शहरं
Join us  
Trending Stories
1
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
2
Sangamner Nagar Parishad Election Result 2025: संगमनेरमध्ये पुन्हा 'तांबे-थोरात' पॅटर्न; डॉ. मैथिली तांबे महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने विजयी
3
Khed Nagar Parishad Election Result 2025: “कोकणातील विजय हा मुंबई मनपा विजयाची नांदी”; एकनाथ शिंदे यांच्या शिलेदाराचे मोठे भाकित
4
एका आठवड्यात चांदी १६ हजारांनी महागली; वर्षात दिला १२६% परतावा, सोन्याची काय स्थिती?
5
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील २४६ नगरपरिषदांमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
6
IND vs PAK U19 Asia Cup: कोण आहे Sameer Minhas? ज्यानं दोन वेळा मोडला वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड
7
सावधान! तुमचं बँक खातंही होऊ शकतं रिकामं! आधार कार्ड सुरक्षित ठेवण्यासाठी करा 'बायोमॅट्रिक लॉक'
8
Maharashtra Election Results 2025: भाजपाचं 'शतक', ठाकरेसेना सगळ्यात मागे; सर्वाधिक नगराध्यक्ष कुणाचे? शिंदे-अजितदादांमध्ये 'टफ फाइट'
9
Loha Nagar Parishad Election Result 2025: लोह्यात भाजपाला घराणेशाहीचा मोठा फटका; एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव
10
'आता तरी आपली लायकी ओळखावी' ; परळीतील विजयानंतर धनंजय मुंडेंची खा. सोनवणेंवर टीका
11
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: राज्यात शिवसेनेची जोरदार फाईट, भाजपाही मजबूत; उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला किती जागा? जाणून घ्या
12
भोकरदनमध्ये दानवे पिता-पुत्रांना मोठा धक्का, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या समरीन मिर्जा विजयी; भाजपला किती जागा मिळाल्या? 
13
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 : 'एकदम ओक्के'! सर्वांनी एकट पाडलं, पण शहाजीबापूंनी मैदान मारलं; सांगोल्यात शिवसेनेचा मोठा विजय
14
Nitesh Rane: निवडणुका संपल्या, आता...; सिंधुदुर्गातील निकाल स्पष्ट होताच नितेश राणे म्हणाले...
15
Shahada Nagar Parishad Election Results 2025: २९ पैकी २० जागा भाजपाने जिंकल्या, पण नगराध्यक्षद जनता विकास आघाडीकडे
16
Bhagur Nagar Parishad Election Result 2025: २७ वर्षांची शिवसेनेची सत्ता गेली, भगूरमध्ये अजित पवार गटाचा मोठा विजय; ‘अशी’ झाली लढत!
17
Kankavali Nagar Parishad Election Result 2025: कणकवलीत भाजपा मंत्री नितेश राणेंना मोठा धक्का; शहर विकास आघाडीचे संदेश पारकर विजयी
18
Georai Nagar Parishad Election Result 2025: गेवराईत भाजपचे कमळ फुलले; नगराध्यक्षपदाच्या उमेदवार गीता पवार विजयी
19
शूटिंग करताना अक्षय खन्नाला 'या' गोष्टीचा होतो त्रास, 'धुरंधर' अभिनेता म्हणाला- "रात्रीच्या वेळी मला..."
Daily Top 2Weekly Top 5

मराठवाड्यात आणखी चार शेतकऱ्यांच्या आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2019 12:53 IST

यात बीड जिल्ह्यातील तीन शेतकऱ्यांचा समावेश असून चौथी घटना ही उस्मानाबाद जिल्ह्यात घडली आहे. 

आष्टी/अंबाजोगाई/केज (जि. बीड)/येडशी (जि. उस्मानाबाद) : आर्थिक कणा मोडल्याने कोलमडून पडलेल्या मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबता थांबत नसून गेल्या पंधरवड्यापासून त्यात मोठी वाढ झाली आहे. रविवारीही चार शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळल्याची घटना घडली. यात बीड जिल्ह्यातील तीन शेतकऱ्यांचा समावेश असून चौथी घटना ही उस्मानाबाद जिल्ह्यात घडली आहे. 

पहिल्या घटनेत बीड जिल्ह्यातील शेकापूर (ता. आष्टी) येथील जालिंदर नामदेव शिंदे (५२) या शेतकऱ्याने नापिकी व खाजगी सावकाराच्या कर्जाला कंटाळून १५ नोव्हेंबर रोजी राहत्या घरी गळफास घेतला. जालिंदर शिंदे हे शेतातील काही हाती लागले नसल्याने नैराश्यात होते. यातच त्यांनी जीवन संपविले. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले असा परिवार आहे. याप्रकरणाची नोंद आष्टी पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. पुढील तपास पो. हवालदार नवनाथ काळे हे करत आहेत.

दुसऱ्या घटनेत पिंपळा धायगुडा (ता. अंबाजोगाई) येथील प्रताप मोहनराव धायगुडे (४०) या शेतकऱ्याने आत्महत्या केली.प्रताप धायगुडे हे अल्पभूधारक शेतकरी होते. सततच्या नापिकीमुळे ते त्रस्त झाले होते. आर्थिक विवंचनेतून ते नेहमी तणावात असत. अखेर त्यांनी शनिवारी मध्यरात्री गळफास घेऊन आत्महत्या केली. रविवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. अंबाजोगाई ग्रामीण पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे.तिसऱ्या घटनेत येवता (ता.केज) येथील  विष्णूपंत कुंडलिक काळे (५२) या शेतकऱ्याने शनिवारी रात्री कर्जबाजारीपणाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केली. शनिवारी रात्री घडली. परतीच्या पावसाने हातात आलेली पिके हातची गेली. त्यामुळे मुलींच्या लग्नासाठी घेतलेले बँकेचे कर्ज कसे फेडावे. कुटुंबाचा उदरिनर्वाह कसा चालवावा या विवंचनेत त्यांनी आत्महत्या केली. त्यांच्या पश्चात पत्नी व चार मुली असा परिवार आहे.  

उस्मानाबादेत तरुण शेतकऱ्याने घेतला गळफासउस्मानाबाद तालुक्यातील आळणी येथील सचिन विजयसिंह वीर (२६) या तरुण शेतकऱ्याने शेतातील बाभळीच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना रविवारी सकाळी ६ वाजता घडली.सचिन वीर यांच्या पिकांचे अवकाळी पावसामुळे मोठे नुकसान झाले होते. त्यामुळे उत्पादन खर्चही हाती पडतो की नाही, या विवंचनेत ते होते. यातूनच त्यांनी गळफास घेतला. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोनि. बी.बी. नाईकनवरे व हेकॉ. विजयानंद साखरे यांनी घटनास्थळास भेट देऊन पंचनामा केला. या प्रकरणी ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास हेकॉ. साखरे हे करीत आहेत.

टॅग्स :farmer suicideशेतकरी आत्महत्याagricultureशेतीMarathwadaमराठवाडा