शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

प्रत्यक्ष गावात जाऊन चारा, पाण्याची माहिती घ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2018 00:07 IST

रोजगारासाठी स्थलांतर रोखतानाच मजुरांना कामे उपलब्ध करा, उपाययोजनेत कुठेही कमी पडू नका अशा सूचना विभागीय आयुक्त पुरुषोत्तम भापकर यांनी जिल्हा प्रशासनाला दिल्या.

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : टंचाईवर मात करण्यासाठी अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष गावागावात जाऊन पिण्याच्या पाण्याची तसेच जनावरांच्या चा-याची पाहणी करावी, रोजगारासाठी स्थलांतर रोखतानाच मजुरांना कामे उपलब्ध करा, उपाययोजनेत कुठेही कमी पडू नका अशा सूचना विभागीय आयुक्त पुरुषोत्तम भापकर यांनी जिल्हा प्रशासनाला दिल्या.दुष्काळी परिस्थितीतील विविध विषयाची टंचाई हाताळण्यासाठी पाणी ,गुरांना, चारा व ग्रामीण भागातील मजुरांचे स्थलांतर रोखण्यासाठी विभागीय आयुक्त पुरुषोत्तम भापकर यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी येथील विश्रामगृहामध्ये बैठक झाली. यावेळी त्यांनी टंचाई परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी अधिका-यांना सूचना दिल्या. बैठकीस अपर जिल्हाधिकारी बी.एम. कांबळे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे, उपविभागीय अधिकारी महेंद्र कुमार कांबळे, उपजिल्हा निवडणुक अधिकारी प्रविण धरमकर तसेच इतर अधिकारी उपस्थित होते.यावेळी विभागीय आयुक्त म्हणाले, मुख्यमंत्री पेयजल योजना व राष्ट्रीय पेयजल योजनेतंर्गत पाणी टंचाईवर मात करण्यासाठी शासनस्तरावर करण्यात आलेल्या नियोजनाची संबधित अधिका-यांनी प्रत्यक्ष त्या गावात जाऊन पाहणी करावी. नरेगाच्या अधिग्रहीत विहीरींमध्ये किती पाणीसाठा आहे व तो किती दिवसापर्यंपुरेल तसेच जिथे टॅँकरने पाणी पुरवठा होत असेल त्या गावातील पाणी साठयासाठी उपलब्ध असलेली विहीर,हौद,किंवा जी साधने उपलब्ध असेल त्यातील पाणी पिण्यासाठी शुध्द आहे का? त्या पाण्याची तपासणी करावी व पाणी कमी पडणार नाही यावर अधिक लक्ष देऊन पाणी टंचाईची समस्या सोडवावी, असे ते म्हणाले.गाळपे-याचे क्षेत्र किती आहे? जनावरांसाठी किती महिन्यापर्यंत हिरवा चारा पुरेल, हिरवा चारा कमी पडत असेल तर त्यासाठी किती हेक्टर क्षेत्र गाळपे-यासाठी अधिग्रहीत केले आहे. या क्षेत्रात बाजरी,ज्वारी, मका या बियाणाची पेरणी करु न जनावरासाठी हिरवा चारा निर्माण करावा. किमान ५ हजार हेक्टरपर्यंत क्षेत्र हिरव्या चा-यासाठी उपलब्ध झाल्यास चा-याची टंचाई भासणार नाही, असे ते म्हणाले.रोजगार हमी योजनेवर मजुरांना काम उपलब्ध करुन दिल्यास स्थलांतर होणार नाही तसेच डिसेंबरच्या आत गावामध्ये ग्रामसभा घेऊन व्हीव्हीपॅट मशीनव्दारे मतदारांचे प्रत्याक्षिकाव्दारे मतदान घेऊन त्याची जनजागृती करण्याचे त्यांनी आवाहन केले.पंतप्रधान आवास योजनेमध्ये किती घरकुले वाटप झाले, शेततळयाचे दिलेले उदिष्ट जूनपर्यंत पूर्ण करावे, प्रत्येक गावात कमीत कमी १० विहीरीचे काम झाले तर येणा-या काळात पाणी टंचाई भासणार नाही यासाठी शासनाने दिलेले उदिष्टे वेळेत पूर्ण करावेत, अशा सूचना विभागीय आयुक्तांनी यावेळी केल्या.

टॅग्स :droughtदुष्काळBeed collector officeजिल्हाधिकारी कार्यालय बीडDivisional Commissioner Office Aurangabadऔरंगाबाद विभागीय आयुक्तालय