शहरं
Join us  
Trending Stories
1
Assembly Bypoll Result 2025: पोटनिवडणुकांचे निकाल! गुजरातमध्ये एका जागेवर आप भाजपाला टक्कर देतेय; पंजाबमध्ये संजीव अरोरा आघाडीवर
2
नितीशकुमारांची सत्ता धोक्यात? नव्या सर्व्हेतून धक्कादायक 'लाट'; बिहार निवडणुकीपूर्वीच....
3
Maharashtra Politics : ठाकरे गटाला आणखी एक धक्का बसणार, भास्कर जाधव मोठा निर्णय घेणार?, संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं
4
भारतासोबतच्या सिंधू जल करार वादात OIC ची एन्ट्री; ५७ इस्लामिक देशांचा पाकिस्तानच्या सूरात सूर
5
युनूस यांची खेळी, भारताविरोधी षडयंत्र; बांगलादेशात पाकिस्तानी ISI हस्तकाला मोठी जबाबदारी
6
जगभर: डोनाल्ड ट्रम्प याची 'दादागिरी', अमेरिकेत भारतीय प्राध्यापकांनाही ‘बंदी’!
7
"भारताकडे केवळ २ पर्याय आहेत..."; शाहांच्या विधानानंतर पाकिस्तानचा थयथयाट, थेट युद्धाची धमकी
8
पुण्याच्या नळ स्टॉप स्टेशनवरुन पकडली मेट्रो, प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याला ओळखलंत का?
9
"अमेरिका भूतकाळातून काही शिकली नाही, बळाद्वारे शांतता प्रस्थापित होत नाही’’, इराणवरील हल्ल्यावरून रशिया,चीनचा टोला
10
Iran Israel War: इराण-इस्रायल युद्धाचा परिणाम नोकऱ्यांवरही, कंपन्यांमध्ये भरती प्रक्रिया थांबली; कर्मचारीही चिंतेत
11
Shiv Sena UBT: मराठवाड्यात उद्धव ठाकरेंना मोठा झटका, मोठ्या नेत्याने सोडली साथ!
12
Lalit Upadhyay: भारतासाठी दोन ऑलिम्पिक पदक जिंकणाऱ्या खेळाडूची तडकाफडकी निवृत्ती!
13
पहिल्या कसोटीत इंग्लंडला एवढ्या धावांचं आव्हान दिल्यास भारताचा विजय निश्चित, असं आहे समीकरण 
14
राज्याचा दर्जा न दिल्यास सर्वोच्च न्यायालयात जाणार; फारुक अब्दुल्ला यांचा केंद्र सरकारला इशारा
15
महागाईचा काळ... बँक FD चे कमी व्याजदर! 'या' ५ सरकारी योजना तुमचं नशीब बदलतील, वाचा संपूर्ण माहिती
16
रॅलीमध्ये कारखाली चिरडून एकाचा मृत्यू; जगन मोहन रेड्डींविरोधात गुन्हा दाखल
17
डोईवर विठुमाऊली अन् वारकऱ्यांसह फुगडी; पंढरीच्या वारीतून मराठमोळ्या अभिनेत्रीने शेअर केला व्हिडिओ
18
"रावणाच्या तारखा माझ्यापेक्षा जास्त...", जयदीप अहलावतने दिला 'रामायण'ला नकार
19
परीक्षेत कमी गुण मिळाले, जाब विचारताच उलट बोलली, वडिलांकडून मुलीला बेदम मारहाण, तडफडून मृत्यू, सांगलीतील धक्कादायक घटना 
20
Video: चालत्या ट्रेनमध्ये मारहाण अन् चोरीचा प्रयत्न; अभिनेत्रीसोबत घडली धक्कादायक घटना

दुष्काळ, अतिवृष्टीचे अनुदान मिळेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2019 00:29 IST

जिल्हा बँक व काही ठिकाणी तलाठ्यांच्या हलगर्जीपणामुळे शेतकरी अजून देखील अनुदानापासून वंचीत आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे मोठ्या प्रमाणात शेतकरी आर्थिक अडचणीत सापडल्याचे चित्र आहे. त्यामुळे राज्य व केंद्र शासनाच्या वतीने आलेले अनुदानाचे पैसे त्यांना काहीसा दिलासा मिळण्याची आशा होती. मात्र, या अनुदानापैकी सर्वात जास्त रक्कम ही जिल्हा बँकेत जमा आहे. परंतु जिल्हा बँक व काही ठिकाणी तलाठ्यांच्या हलगर्जीपणामुळे शेतकरी अजून देखील अनुदानापासून वंचीत आहेत.जिल्ह्यात तीव्र दुष्काळ जाहीर केल्यानंतर केंद्र सरकारच्या माध्यमातून दोन टप्प्यात जवळपास ४२८ कोटी रुपयांची मदत जाहीर करण्यात आली होती. त्यानंतर त्याचे पैसे देखील जिल्हा प्रशासनाकडे आले. त्यानूसार प्रशासनाकडून हे सर्व अनुदानाचे पैसे शेतकऱ्यांना वाटप करण्यासाठी संबंधीत सर्व बँकामध्ये जमा केले. या अनुदानाची जवळापास २५० ते ३०० कोटी रुपये हे जिल्हा बँकेत जमा केले आहेत. पैसे जमा होऊन दिड ते दोन महिने झाले आहेत. मात्र, अजून देखील बहूतांश शेतकरी या मदतीपासून वंचित असल्याचे चित्र आहे. संबंधीत बँक व्यवस्थापकाशी बोलल्यानंतर योग्य पद्धतीने उत्तरे दिली जात नसल्याचे देखील शेतकऱ्यांमधून सांगण्यात आले. जिल्हा बँकेच्या शाखा इतर बँकेच्या तुलनेत सर्वाधिक आहेत. त्यांमुळे तात्काळ शेतकऱ्यांपर्यंत ही मदत पोहचावी यासाठी प्रशासनाच्या वतीने ही रक्कम जिल्हा बँकेत जमा केली जाते. परंतु अनुदान वाटप करण्यास अक्षम्य हलगर्जीपणा जिल्हा बँकेकडून होत असून अनुदानाचे पैसे बहुतांश शेतक-यांना मिळालेले नसल्यामुळे शेतक-यांवर पश्चाताप करण्याची वेळ आली आहे. यासंदर्भात जिल्हा बँकेचे व्यवस्थापक देशमुख यांना विचारले असता ते म्हणाले वर्णमालेनुसार पैसे वाटप करण्यात येत आहेत त्यामुळे उशीर लागत आहे.अनुदानाचा आम्हाला फायदा काय ?दुष्काळी परिस्थितीत शेतक-यांना शासनाच्या वतीने अनुदान दिले आहे. मात्र, वेळेवर अनुदानाचे पैसे मिळत नसतील तर दुष्काळी किंवा इतर अनुदानाचा फायदा काय असा प्रश्न शेतक-यांमधून विचारला जात आहे. तात्काळ अनुदानाची शिल्लक रक्कम वाटप करण्यात यावी अशी मागणी युवराज जगताप, महारुद्र वाघ, विक्रम खंडागळे, अशोक जगतपा, गणेश बहिरवाळ आदी. शेतक-यांनी केली आहे.तलाठ्यांची होणार चौकशी२०१६ साली झालेल्या अतिवृष्टी झाल्यामुळे त्याची मदत २०१८ च्या शेवटी जाहीर करण्यात आली होती. त्याची रक्कम देखील जिल्हा बँकेत जमा करण्यात आली आहे.यामध्ये अल्पभूधारक शेतक-यांना वगळून काही ठिकाणी तलाठ्यांनी मनमानी कारभार केल्याचे निष्पन्न झाल्यानंतर, तहसीलदार अविनाश शिंगटे यांनी असा प्रकरा करणा-या तलाठ्यांना नोटीस देऊन त्यांची चौकशी करण्यात येणार आहे.दोषी आढळल्यानंतर निलंबनाची कारवाई करण्यात येणार आहे. तसेच या अनुदानाचे ६८ कोटी रुपये देखील बँकेत जमा होऊन चार ते साडेचार महिने होत आहेत, मात्र अजून देखील अनेक शेतकरी या मदतीपासून वंचित असल्याची माहिती आहे.

टॅग्स :government schemeसरकारी योजनाdroughtदुष्काळFarmerशेतकरीbankबँक