच्या बाबतीत कसलीही आर्थिक तरतूद न करता केवळ घोषणा करून जनतेची घोर फसवणूक करण्याचे काम फडणवीस सरकार करीत आहे. फडवणीस यांना सरकार चालवता येत नसल्याने ते रोज नवा निर्णय घेतात व पुन्हा रद्द करतात, असा आरोप काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केला.

ठळक मुद्देअशोक चव्हाण यांची टीका : अंबाजोगाईत काँग्रेस पक्षाची जनसंघर्ष यात्रा

लोकमत न्यूज नेटवर्कअंबाजोगाई : शासनाने काल काढलेला दुष्काळाचा जीआर म्हणजे जनतेची घोर फसवणूक आहे. दुष्काळच्या बाबतीत कसलीही आर्थिक तरतूद न करता केवळ घोषणा करून जनतेची घोर फसवणूक करण्याचे काम फडणवीस सरकार करीत आहे. फडवणीस यांना सरकार चालवता येत नसल्याने ते रोज नवा निर्णय घेतात व पुन्हा रद्द करतात, असा आरोप काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केला.अंबाजोगाईत काँग्रेस पक्षाच्या जनसंघर्ष यात्रेत प्रमुख मार्गदर्शक म्हणून अशोक चव्हाण बोलत होते.ते म्हणाले, राज्यावर दुष्काळाची छाया पसरलेली असतांना शासन केवळ घोषणाबाजी करत आहे. महाराष्ट्रात आजपर्यंत गंभीर, मध्यम, अशी दुष्काळाची वर्गवारी कधीच अस्तित्वात नव्हती. ज्याला कामच करायचे नाही ते वर्गवारी करीत जनतेची दिशाभूल करू लागले आहेत. महाराष्ट्राचे मंत्री रात्री जाऊन मोबाईलच्या प्रकाशात दुष्काळाची पाहणी करून जनतेची टिंगल करू लागले आहेत. कर्जमाफीतही शेतकऱ्यांचा भ्रमनिरास झाला आहे. झोपेचे सोंग घेतलेल्या सरकारला हलविण्याचे काम जनसंघर्ष यात्रेच्या माध्यमातून सुरू असल्याचे चव्हाण यांनी ठणकावून सांगितले.यावेळी माजी खा. रजनी पाटील, माजी मंत्री सुरेश नवले, प्रा. टी. पी. मुंडे, डॉ. अंजली घाडगे यांची भाषणे झाली. प्रास्ताविक राजकिशोर मोदी यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सत्संग मुंडे यांनी केले. अ‍ॅड. विष्णूपंत सोळंकी यांनी आभार मानले. या जनसंघर्ष यात्रेस महिला व कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. मेडीकल कॉलेजपासून निघालेली जनसंघर्ष यात्रा व मोटारसायकल रॅली शहरातून निघाली होती. या यात्रेचा समारोप वंजारी वसतिगृहाच्या मैदानावर भव्य सभेने झाला.भाजपा म्हणजे केवळ घोषणांचा कारखानाचव्हाण म्हणाले, अच्छे दिन कभी नहीं आते हे खुद्द गडकरी यांनीच मान्य केले आहे. सरकारमधील आमदार, मंत्रीही जनतेशी नीट वागत नाहीत. ‘बेटी बचाव’ चा नारा देणाºया या सामाजिक विषमता निर्माण करू व्होट बँक ताब्यात घेण्याचा प्रयत्न भाजपा करत आहे. आता राम मंदिराचा प्रश्न निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर समोर आला आहे. तर धर्माच्या नावावर अत्याचार करणारे सनातन,भिडे, एकबोटे यांच्यावर अद्यापही कारवाई झालेली नाही. मराठा आरक्षण, मुस्लिम आरक्षण या संदर्भात कसलाही ठोस निर्णय झाला नाही. पाण्यावरून आज जिल्ह्याजिल्ह्यात वाद निर्माण होत आहेत. शासनाने जीआरप्रमाणे पाणीवाटप करावे, पाणी पेटविण्याचे काम सरकारने करू नये, असे ते म्हणाले.पालकमंत्री अदृश्य, बॅटरीच्या उजेडात दुष्काळ पाहणीअशोक चव्हाण म्हणाले, राज्यात गंभीर स्वरुपाचा दुष्काळ असतांना राज्याच्या ग्रामविकास व जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे या अमेरिकेत अदृश्य झाल्या आहेत. तर निलंगेकर दुष्काळाची पाहणी मोबाईल बॅटरीच्या उजेडात करू लागले आहेत. अशी जनतेची टिंगलटवाळी बंद करा.बीड लोकसभेसह विधानसभेच्या दोन जागा द्या- राजकिशोर मोदीकाँग्रेस व राकाँची आघाडी झाली तर बीड जिल्ह्यात लोकसभेची जागा व विधानसभेच्या दोन जागा काँग्रेस पक्षाला द्यावी, अशी मागणी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजकिशोर मोदी यांनी आपल्या प्रास्ताविकात केली. या मागणीला अशोक चव्हाणांनी दोनच नाही तर आणखी एक विधानसभेची जागा बीड जिल्ह्याला वाटाघाटीत मागण्यात येईल, असे जाहीर उत्तर दिले.वातावरण काँग्रेसमय होऊ लागले आहे - हर्षवर्धन पाटीलयेत्या काळामध्ये राज्यात परिवर्तन निश्चित असून वातावरण काँग्रेसमय होऊ लागले आहे. भाजप सरकारला शेतकºयांबद्दल कसलीही चिंता नसून, गेल्या साडेचार वर्षात शेतकरी संकटात लोटला गेला आहे. आगामी काळात बीड जिल्ह्यापासून बदलासाठी सुरुवात करा, असे आवाहन माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी सभेसाठी उपस्थित समुदायाला केले.मोदी - शहा म्हणजे रंगा - बिल्लाची जोडी !आपल्या भाषणात बोलताना माजी खा. रजनी पाटील म्हणाल्या, पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजप अध्यक्ष अमित शहा ही रंगा-बिल्लाची जोडी आहे. लोकसभागृहातही ते जोडीनेच बसतात. त्यांच्या खासदारातही या दोघांची दहशत असल्याने त्यांचे खासदारही जनतेच्या प्रश्नावर तोंड उघडायला तयार नाहीत.

टॅग्स :Beedबीडcongressकाँग्रेसAshok Chavanअशोक चव्हाण