शहरं
Join us  
Trending Stories
1
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
2
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
3
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
4
महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
5
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकमा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
6
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
7
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
8
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
9
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
10
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
11
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश
12
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
13
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
14
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
15
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
16
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
17
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
18
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
19
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
20
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं

मराठा समाजाच्या भावना न समजणारे सरकार बालीश बुध्दीचे : धनंजय मुंडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2018 16:02 IST

या समाजाच्या आरक्षणाबाबत समाज भावना न समजणारे सरकार बालीश बुध्दीचे असल्याचा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला आहे.

ठळक मुद्दे आरक्षणासाठी ठोक मार्चाचा हा निर्णायक लढा आहे मात्र तो आपण शांततेच्या मार्गाने लढावा असे आवाहनही त्यांनी केले.

परळी (बीड ) : मराठा आरक्षणाबाबत दिलेल्या शब्दाला सरकार जागले नाही म्हणुनच समाजावर ठोक मोर्चा काढण्याची वेळ आली आहे. या समाजाच्या आरक्षणाबाबत समाज भावना न समजणारे सरकार बालीश बुध्दीचे असल्याचा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला आहे. आरक्षणासाठी ठोक मार्चाचा हा निर्णायक लढा आहे मात्र तो आपण शांततेच्या मार्गाने लढावा असे आवाहनही त्यांनी केले. 

मराठा आरक्षणासाठी मागील आठ दिवसापासुन परळी शहरात सुरू असलेल्या ठिय्या आंदोलनाला आज मुंडे यांनी भेट दिली. आंदोलकांशी चर्चा करतांना त्यांच्या मागण्यांना पाठिंबा व्यक्त केला व काही काळ या आंदोलनात सहभाग घेतला. मी तुमच्या सोबत खांद्याला खांदा देवुन लढत आहे. प्रत्येक व्यासपिठावर त्यासाठी भांडत आहे आज या ठिकाणी भाषण नको अशी भुमिका त्यांनी घेतली होती मात्र,  कार्यकर्त्यांनी भाषण करा असा आग्रह धरल्याने त्यांनी छोटेखानी मनोगत व्यक्त केले. 

आरक्षण पोटाची लढाई

राज्यात ५८ मोर्चे शांततेत करणार्‍या समाजाला सरकार साप सोडतो, पेड कार्यकर्ते आहेत असे म्हणुन खिजवत असल्याबद्दल त्यांनी संताप व्यक्त केला. आरक्षणाच्या या लढाईचा निर्णायक लढा परळीतुन उभा राहत असल्याने परळीची इतिहासात नोंद होईल असे सांगताना मराठा समाजाने समाजातील सर्व वंचित घटकांना आरक्षण देताना पाठिंबा देण्याची भुमिका घेतली होती. आज हा समाज एकरा वरून गुंठ्यावर असलेला असल्याने त्यांना आरक्षण हवे आहे हे आरक्षण म्हणुन प्रतिष्ठेची नव्हे तर पोटाची लढाई असल्याचे ते म्हणाले. काकासाहेब शिंदे सारखे युवक आरक्षणासाठी जिव देत असतांनाही सरकार जागे होत नाही. उद्या हि परिस्थिती अधिक बिकटली तर त्यास सरकार जबाबदार राहिल असा इशारा देतानाच शांततेच्या मार्गाने हा लढा द्यावा असे आवाहन त्यांनी केले. 

टॅग्स :Dhananjay Mundeधनंजय मुंडेMaratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चाState Governmentराज्य सरकारreservationआरक्षण