शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
3
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
4
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
5
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
6
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
7
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
8
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
9
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
10
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
11
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
12
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
13
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
14
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
15
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
16
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
17
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
18
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
19
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
20
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
Daily Top 2Weekly Top 5

प्रत्यक्ष गावात जाऊन चारा, पाण्याची माहिती घ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2018 00:07 IST

रोजगारासाठी स्थलांतर रोखतानाच मजुरांना कामे उपलब्ध करा, उपाययोजनेत कुठेही कमी पडू नका अशा सूचना विभागीय आयुक्त पुरुषोत्तम भापकर यांनी जिल्हा प्रशासनाला दिल्या.

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : टंचाईवर मात करण्यासाठी अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष गावागावात जाऊन पिण्याच्या पाण्याची तसेच जनावरांच्या चा-याची पाहणी करावी, रोजगारासाठी स्थलांतर रोखतानाच मजुरांना कामे उपलब्ध करा, उपाययोजनेत कुठेही कमी पडू नका अशा सूचना विभागीय आयुक्त पुरुषोत्तम भापकर यांनी जिल्हा प्रशासनाला दिल्या.दुष्काळी परिस्थितीतील विविध विषयाची टंचाई हाताळण्यासाठी पाणी ,गुरांना, चारा व ग्रामीण भागातील मजुरांचे स्थलांतर रोखण्यासाठी विभागीय आयुक्त पुरुषोत्तम भापकर यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी येथील विश्रामगृहामध्ये बैठक झाली. यावेळी त्यांनी टंचाई परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी अधिका-यांना सूचना दिल्या. बैठकीस अपर जिल्हाधिकारी बी.एम. कांबळे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे, उपविभागीय अधिकारी महेंद्र कुमार कांबळे, उपजिल्हा निवडणुक अधिकारी प्रविण धरमकर तसेच इतर अधिकारी उपस्थित होते.यावेळी विभागीय आयुक्त म्हणाले, मुख्यमंत्री पेयजल योजना व राष्ट्रीय पेयजल योजनेतंर्गत पाणी टंचाईवर मात करण्यासाठी शासनस्तरावर करण्यात आलेल्या नियोजनाची संबधित अधिका-यांनी प्रत्यक्ष त्या गावात जाऊन पाहणी करावी. नरेगाच्या अधिग्रहीत विहीरींमध्ये किती पाणीसाठा आहे व तो किती दिवसापर्यंपुरेल तसेच जिथे टॅँकरने पाणी पुरवठा होत असेल त्या गावातील पाणी साठयासाठी उपलब्ध असलेली विहीर,हौद,किंवा जी साधने उपलब्ध असेल त्यातील पाणी पिण्यासाठी शुध्द आहे का? त्या पाण्याची तपासणी करावी व पाणी कमी पडणार नाही यावर अधिक लक्ष देऊन पाणी टंचाईची समस्या सोडवावी, असे ते म्हणाले.गाळपे-याचे क्षेत्र किती आहे? जनावरांसाठी किती महिन्यापर्यंत हिरवा चारा पुरेल, हिरवा चारा कमी पडत असेल तर त्यासाठी किती हेक्टर क्षेत्र गाळपे-यासाठी अधिग्रहीत केले आहे. या क्षेत्रात बाजरी,ज्वारी, मका या बियाणाची पेरणी करु न जनावरासाठी हिरवा चारा निर्माण करावा. किमान ५ हजार हेक्टरपर्यंत क्षेत्र हिरव्या चा-यासाठी उपलब्ध झाल्यास चा-याची टंचाई भासणार नाही, असे ते म्हणाले.रोजगार हमी योजनेवर मजुरांना काम उपलब्ध करुन दिल्यास स्थलांतर होणार नाही तसेच डिसेंबरच्या आत गावामध्ये ग्रामसभा घेऊन व्हीव्हीपॅट मशीनव्दारे मतदारांचे प्रत्याक्षिकाव्दारे मतदान घेऊन त्याची जनजागृती करण्याचे त्यांनी आवाहन केले.पंतप्रधान आवास योजनेमध्ये किती घरकुले वाटप झाले, शेततळयाचे दिलेले उदिष्ट जूनपर्यंत पूर्ण करावे, प्रत्येक गावात कमीत कमी १० विहीरीचे काम झाले तर येणा-या काळात पाणी टंचाई भासणार नाही यासाठी शासनाने दिलेले उदिष्टे वेळेत पूर्ण करावेत, अशा सूचना विभागीय आयुक्तांनी यावेळी केल्या.

टॅग्स :droughtदुष्काळBeed collector officeजिल्हाधिकारी कार्यालय बीडDivisional Commissioner Office Aurangabadऔरंगाबाद विभागीय आयुक्तालय