शहरं
Join us  
Trending Stories
1
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
2
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
3
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
4
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
5
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर
6
मुलगा वापरायचा मृत आईचं बँक खातं, अचानक खात्यात आले १०० कोटी रुपये, त्यानंतर...
7
निळेशार डोळे असलेल्या मॉडेलचं डोनाल्ड ट्रम्प का करतायत तोंडभरून कौतुक? कारण खूपच खास
8
Vivo Y400 5G: एमोलेड डिस्प्ले, ६००० mAh बॅटरी आणि बरेच काही; विवो व्हाय ४०० भारतात लॉन्च!
9
Video - "पळ भावा पळ..."; ढिगाऱ्यात अडकलेल्या दोघांनी मृत्यूला दिला चकवा, पुरात चमत्कार
10
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबुतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
11
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
12
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?
13
निसर्गाचा प्रकोप! ३४ सेकंदात सगळंच संपलं, सुंदर धरालीच्या विनाशाचे धडकी भरवणारे फोटो
14
एसटी महामंडळ राज्य शासनाचे अधिकृत यात्री ॲप चालवणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा
15
तयारीला लागा! उद्धव ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश; मनसेसोबतच्या युतीबाबत म्हणाले...
16
बेस्टच्या ऑफिसमध्ये पैसे उडवून डान्स? २०१७ मधल्या 'त्या' घटनेवर माधवी जुवेकर म्हणाली- "रात्री दोन मंत्र्यांचे फोन आले..."
17
७०, ५०, ४० की ३५ किलो; ट्रेनमध्ये किती सामान घेऊन जाऊ शकता? अन्यथा मोठा दंड होऊ शकतो
18
Vastu Tips: दारात ठेवण्याचे पायपुसणे हिरव्याच रंगाचे का असावे? खरंच होतो का भाग्योदय?
19
खिशातून एक रुपयाही न भरता शेतकऱ्यांना मिळेल वार्षिक ३६,००० पेन्शन, योजनेचा कसा घ्यायचा फायदा?
20
Shravan Purnima 2025: नारळी पौर्णिमेला समुद्राला श्रीफळ का अर्पण करतात? त्यामागे आहे 'हे' विशेष कारण!

मराठा समाजाच्या भावना न समजणारे सरकार बालीश बुध्दीचे : धनंजय मुंडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2018 16:02 IST

या समाजाच्या आरक्षणाबाबत समाज भावना न समजणारे सरकार बालीश बुध्दीचे असल्याचा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला आहे.

ठळक मुद्दे आरक्षणासाठी ठोक मार्चाचा हा निर्णायक लढा आहे मात्र तो आपण शांततेच्या मार्गाने लढावा असे आवाहनही त्यांनी केले.

परळी (बीड ) : मराठा आरक्षणाबाबत दिलेल्या शब्दाला सरकार जागले नाही म्हणुनच समाजावर ठोक मोर्चा काढण्याची वेळ आली आहे. या समाजाच्या आरक्षणाबाबत समाज भावना न समजणारे सरकार बालीश बुध्दीचे असल्याचा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला आहे. आरक्षणासाठी ठोक मार्चाचा हा निर्णायक लढा आहे मात्र तो आपण शांततेच्या मार्गाने लढावा असे आवाहनही त्यांनी केले. 

मराठा आरक्षणासाठी मागील आठ दिवसापासुन परळी शहरात सुरू असलेल्या ठिय्या आंदोलनाला आज मुंडे यांनी भेट दिली. आंदोलकांशी चर्चा करतांना त्यांच्या मागण्यांना पाठिंबा व्यक्त केला व काही काळ या आंदोलनात सहभाग घेतला. मी तुमच्या सोबत खांद्याला खांदा देवुन लढत आहे. प्रत्येक व्यासपिठावर त्यासाठी भांडत आहे आज या ठिकाणी भाषण नको अशी भुमिका त्यांनी घेतली होती मात्र,  कार्यकर्त्यांनी भाषण करा असा आग्रह धरल्याने त्यांनी छोटेखानी मनोगत व्यक्त केले. 

आरक्षण पोटाची लढाई

राज्यात ५८ मोर्चे शांततेत करणार्‍या समाजाला सरकार साप सोडतो, पेड कार्यकर्ते आहेत असे म्हणुन खिजवत असल्याबद्दल त्यांनी संताप व्यक्त केला. आरक्षणाच्या या लढाईचा निर्णायक लढा परळीतुन उभा राहत असल्याने परळीची इतिहासात नोंद होईल असे सांगताना मराठा समाजाने समाजातील सर्व वंचित घटकांना आरक्षण देताना पाठिंबा देण्याची भुमिका घेतली होती. आज हा समाज एकरा वरून गुंठ्यावर असलेला असल्याने त्यांना आरक्षण हवे आहे हे आरक्षण म्हणुन प्रतिष्ठेची नव्हे तर पोटाची लढाई असल्याचे ते म्हणाले. काकासाहेब शिंदे सारखे युवक आरक्षणासाठी जिव देत असतांनाही सरकार जागे होत नाही. उद्या हि परिस्थिती अधिक बिकटली तर त्यास सरकार जबाबदार राहिल असा इशारा देतानाच शांततेच्या मार्गाने हा लढा द्यावा असे आवाहन त्यांनी केले. 

टॅग्स :Dhananjay Mundeधनंजय मुंडेMaratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चाState Governmentराज्य सरकारreservationआरक्षण