शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

मराठा समाजाच्या भावना न समजणारे सरकार बालीश बुध्दीचे : धनंजय मुंडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2018 16:02 IST

या समाजाच्या आरक्षणाबाबत समाज भावना न समजणारे सरकार बालीश बुध्दीचे असल्याचा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला आहे.

ठळक मुद्दे आरक्षणासाठी ठोक मार्चाचा हा निर्णायक लढा आहे मात्र तो आपण शांततेच्या मार्गाने लढावा असे आवाहनही त्यांनी केले.

परळी (बीड ) : मराठा आरक्षणाबाबत दिलेल्या शब्दाला सरकार जागले नाही म्हणुनच समाजावर ठोक मोर्चा काढण्याची वेळ आली आहे. या समाजाच्या आरक्षणाबाबत समाज भावना न समजणारे सरकार बालीश बुध्दीचे असल्याचा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला आहे. आरक्षणासाठी ठोक मार्चाचा हा निर्णायक लढा आहे मात्र तो आपण शांततेच्या मार्गाने लढावा असे आवाहनही त्यांनी केले. 

मराठा आरक्षणासाठी मागील आठ दिवसापासुन परळी शहरात सुरू असलेल्या ठिय्या आंदोलनाला आज मुंडे यांनी भेट दिली. आंदोलकांशी चर्चा करतांना त्यांच्या मागण्यांना पाठिंबा व्यक्त केला व काही काळ या आंदोलनात सहभाग घेतला. मी तुमच्या सोबत खांद्याला खांदा देवुन लढत आहे. प्रत्येक व्यासपिठावर त्यासाठी भांडत आहे आज या ठिकाणी भाषण नको अशी भुमिका त्यांनी घेतली होती मात्र,  कार्यकर्त्यांनी भाषण करा असा आग्रह धरल्याने त्यांनी छोटेखानी मनोगत व्यक्त केले. 

आरक्षण पोटाची लढाई

राज्यात ५८ मोर्चे शांततेत करणार्‍या समाजाला सरकार साप सोडतो, पेड कार्यकर्ते आहेत असे म्हणुन खिजवत असल्याबद्दल त्यांनी संताप व्यक्त केला. आरक्षणाच्या या लढाईचा निर्णायक लढा परळीतुन उभा राहत असल्याने परळीची इतिहासात नोंद होईल असे सांगताना मराठा समाजाने समाजातील सर्व वंचित घटकांना आरक्षण देताना पाठिंबा देण्याची भुमिका घेतली होती. आज हा समाज एकरा वरून गुंठ्यावर असलेला असल्याने त्यांना आरक्षण हवे आहे हे आरक्षण म्हणुन प्रतिष्ठेची नव्हे तर पोटाची लढाई असल्याचे ते म्हणाले. काकासाहेब शिंदे सारखे युवक आरक्षणासाठी जिव देत असतांनाही सरकार जागे होत नाही. उद्या हि परिस्थिती अधिक बिकटली तर त्यास सरकार जबाबदार राहिल असा इशारा देतानाच शांततेच्या मार्गाने हा लढा द्यावा असे आवाहन त्यांनी केले. 

टॅग्स :Dhananjay Mundeधनंजय मुंडेMaratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चाState Governmentराज्य सरकारreservationआरक्षण