शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
2
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
3
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
4
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
5
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
6
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
7
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
8
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
9
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
10
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
11
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
12
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
13
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला
14
दिवसभर खुर्चीवर बसून वाढतंय वजन? ३०-३०-३० नियमाची जादू, लठ्ठपणाला कराल बाय-बाय
15
अ‍ॅमेझॉनवर १६ जूनला अवघ्या १६ रुपयांना स्मार्टवॉच वाटली जाणार; कुपन कोड अन् वेळ लक्षात ठेवा...
16
"जर इस्त्रायलची साथ दिली तर..."; संतापलेल्या इराणचा पाश्चात्य देशांना मोठा इशारा
17
ऐन पेरणीत शेतकरी कुटुंबांवर संकट! वीज कोसळून दोन सख्ख्या भावांसह चार शेतकऱ्यांचा मृत्यू
18
अहमदाबाद प्लेन क्रॅशसंदर्भात बाबा रामदेव यांना वेगळाच संशय, स्पष्टच बोलले! केली मोठी मागणी
19
Maharashtra Rain Alert: कोकणाला रेड अलर्ट! मुंबई-ठाण्यासह 'या' जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा
20
Tarot Card: कष्ट करावे लागतील, तडकाफडकी कोणतेही निर्णय घेऊ नका; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!

प्रत्यक्ष गावात जाऊन चारा, पाण्याची माहिती घ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2018 00:07 IST

रोजगारासाठी स्थलांतर रोखतानाच मजुरांना कामे उपलब्ध करा, उपाययोजनेत कुठेही कमी पडू नका अशा सूचना विभागीय आयुक्त पुरुषोत्तम भापकर यांनी जिल्हा प्रशासनाला दिल्या.

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : टंचाईवर मात करण्यासाठी अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष गावागावात जाऊन पिण्याच्या पाण्याची तसेच जनावरांच्या चा-याची पाहणी करावी, रोजगारासाठी स्थलांतर रोखतानाच मजुरांना कामे उपलब्ध करा, उपाययोजनेत कुठेही कमी पडू नका अशा सूचना विभागीय आयुक्त पुरुषोत्तम भापकर यांनी जिल्हा प्रशासनाला दिल्या.दुष्काळी परिस्थितीतील विविध विषयाची टंचाई हाताळण्यासाठी पाणी ,गुरांना, चारा व ग्रामीण भागातील मजुरांचे स्थलांतर रोखण्यासाठी विभागीय आयुक्त पुरुषोत्तम भापकर यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी येथील विश्रामगृहामध्ये बैठक झाली. यावेळी त्यांनी टंचाई परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी अधिका-यांना सूचना दिल्या. बैठकीस अपर जिल्हाधिकारी बी.एम. कांबळे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे, उपविभागीय अधिकारी महेंद्र कुमार कांबळे, उपजिल्हा निवडणुक अधिकारी प्रविण धरमकर तसेच इतर अधिकारी उपस्थित होते.यावेळी विभागीय आयुक्त म्हणाले, मुख्यमंत्री पेयजल योजना व राष्ट्रीय पेयजल योजनेतंर्गत पाणी टंचाईवर मात करण्यासाठी शासनस्तरावर करण्यात आलेल्या नियोजनाची संबधित अधिका-यांनी प्रत्यक्ष त्या गावात जाऊन पाहणी करावी. नरेगाच्या अधिग्रहीत विहीरींमध्ये किती पाणीसाठा आहे व तो किती दिवसापर्यंपुरेल तसेच जिथे टॅँकरने पाणी पुरवठा होत असेल त्या गावातील पाणी साठयासाठी उपलब्ध असलेली विहीर,हौद,किंवा जी साधने उपलब्ध असेल त्यातील पाणी पिण्यासाठी शुध्द आहे का? त्या पाण्याची तपासणी करावी व पाणी कमी पडणार नाही यावर अधिक लक्ष देऊन पाणी टंचाईची समस्या सोडवावी, असे ते म्हणाले.गाळपे-याचे क्षेत्र किती आहे? जनावरांसाठी किती महिन्यापर्यंत हिरवा चारा पुरेल, हिरवा चारा कमी पडत असेल तर त्यासाठी किती हेक्टर क्षेत्र गाळपे-यासाठी अधिग्रहीत केले आहे. या क्षेत्रात बाजरी,ज्वारी, मका या बियाणाची पेरणी करु न जनावरासाठी हिरवा चारा निर्माण करावा. किमान ५ हजार हेक्टरपर्यंत क्षेत्र हिरव्या चा-यासाठी उपलब्ध झाल्यास चा-याची टंचाई भासणार नाही, असे ते म्हणाले.रोजगार हमी योजनेवर मजुरांना काम उपलब्ध करुन दिल्यास स्थलांतर होणार नाही तसेच डिसेंबरच्या आत गावामध्ये ग्रामसभा घेऊन व्हीव्हीपॅट मशीनव्दारे मतदारांचे प्रत्याक्षिकाव्दारे मतदान घेऊन त्याची जनजागृती करण्याचे त्यांनी आवाहन केले.पंतप्रधान आवास योजनेमध्ये किती घरकुले वाटप झाले, शेततळयाचे दिलेले उदिष्ट जूनपर्यंत पूर्ण करावे, प्रत्येक गावात कमीत कमी १० विहीरीचे काम झाले तर येणा-या काळात पाणी टंचाई भासणार नाही यासाठी शासनाने दिलेले उदिष्टे वेळेत पूर्ण करावेत, अशा सूचना विभागीय आयुक्तांनी यावेळी केल्या.

टॅग्स :droughtदुष्काळBeed collector officeजिल्हाधिकारी कार्यालय बीडDivisional Commissioner Office Aurangabadऔरंगाबाद विभागीय आयुक्तालय