शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

प्राण्यांप्रमाणे शेतकऱ्यांप्रती सरकार संवेदनशील नाही : संभाजी ब्रिगेड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2018 17:43 IST

शेतकऱ्यांप्रती केवळ राजकारण केले जाते, असा आरोप संभाजी ब्रिगेडचे महासचीव सौरभ खेडेकर यांनी केला.

बीड : एका प्राण्यासाठी सर्व पक्ष एकत्र येतात. मात्र शेतकऱ्यांप्रती कोणीच पुढे येत नाही. प्राण्यांप्रमाणेच शेतकऱ्यांप्रती कोणीच संवेदनशिलता दाखवित नाहीत. केवळ राजकारण केले जाते, असा आरोप संभाजी ब्रिगेडचे महासचीव सौरभ खेडेकर यांनी केला.

संभाजी ब्रिगेडच्यावतीने संघटन वाढीसाठी खेडेकर यांच्या नेतृत्वाखाली राज्यभर दौरा केला जात आहे. मंगळवारी ते बीडमध्ये मेळाव्यासाठी आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी सरकारवर कडाडून टिका केली. मराठवाड्यात दौरा करीत असताना परिस्थिती अत्यंत विदारक दिसून येत आहे. दुष्काळी परिस्थिती असताना सरकारकडून दुष्काळसदृष्य असा शब्दप्रयोग केला जात आहे. एकीकडे शेतकरी आत्महत्या करीत असताना सरकार यावर काहीच उपाययोजना करीत नाही. प्राण्याच्या बाबतीत मात्र सर्वत्र आवाज उठविला जातो. विरोधकही यामध्ये मागे नाही. याच प्राण्याप्रमाणे शेतकऱ्यांप्रती सर्वांनी संवेदनशिलता दाखविली तर नक्कीच आधार मिळेल, असेही खेडेकर यांनी सांगितले. यावेळी बीड जिल्हाध्यक्ष राहूल वाईकर, सुधीर देशमुख, बालाजी जाधव, कपील डोके, सुदर्शन तरब, अशोक ठाकरे आदींची उपस्थिती होती.

... तर जल्लोष करू देणार नाहीमराठा समाजाला ओबीसीचा दर्जा द्यावा. हे सरकार खोटी माहिती देऊन तोंडाला पाने पुसण्याचे काम करीत आहे. हे सरकार मराठ्यांना आरक्षण देऊच शकत नाही. आरक्षणाचा मुद्दा दुर्लक्षित करण्यासाठी शहरांचे नामांतरण करण्याचे नवीन राजकारण सरकारकडून केले जात आहे. मात्र आम्हाला न्याय मिळाला नाही तर २०१९ साली कोणालाच जल्लोष करू देणार नाही, असा इशाराही सौरभ खेडेकर यांनी दिला.

युतीसाठी आॅफर आल्यामागील दोन वर्षांपासून संभाजी ब्रिगेड राजकारणात उतरले आहे. येणाऱ्या निवडणूका लढविण्यासाठी आम्हाला अनेक आॅफर आल्या. मात्र आताच त्यावर निर्णय घेणार नाहीत. ३० लोकसभा व १०० ठिकाणी विधानसभा निवडणूक लढविण्याचा आमचा संकल्प असल्याचे खेडेकर म्हणाले, तर बीडमध्येही लोकसभा व १ जागेवर विधानसभा लढविणार असल्याचे जिल्हाध्यक्ष राहूल वाईकर यांनी सांगितले.

टॅग्स :sambhaji brigadeसंभाजी ब्रिगेडState Governmentराज्य सरकारFarmerशेतकरी