शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

हायवेवर मद्यविक्रीचा मार्ग मोकळा; बीड जिल्ह्यात निम्मे परवाने ठरणार पात्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2018 23:42 IST

किमान ५ हजार लोकसंख्या असणाऱ्या ग्रामपंचायत क्षेत्रातून जाणाºया राज्य व राष्टÑीय महामार्गावरील मद्य विक्रीच्या परवान्यांचे नुतनीकरण होणार असल्याने वर्षभर बंद असलेले राज्य व राष्टÑीय महामार्गावरील ग्रामपंचायत हद्दीतील बिअरबार, हॉटेल गजबजणार आहेत. मात्र शासन निर्णयानुसार निकष पूर्ण केल्यानंतरच या परवान्यांचे नुतनीकरण होणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : किमान ५ हजार लोकसंख्या असणाऱ्या ग्रामपंचायत क्षेत्रातून जाणाºया राज्य व राष्टÑीय महामार्गावरील मद्य विक्रीच्या परवान्यांचे नुतनीकरण होणार असल्याने वर्षभर बंद असलेले राज्य व राष्टÑीय महामार्गावरील ग्रामपंचायत हद्दीतील बिअरबार, हॉटेल गजबजणार आहेत. मात्र शासन निर्णयानुसार निकष पूर्ण केल्यानंतरच या परवान्यांचे नुतनीकरण होणार आहे.

सर्वोच्च न्यायालयाने तामिळनाडू राज्य विरुद्ध के. बालू व इतर सिव्हील अपील प्रकरणात १५ डिसेंबर २०१६ रोजी दिलेल्या आदेशामुळे राज्य व राष्टÑीय महामार्गावरील ग्रामपंचायत हद्दीमधून गेलेल्या मद्यविक्री दुकानांचे परवाने १ एप्रिल २०१७ नंतर नुतनीकरण करण्यास प्रतिबंध घालण्यात आले होते.

त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने १३ डिसेंबर २०१७ व २३ फेब्रुवारी २०१८ रोजी दिलेल्या आदेशाच्या अनुषंगाने याचिकाकर्त्यांनी तसेच अन्य परवानाधारकांनी सादर केलेल्या निवेदनाची दखल घेत शासनाने चारपैकी एक निकष पूर्ण करणा-या परवान्यांचे नूतनीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे.

निकषपात्र परवान्यांचे नूतनीकरणग्रामपंचायतींच्या मंजूर विकास आराखड्याची जिल्हा परिषदेकडून तसेच पर्यटन स्थळाबाबत वन आणि पर्यटन विभागाकडून माहिती घेत आहोत. शासनाच्या निर्णयानुसार ज्या ग्रामपंचायतींचा विकास आराखडा मंजूर आहे किंवा चारपैकी एका निकषात पात्र परवान्यांचे नूतनीकरण होऊ शकेल.- एन. के. धार्मिक, अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, बीड.

चार निकष : विकास आराखडा महत्त्वाचाकिमान ५ हजार लोकसंख्या असणारे ग्रामपंचायत क्षेत्र (२०११ च्या जनगणनेनुसार),ग्रामपंचायत क्षेत्रामध्ये महाराष्टÑ औद्योगिक विकास महामंडळ विकसित केलेले औद्योगिक क्षेत्र असल्यासजागतिक वारसा पर्यटन स्थळ व केंद्र शासन किंवा राज्य शासनाने घोषित केलेले पर्यटन स्थळज्या ग्रामपंचायतीचा विकास आराखडा शासनाने मंजूर केला असेल असे क्षेत्र निकषपात्र ठरणार आहेत.

२०० पैकी किती पात्र ठरणार१ एप्रिल २०१७ पासून मद्यविक्री परवान्यांच्या नुतनीकरणास प्रतिबंध होता. देशी विदेशी दारु, बारचे २०० परवाने नुतनीकरण झाले नव्हते. आता शासनाच्या ३१ मार्चच्या निर्णयानुसार या दुकानांची निकषपात्र माहिती संकलित करण्याचे काम सुरु आहे. नुतनीकरणाच्या प्रतीक्षेतील परवाने असलेल्या ३६ गावांची लोकसंख्या ५ हजार इतकी असल्याचे सांगण्यात येते. आता किती परवाने पात्र ठरणार याकडे लक्ष लागले आहे.

शासनाचा महसूल वाढणार३१ मार्चपर्यंत मद्यविक्रीचे ३५० परवाने नुतनीकरण जिल्ह्यात झाले असून, शासनाला३ कोटी रुपये महसूल मिळाला. या शासन निर्णयामुळे निकषपात्र परवाना नुतनीकरणानंतर ५० ते ६० लाख रुपयांचा महसूल वाढू शकतो.

टॅग्स :Beedबीडliquor banदारूबंदीMarathwadaमराठवाडाhighwayमहामार्ग