शहरं
Join us  
Trending Stories
1
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
2
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
3
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
4
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
5
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
6
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
7
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
8
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
9
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
10
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
11
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
12
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
13
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
14
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
15
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
16
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल
17
ना धक्का.. ना धोका! वनडे वर्ल्ड कप पर्यंत रोहितची कॅप्टन्सी सेफ? BCCI नव्हे तर ICC नं दिली हिंट
18
दिलीप प्रभावळकर यांना 'लगे रहो मुन्नाभाई'मध्ये अशी मिळाली महात्मा गांधींची भूमिका, म्हणाले...
19
सिक्स सेन्स? आतड्यातील बॅक्टेरिया थेट मेंदूशी साधतात संवाद; रिसर्चमध्ये आश्चर्यकारक खुलासा
20
अग्नितांडव! दिल्लीतील रुग्णालयाला भीषण आग; एकाचा मृत्यू, काचा फोडून रुग्णांना वाचवलं

'दावणीला चारा द्या'; चाऱ्यासाठी आक्रमक शेतकऱ्यांचा जनावरांसह रास्तारोको 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2019 16:01 IST

दोन तासांच्या रास्ता रोकोने महामार्गावरील वाहतूक ठप्प

ठळक मुद्दे दुष्काळाची दाहकता वाढू लागलीपश्चिम महाराष्ट्रातून येणाऱ्या ऊसावर व पेंढीवरच चाऱ्याची मदार आहे.

अंबाजोगाई (बीड ) :  शेतकऱ्यांच्या दावणीला चारा उपलब्ध करून द्या. या मागणीसाठी अंबाजोगाई तालुक्यातील शेतकऱ्यांनी अंबाजोगाई-लातूर महामार्गावरील सायगाव येथे शेतकऱ्यांनी जनावरांसह रस्त्यावर उतरून बुधवारी सकाळी रास्तारोको आंदोलन केले. दोन तास झालेल्या या आंदोलनाने महामार्गावरील वाहतूक दोन्ही बाजूंनी ठप्प झाली होती. अंबाजोगाईचे नायब तहसीलदार गणेश सरोदे यांनी घटनास्थाळी जाऊन शेतकऱ्यांचे निवेदन स्वीकारले. 

अंबाजोगाई तालुक्यात गेल्या दोन वर्षांपासून पावसाने हुलकावणी दिल्याने दुष्काळसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. गेल्या वर्षीचा खरीप व रब्बी हंगाम पावसाअभावी गेला. यावर्षीचाही खरीप हंगाम शेतकऱ्यांच्या हातून गेला. सलग दोन वर्षे पाऊस न झाल्याने जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. होता तो चारा सहा महिन्यापूर्वी संपला. आता पश्चिम महाराष्ट्रातून येणाऱ्या ऊसावर व पेंढीवरच चाऱ्याची मदार आहे. पाच हजार रुपये प्रतिटन दराने ऊस विकत घेऊन जनावरांना खाऊ घालावा लागत आहे. शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती डबघाईला आलेली असतांना अशा स्थितीत चारा विकत घेणे मोठ्या जिकीरीचे काम झाले आहे. अगोदरच कर्जबाजारी झालेल्या शेतकऱ्यांना विकत चारा घेणे परवडत नाही.  अशी भीषण स्थिती असतांनाही प्रशासनाच्या वतीने चाराछावण्या सुरू झाल्या नाहीत. चाराडेपोही उपलब्ध नाहीत. पिण्याच्या पाण्याची स्थिती दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. सर्व जलस्त्रोत निकामी झाले आहेत. जनावरांना चाराही नाही आणि पाणीही नाही अशा स्थितीत पशुधन सांभाळायचे कसे?

या चिंतेने विवश झालेल्या बर्दापूर, सायगाव, सुगाव, नांदगाव, पोखरी, मुडेगाव, दैठणा, वाघाळा व परिसरातील विविध गावच्या शेतकऱ्यांनी बुधवारी सकाळी आपल्या जनावरांसह रस्तारोको आंदोलन केले. यावेळी शेतकऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी करत दावणीला चारा उपलब्ध करून द्या, अशी मागणी केली. सलग दोन तास झालेल्या या रास्तारोकोमुळे महामार्गावरील वाहतूक दोन्ही बाजूंनी ठप्प झाली होती. शेतकऱ्यांच्या या आंदोलनाची माहिती उपलब्ध होताच नायब तहसीलदार गणेश सरोदे, मंडळ अधिकारी गोविंद जाधव यांनी घटनास्थळी जाऊन शेतकऱ्यांचे निवेदन स्वीकारले व या मागणीसाठी प्रशासनाकडे पाठपुरावा करण्यात येणार असल्याचे सांगितले. या आंदोलनाच्या वेळी बर्दापूर पोलिस ठाण्याच्या वतीन महामार्गावर पोलिस बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला होता.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेतीagitationआंदोलन