शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
बीडच्या ‘सह्याद्री देवराई’ला भीषण आग; अभिनेते सयाजी शिंदे यांनी जोपासलेली हजारो झाडे संकटात
3
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
4
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
5
पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सक्षम ताटेची आई व प्रेयसीचा आत्मदहनाचा प्रयत्न, दिला निर्वाणीचा इशारा...
6
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
7
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
8
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
9
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
10
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
11
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
12
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
13
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
14
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
15
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
16
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
17
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
18
"आम्ही इंग्रजी आहोत का? इथे लंडनमधून राहायला आलोय का?" बावनकुळेंनी ठाकरे बंधूंना सुनावलं
19
IPL लिलावात अनसोल्डचा टॅग; त्याच पठ्ठ्यानं विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत विक्रमी द्विशतकासह रचला इतिहास
20
"भजन करायला थोडीच बसलोय, मठ पुरेसे आहेत...!"; हा श्लोक म्हणत CM योगी भरविधानसभेत कडाडले
Daily Top 2Weekly Top 5

प्राण्यांप्रमाणे शेतकऱ्यांप्रती सरकार संवेदनशील नाही : संभाजी ब्रिगेड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2018 17:43 IST

शेतकऱ्यांप्रती केवळ राजकारण केले जाते, असा आरोप संभाजी ब्रिगेडचे महासचीव सौरभ खेडेकर यांनी केला.

बीड : एका प्राण्यासाठी सर्व पक्ष एकत्र येतात. मात्र शेतकऱ्यांप्रती कोणीच पुढे येत नाही. प्राण्यांप्रमाणेच शेतकऱ्यांप्रती कोणीच संवेदनशिलता दाखवित नाहीत. केवळ राजकारण केले जाते, असा आरोप संभाजी ब्रिगेडचे महासचीव सौरभ खेडेकर यांनी केला.

संभाजी ब्रिगेडच्यावतीने संघटन वाढीसाठी खेडेकर यांच्या नेतृत्वाखाली राज्यभर दौरा केला जात आहे. मंगळवारी ते बीडमध्ये मेळाव्यासाठी आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी सरकारवर कडाडून टिका केली. मराठवाड्यात दौरा करीत असताना परिस्थिती अत्यंत विदारक दिसून येत आहे. दुष्काळी परिस्थिती असताना सरकारकडून दुष्काळसदृष्य असा शब्दप्रयोग केला जात आहे. एकीकडे शेतकरी आत्महत्या करीत असताना सरकार यावर काहीच उपाययोजना करीत नाही. प्राण्याच्या बाबतीत मात्र सर्वत्र आवाज उठविला जातो. विरोधकही यामध्ये मागे नाही. याच प्राण्याप्रमाणे शेतकऱ्यांप्रती सर्वांनी संवेदनशिलता दाखविली तर नक्कीच आधार मिळेल, असेही खेडेकर यांनी सांगितले. यावेळी बीड जिल्हाध्यक्ष राहूल वाईकर, सुधीर देशमुख, बालाजी जाधव, कपील डोके, सुदर्शन तरब, अशोक ठाकरे आदींची उपस्थिती होती.

... तर जल्लोष करू देणार नाहीमराठा समाजाला ओबीसीचा दर्जा द्यावा. हे सरकार खोटी माहिती देऊन तोंडाला पाने पुसण्याचे काम करीत आहे. हे सरकार मराठ्यांना आरक्षण देऊच शकत नाही. आरक्षणाचा मुद्दा दुर्लक्षित करण्यासाठी शहरांचे नामांतरण करण्याचे नवीन राजकारण सरकारकडून केले जात आहे. मात्र आम्हाला न्याय मिळाला नाही तर २०१९ साली कोणालाच जल्लोष करू देणार नाही, असा इशाराही सौरभ खेडेकर यांनी दिला.

युतीसाठी आॅफर आल्यामागील दोन वर्षांपासून संभाजी ब्रिगेड राजकारणात उतरले आहे. येणाऱ्या निवडणूका लढविण्यासाठी आम्हाला अनेक आॅफर आल्या. मात्र आताच त्यावर निर्णय घेणार नाहीत. ३० लोकसभा व १०० ठिकाणी विधानसभा निवडणूक लढविण्याचा आमचा संकल्प असल्याचे खेडेकर म्हणाले, तर बीडमध्येही लोकसभा व १ जागेवर विधानसभा लढविणार असल्याचे जिल्हाध्यक्ष राहूल वाईकर यांनी सांगितले.

टॅग्स :sambhaji brigadeसंभाजी ब्रिगेडState Governmentराज्य सरकारFarmerशेतकरी