शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
2
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
3
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
4
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
5
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
6
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
7
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
8
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
9
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
10
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
11
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
12
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
13
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
14
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
15
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
16
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
17
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
18
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
19
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
20
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल

दुष्काळाचा जीआर म्हणजे जनतेची घोर फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2018 00:09 IST

शासनाने काल काढलेला दुष्काळाचा जीआर म्हणजे जनतेची घोर फसवणूक आहे. दुष्काळच्या बाबतीत कसलीही आर्थिक तरतूद न करता केवळ घोषणा करून जनतेची घोर फसवणूक करण्याचे काम फडणवीस सरकार करीत आहे. फडवणीस यांना सरकार चालवता येत नसल्याने ते रोज नवा निर्णय घेतात व पुन्हा रद्द करतात, असा आरोप काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केला.

ठळक मुद्देअशोक चव्हाण यांची टीका : अंबाजोगाईत काँग्रेस पक्षाची जनसंघर्ष यात्रा

लोकमत न्यूज नेटवर्कअंबाजोगाई : शासनाने काल काढलेला दुष्काळाचा जीआर म्हणजे जनतेची घोर फसवणूक आहे. दुष्काळच्या बाबतीत कसलीही आर्थिक तरतूद न करता केवळ घोषणा करून जनतेची घोर फसवणूक करण्याचे काम फडणवीस सरकार करीत आहे. फडवणीस यांना सरकार चालवता येत नसल्याने ते रोज नवा निर्णय घेतात व पुन्हा रद्द करतात, असा आरोप काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केला.अंबाजोगाईत काँग्रेस पक्षाच्या जनसंघर्ष यात्रेत प्रमुख मार्गदर्शक म्हणून अशोक चव्हाण बोलत होते.ते म्हणाले, राज्यावर दुष्काळाची छाया पसरलेली असतांना शासन केवळ घोषणाबाजी करत आहे. महाराष्ट्रात आजपर्यंत गंभीर, मध्यम, अशी दुष्काळाची वर्गवारी कधीच अस्तित्वात नव्हती. ज्याला कामच करायचे नाही ते वर्गवारी करीत जनतेची दिशाभूल करू लागले आहेत. महाराष्ट्राचे मंत्री रात्री जाऊन मोबाईलच्या प्रकाशात दुष्काळाची पाहणी करून जनतेची टिंगल करू लागले आहेत. कर्जमाफीतही शेतकऱ्यांचा भ्रमनिरास झाला आहे. झोपेचे सोंग घेतलेल्या सरकारला हलविण्याचे काम जनसंघर्ष यात्रेच्या माध्यमातून सुरू असल्याचे चव्हाण यांनी ठणकावून सांगितले.यावेळी माजी खा. रजनी पाटील, माजी मंत्री सुरेश नवले, प्रा. टी. पी. मुंडे, डॉ. अंजली घाडगे यांची भाषणे झाली. प्रास्ताविक राजकिशोर मोदी यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सत्संग मुंडे यांनी केले. अ‍ॅड. विष्णूपंत सोळंकी यांनी आभार मानले. या जनसंघर्ष यात्रेस महिला व कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. मेडीकल कॉलेजपासून निघालेली जनसंघर्ष यात्रा व मोटारसायकल रॅली शहरातून निघाली होती. या यात्रेचा समारोप वंजारी वसतिगृहाच्या मैदानावर भव्य सभेने झाला.भाजपा म्हणजे केवळ घोषणांचा कारखानाचव्हाण म्हणाले, अच्छे दिन कभी नहीं आते हे खुद्द गडकरी यांनीच मान्य केले आहे. सरकारमधील आमदार, मंत्रीही जनतेशी नीट वागत नाहीत. ‘बेटी बचाव’ चा नारा देणाºया या सामाजिक विषमता निर्माण करू व्होट बँक ताब्यात घेण्याचा प्रयत्न भाजपा करत आहे. आता राम मंदिराचा प्रश्न निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर समोर आला आहे. तर धर्माच्या नावावर अत्याचार करणारे सनातन,भिडे, एकबोटे यांच्यावर अद्यापही कारवाई झालेली नाही. मराठा आरक्षण, मुस्लिम आरक्षण या संदर्भात कसलाही ठोस निर्णय झाला नाही. पाण्यावरून आज जिल्ह्याजिल्ह्यात वाद निर्माण होत आहेत. शासनाने जीआरप्रमाणे पाणीवाटप करावे, पाणी पेटविण्याचे काम सरकारने करू नये, असे ते म्हणाले.पालकमंत्री अदृश्य, बॅटरीच्या उजेडात दुष्काळ पाहणीअशोक चव्हाण म्हणाले, राज्यात गंभीर स्वरुपाचा दुष्काळ असतांना राज्याच्या ग्रामविकास व जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे या अमेरिकेत अदृश्य झाल्या आहेत. तर निलंगेकर दुष्काळाची पाहणी मोबाईल बॅटरीच्या उजेडात करू लागले आहेत. अशी जनतेची टिंगलटवाळी बंद करा.बीड लोकसभेसह विधानसभेच्या दोन जागा द्या- राजकिशोर मोदीकाँग्रेस व राकाँची आघाडी झाली तर बीड जिल्ह्यात लोकसभेची जागा व विधानसभेच्या दोन जागा काँग्रेस पक्षाला द्यावी, अशी मागणी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजकिशोर मोदी यांनी आपल्या प्रास्ताविकात केली. या मागणीला अशोक चव्हाणांनी दोनच नाही तर आणखी एक विधानसभेची जागा बीड जिल्ह्याला वाटाघाटीत मागण्यात येईल, असे जाहीर उत्तर दिले.वातावरण काँग्रेसमय होऊ लागले आहे - हर्षवर्धन पाटीलयेत्या काळामध्ये राज्यात परिवर्तन निश्चित असून वातावरण काँग्रेसमय होऊ लागले आहे. भाजप सरकारला शेतकºयांबद्दल कसलीही चिंता नसून, गेल्या साडेचार वर्षात शेतकरी संकटात लोटला गेला आहे. आगामी काळात बीड जिल्ह्यापासून बदलासाठी सुरुवात करा, असे आवाहन माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी सभेसाठी उपस्थित समुदायाला केले.मोदी - शहा म्हणजे रंगा - बिल्लाची जोडी !आपल्या भाषणात बोलताना माजी खा. रजनी पाटील म्हणाल्या, पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजप अध्यक्ष अमित शहा ही रंगा-बिल्लाची जोडी आहे. लोकसभागृहातही ते जोडीनेच बसतात. त्यांच्या खासदारातही या दोघांची दहशत असल्याने त्यांचे खासदारही जनतेच्या प्रश्नावर तोंड उघडायला तयार नाहीत.

टॅग्स :Beedबीडcongressकाँग्रेसAshok Chavanअशोक चव्हाण