शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
2
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
3
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
4
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
5
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
6
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
7
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
8
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
9
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
10
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
11
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
12
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
13
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
14
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट
15
Aadhaar: आधार कार्डावरील एका चुकीमुळे मोफत राशन आणि पीएफचे पैसे मिळणार नाहीत!
16
भिवंडीत डाईंग कंपनीस भीषण आग; कल्याण, उल्हासनगर, ठाणे अग्निशामक दलाची घ्यावी लागली मदत
17
इंस्टाग्रामवर फॉलोअर्स वाढवायचेत? 'या' टिप्स येतील कामी; धडाधड वाढतील व्ह्यूज, प्रोफाईलही दिसेल वेगळे 
18
Parth Pawar Land Scam Pune: नवी माहिती! पार्थ पवारांनी सहीचे अधिकार दिले होते दिग्विजय पाटलांना, ठराव समोर आल्यानं वेगळं वळण
19
'मै हूँ ना'मध्ये असती 'ही' अभिनेत्री, शूटिंगच्या दोन आठवड्यांपूर्वी सोडलेला सिनेमा; फराह खानचा खुलासा
20
संतापजनक! लहान मुलांना कागदाच्या तुकड्यांवर दिलं मध्यान्ह भोजन, Video पाहून बसेल धक्का

गावरान आमराई नामशेष होण्याच्या मार्गावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 04:35 IST

अंबाजोगाई : अंबाजोगाई तालुक्यात बहुतेक गाव, वाडी, वस्ती, तांडेच्या शिवारात विविध जातीच्या गावरान आमराईच्या थाटी बहुतेक शेतकऱ्याच्या शेतात होती. ...

अंबाजोगाई : अंबाजोगाई तालुक्यात बहुतेक गाव, वाडी, वस्ती, तांडेच्या शिवारात विविध जातीच्या गावरान आमराईच्या थाटी बहुतेक शेतकऱ्याच्या शेतात होती. प्रत्येक आंब्याच्या वृक्षाची वेगळी ओळख. कालांतराने संकरित आंब्याच्या आगमनाने काळाच्या ओघात गावरान आमराई मात्र नामशेष होताना दिसत आहे. मोरेवाडी शिवारात वाडवडिलांची आठवण म्हणून गावरान आंब्याची आमराई मोरेवाडी ग्रामस्थ आजही जतन करत असून, गावरान आंब्याचा खार व रसाची चव मोरेवाडीकरांना आजही चाखायला मिळत आहे.

तालुक्यातील गाव, वाडी, वस्ती, तांड्यावर शेतकऱ्यांच्या बांधावर गावरान चार दोन तरी गावरान आंब्याची झाडे असायची. वाडवडिलांनी डोक्यावर पाणी आणून आमराई जोपासली. गावरान झाड भले मोठे तर व्हायचेच. पण दोन तीन गुंठे जागेची व्याप्तीचा भला मोठा घेर असायचा. या झाडांपासून फळांबरोबर उन्हाळ्यात सावलीचाही आधार शेतकऱ्यांना होता. प्रत्येक आंब्याला वेगळी चव व ओळख होती. गोट्या आंबा, काळी गोटी, केळीच्या आकाराचा केळ्या आंबा, मोठा शेंद्र्या आंबा, बारका शेंद्र्या आंबा, शेप्या आंबा काळसर व जास्त आंबट चव तो आमट्या, गोड आंबा, काळा गुंड, पांढरा गुंड, केसऱ्या, नाकाडया, शेप्या गोटी अशा आंब्यांची ओळख होती. एक एक आंब्याच्या घोसाला पंधरा ते वीस आंब्याच्या ओझ्याने कित्येक वेळा फांदी मोडून पडायची. एक वृक्षापासून पाच ते दहा हजार फळे मिळायची. गावरान आंब्याला मागणी वाढली असली तरी गावरान आमराई काळाच्या ओघात नामशेष झाल्या हे वास्तव आहे. संकरीत आंबा खाण्यासाठी गोड असला तरी शहरी, ग्रामीण भागात खारासाठी (लोणचे) मात्र गावरान आंब्याचा वापर केला जात आहे.

आंब्याच्या झाडाकडे पाहिले तर वाडवडिलांच्या आठवणीला उजाळा मिळतो व त्यांनी जोपासलेल्या आंब्याच्या स्वादाचा आनंद आमची पिढी घेत आहे. त्यावेळी वाडवडील एकोप्याने राहात होते म्हणून आमराई लावू शकले, हे मात्र नक्की आहे. - श्रीनिवास सदाशिव मोरे, शेतकरी मोरेवाडी.

माझ्या शेतात संकरीत आमराई जोपासली आहे. वातावरणात बदल झाला की, संकरीत आमराईवर रोगांचा प्रादुर्भाव होऊन मोहोराची गळती होते. संकरीत आंब्याला मागणी चांगली असली जोपासण्यासाठी खर्च जास्त लागतो. गावरान आंब्यावर बदलत्या वातावरणाचा प्रादुर्भाव जास्त होत नाही. पावसाच्या पाण्यावर गावरान झाडाचे संगोपन होते. ही आमराई खर्चिक नसते. - अनुरथ बांडे, शेतकरी, सुगाव.

===Photopath===

060521\06bed_1_06052021_14.jpg