शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हल्ल्याचा उल्लेख करत प्रियंका गांधी यांचा अमित शाहांवर थेट हल्लाबोल, म्हणाल्या...
2
चीनमध्ये Apple ला मोठा झटका! एका रिटेल स्टोअरवर लावले टाळे, पण भारतासाठी आहे 'खुशखबर'!
3
हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण?
4
'माझ्या आईच्या डोळ्यात तेव्हा अश्रू आले जेव्हा...'; प्रियंका गांधींचा अमित शाहांवर निशाणा, म्हणाल्या....
5
हर्षवर्धनचा नवा कारनामा; Reliance च्या नावाने उघडल्या ५ बनावट कंपन्या, तपास अधिकारी चक्रावले
6
Priyanka Gandhi : "लोक सरकारवर विश्वास ठेवून पहलगामला गेले, पण सरकारने लोकांना देवाच्या भरवश्यावर सोडलं"
7
'तुमचा वेळ वाया घालवू नका, काळजी घ्या'; आईवडिलांसाठी चिठ्ठी अन् पुण्यात इंजिनिअर तरुणाने स्वतःला संपवले
8
समुद्राचे पाणी पिण्यायोग्य होणार; मुंबई महानगरपालिकेने हाती घेतला महत्त्वाचा प्रकल्प!
9
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
10
गर्लफ्रेंडने ठेवला विश्वास, प्रोत्साहन दिल्याने 'तो' झाला मोठा अधिकारी, कोचिंगशिवाय पास केली JPSC
11
ब्रेक पॅडलखाली अडकली पाण्याची बाटली, भरधाव कार ट्रॉलीमध्ये घुसून दोन व्यावसायिकांचा मृत्यू
12
UPI पेमेंटमध्ये पिनची कटकट संपणार? आता चेहरा दाखवा किंवा बोट लावा, पेमेंट होईल झटक्यात!
13
समसप्तक नवमपंचम गजलक्ष्मी राजयोग: ९ राशींना शुभ वरदान काळ, हाती पैसा राहील; अपार लाभच लाभ!
14
'तुम्ही पाकिस्तानसोबत बोलता का...', अखिलेश यादवांनी टोमणा मारताच शहांनी दिले जोरदार प्रत्युत्तर
15
Video: गाढवाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू
16
३ वर्षांपासूनची निष्क्रिय पोस्ट ऑफिस खाती होणार बंद; पाहा पुन्हा अकाऊंट अ‍ॅक्टिव्हेट करता येणार का?
17
पहलगाममध्ये पर्यटकांच्या हत्या, अमरनाथ यात्रेवर मोठ्या हल्ल्याचा सुरू होता कट; धक्कादायक माहिती आली समोर
18
एकीकडे महापूर अन् दुसरीकडे भीषण पाणीटंचाई! भारताने 'सिंधू पाणी करार' रद्द केल्याने पाकिस्तानची कोंडी
19
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
20
IND vs ENG: "हे मला अजिबात आवडणार नाही..." रवी शास्त्री जसप्रीत बुमराहचं नाव घेत काय म्हणाले?

बोकड चोरीचा संशय अन जमावाचा वस्तीवर हल्ला; जाळपोळीत एका वर्षाचा चिमुकला ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2021 18:55 IST

mob attack in parner Beed : वस्तीवरील लोक गावात तसेच शेतात चोरी करतात, असा गावकऱ्यांचा आरोप आहे.

ठळक मुद्देपारनेरमध्ये पारधी वस्तीवर तोडफोड, जाळपोळया प्रकरणात दहा ते बाराजणांवर गुन्हा दाखल

पाटोदा (जि. बीड) : तालुक्यातील पारनेर येथे २५ सप्टेंबर रोजी रात्री अकरा वाजेच्या सुमारास पारधी वस्तीवर जमावाने हल्ला केला. यावेळी साहित्याची ताेडफोड करून घरे पेटवून देण्यात आली. जमावाच्या या हल्ल्यात एका वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू झाला. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. पाटोदा ठाण्यात दहा ते बाराजणांवर गुन्हा नोंद करण्यात आला असून पोलिसांनी सातजणांना ताब्यात घेतले आहे.

पारनेर गावाजवळ पारधी समाजाची वस्ती आहे. या वस्तीवरील लोक गावात तसेच शेतात चोरी करतात, असा गावकऱ्यांचा आरोप आहे. यावरून त्यांच्यात सतत वाद होत होता. दरम्यान, २५ सप्टेंबर रोजी रात्री काही तरुणांचा जमाव वस्तीवर चालून आला. लाठ्या-काठ्यासंह केलेल्या हल्ल्यात भिवराबाई काळे यांची झोपडी पेटवून दिली, त्यामुळे संसारोपयोगी साहित्य खाक झाले. यात भिवराबाई यांचा नातू मानू ऊर्फ सिद्धांत अरुण काळे (१) या चिमुकल्याचा मृत्यू झाला, तर पाचजण गंभीर जखमी झाले. या हल्ल्याची माहिती मिळाल्यावर पाटोदा ठाण्याचे पोलीस निरीक्षक मनीष पाटील यांच्यासह सहकाऱ्यांनी धाव घेतली. जखमींना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले.

भिवराबाई अभिमान काळे (६५), अभिमान काळे (७०) ,सगुना अरुण काळे, विद्या साईनाथ भोसले व ताराबाई, विद्या साईनाथ भोसले यांचा जखमींत समावेश आहे. यापैकी अभिमान काळे यांची प्रकृती चिंताजनक आहे. भिवराबाई अभिमान काळे यांच्या फिर्यादीवरुन पाटोदा ठाण्यात बबन औटे ,बाळू औटे, बबन औटे, विनोद औटे, अशोक दहिवले, विष्णू औटे, युवराज औटे, विशाल औटे यांच्यासह एकूण दहा ते बाराजणांवर पाटोदा ठाण्यात ॲट्रॉसिटीसह खुनाचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

हेही वाचा - 'मुंडे-महाजन यांच्या आठवणी आणि चहा'; पंकजाताई पोहोचल्या लोकनेत्यांच्या आवडत्या हॉटेलमध्ये

बोकड चोरीची पार्श्वभूमीपारनेरमधील घटनेला बोकड चोरीच्या घटनेची पार्श्वभूमी आहे. चार दिवसांपूर्वी भगवान औटे यांचे बोकड चोरीस गेले होते. पारधी समाजाच्या एका तरुणावर चोरीचा आरोप झाला होता. यातून औटे यांच्यावर तरुणाने चाकूने हल्ला केला होता. यामुळे ग्रामस्थांनी संतापाच्या भरात वस्तीवर हल्ला चढविला. या घटनेमुळे गावात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली. उपअधीक्षक विजय लगारे, पोलीस निरीक्षक मनीष पाटील यांनी पारनेरमध्ये तळ ठोकला.

परिस्थिती नियंत्रणातपारनेरमध्ये वस्तीवरील लोक व ग्रामस्थांत सतत वाद होतात. त्यातून हल्ल्याची घटना घडली. यात एका बालकाचा मृत्यू झाला. दहा ते बाराजणांवर गुन्हा नोंद केला असून सातजणांना अटक केली आहे. उर्वरित आरोपींचा शोध सुुरू आहे. गावता पुरेसा बंदोबस्त आहे. आता परिस्थिती नियंत्रणात आहे.- आर. राजा, पोलीस अधीक्षक, बीड. 

हेही वाचा - माणुसकीला सलाम ! लोकवर्गणीच्या पाठिंब्यातून ड्रायव्हरचा मुलगा झाला लंडनमध्ये पदवीधर

टॅग्स :BeedबीडCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस