शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
2
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
3
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
4
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
5
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
6
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
7
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
8
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
9
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
10
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
11
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
12
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
13
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
14
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
15
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
16
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
17
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
18
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
19
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
20
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका

गावरान आमराई नामशेष होण्याच्या मार्गावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 04:35 IST

अंबाजोगाई : अंबाजोगाई तालुक्यात बहुतेक गाव, वाडी, वस्ती, तांडेच्या शिवारात विविध जातीच्या गावरान आमराईच्या थाटी बहुतेक शेतकऱ्याच्या शेतात होती. ...

अंबाजोगाई : अंबाजोगाई तालुक्यात बहुतेक गाव, वाडी, वस्ती, तांडेच्या शिवारात विविध जातीच्या गावरान आमराईच्या थाटी बहुतेक शेतकऱ्याच्या शेतात होती. प्रत्येक आंब्याच्या वृक्षाची वेगळी ओळख. कालांतराने संकरित आंब्याच्या आगमनाने काळाच्या ओघात गावरान आमराई मात्र नामशेष होताना दिसत आहे. मोरेवाडी शिवारात वाडवडिलांची आठवण म्हणून गावरान आंब्याची आमराई मोरेवाडी ग्रामस्थ आजही जतन करत असून, गावरान आंब्याचा खार व रसाची चव मोरेवाडीकरांना आजही चाखायला मिळत आहे.

तालुक्यातील गाव, वाडी, वस्ती, तांड्यावर शेतकऱ्यांच्या बांधावर गावरान चार दोन तरी गावरान आंब्याची झाडे असायची. वाडवडिलांनी डोक्यावर पाणी आणून आमराई जोपासली. गावरान झाड भले मोठे तर व्हायचेच. पण दोन तीन गुंठे जागेची व्याप्तीचा भला मोठा घेर असायचा. या झाडांपासून फळांबरोबर उन्हाळ्यात सावलीचाही आधार शेतकऱ्यांना होता. प्रत्येक आंब्याला वेगळी चव व ओळख होती. गोट्या आंबा, काळी गोटी, केळीच्या आकाराचा केळ्या आंबा, मोठा शेंद्र्या आंबा, बारका शेंद्र्या आंबा, शेप्या आंबा काळसर व जास्त आंबट चव तो आमट्या, गोड आंबा, काळा गुंड, पांढरा गुंड, केसऱ्या, नाकाडया, शेप्या गोटी अशा आंब्यांची ओळख होती. एक एक आंब्याच्या घोसाला पंधरा ते वीस आंब्याच्या ओझ्याने कित्येक वेळा फांदी मोडून पडायची. एक वृक्षापासून पाच ते दहा हजार फळे मिळायची. गावरान आंब्याला मागणी वाढली असली तरी गावरान आमराई काळाच्या ओघात नामशेष झाल्या हे वास्तव आहे. संकरीत आंबा खाण्यासाठी गोड असला तरी शहरी, ग्रामीण भागात खारासाठी (लोणचे) मात्र गावरान आंब्याचा वापर केला जात आहे.

आंब्याच्या झाडाकडे पाहिले तर वाडवडिलांच्या आठवणीला उजाळा मिळतो व त्यांनी जोपासलेल्या आंब्याच्या स्वादाचा आनंद आमची पिढी घेत आहे. त्यावेळी वाडवडील एकोप्याने राहात होते म्हणून आमराई लावू शकले, हे मात्र नक्की आहे. - श्रीनिवास सदाशिव मोरे, शेतकरी मोरेवाडी.

माझ्या शेतात संकरीत आमराई जोपासली आहे. वातावरणात बदल झाला की, संकरीत आमराईवर रोगांचा प्रादुर्भाव होऊन मोहोराची गळती होते. संकरीत आंब्याला मागणी चांगली असली जोपासण्यासाठी खर्च जास्त लागतो. गावरान आंब्यावर बदलत्या वातावरणाचा प्रादुर्भाव जास्त होत नाही. पावसाच्या पाण्यावर गावरान झाडाचे संगोपन होते. ही आमराई खर्चिक नसते. - अनुरथ बांडे, शेतकरी, सुगाव.

===Photopath===

060521\06bed_1_06052021_14.jpg