शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

चार महिन्यांच्या कष्टाचा आठ दिवसांत चिखल; कांद्याच्या नुकसानीने शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रु

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2025 20:22 IST

अवकाळी व नंतर मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावल्याने चार महिन्यांच्या कष्टाचा आठ दिवसांत चिखल झाला.

- नितीन कांबळेकडा (जि. बीड) : कुटुंबाची आर्थिक घडी बसावी यासाठी उसनवारी आणि घरातील किडूक-मिडूक मोडून शेतकऱ्यांनी नगदी पीक म्हणून कांदा लागवड केली. कांदा काढून शेतात कापणीसाठी ठेवला तर काहींनी साठवणूक केली. पण अवकाळी व नंतर मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावल्याने चार महिन्यांच्या कष्टाचा आठ दिवसांत चिखल झाला. आष्टी तालुक्यातील साडेतीन हजार हेक्टर क्षेत्रातील कांद्याचे नुकसान झाले आहे.

आष्टी तालुक्यातील शेतकरी नगदी पीक म्हणून कांद्याची मोठ्या प्रमाणावर लागवड करतात. साडेतीन चार महिने काबाडकष्ट करून लाखो रूपयांची गुंतवणूक करतात. उन्हाळ्यात लागवड केलेल्या कांद्याला भाववाढ नसल्याने भुसारात साठवणूक करतात. तर काही शेतकरी उसनवारी घेतलेला पैसा मोकळा करण्यासाठी कांदा काढून शेतात ठेवून जागेवर भरतात. परंतु, अचानक झालेल्या अवकाळी पावसामुळे साडेतीन हजार हेक्टर क्षेत्रावरील कांद्याचे नुकसान झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. हातातोंडाशी आलेल्या घासाची माती झाल्याने शेतकरी रडकुंडीला आला आहे.

आले तर लाख,नाहीतर चिखल माती अन् राख !कांदा हे नगदी पीक आहे. कमी दिवसांत जास्त उत्पन्न मिळावे म्हणून राबायचे, पण भाव नसल्याने कांदा साठवणूक करायची, भाव भेटला तर घाईगडबडीत कांदा काढून शेतातच गोण्या भरायच्या, पण अवकाळीने गाठल्यावर हाती चिखल येतो. आले तर लाख, नाहीतर चिखलमाती अन् पदरी राख, अशी अवस्था होते.

कृषी विभागाकडून पंचनामे सुरूतालुक्यात अवकाळी पावसाने साडेतीन हजार हेक्टर क्षेत्रावरील कांद्याचे तसेच इतर शेतीपिकांचे नुकसान झाले असून, कृषी विभागाकडून नुकसानीचे पंचनामे करणे सुरू असल्याचे तालुका कृषी अधिकारी गोरख तरटे यांनी ‘लोकमत’ला सांगितले.

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरीRainपाऊसBeedबीड