शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

चार महिन्यांच्या कष्टाचा आठ दिवसांत चिखल; कांद्याच्या नुकसानीने शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रु

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2025 20:22 IST

अवकाळी व नंतर मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावल्याने चार महिन्यांच्या कष्टाचा आठ दिवसांत चिखल झाला.

- नितीन कांबळेकडा (जि. बीड) : कुटुंबाची आर्थिक घडी बसावी यासाठी उसनवारी आणि घरातील किडूक-मिडूक मोडून शेतकऱ्यांनी नगदी पीक म्हणून कांदा लागवड केली. कांदा काढून शेतात कापणीसाठी ठेवला तर काहींनी साठवणूक केली. पण अवकाळी व नंतर मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावल्याने चार महिन्यांच्या कष्टाचा आठ दिवसांत चिखल झाला. आष्टी तालुक्यातील साडेतीन हजार हेक्टर क्षेत्रातील कांद्याचे नुकसान झाले आहे.

आष्टी तालुक्यातील शेतकरी नगदी पीक म्हणून कांद्याची मोठ्या प्रमाणावर लागवड करतात. साडेतीन चार महिने काबाडकष्ट करून लाखो रूपयांची गुंतवणूक करतात. उन्हाळ्यात लागवड केलेल्या कांद्याला भाववाढ नसल्याने भुसारात साठवणूक करतात. तर काही शेतकरी उसनवारी घेतलेला पैसा मोकळा करण्यासाठी कांदा काढून शेतात ठेवून जागेवर भरतात. परंतु, अचानक झालेल्या अवकाळी पावसामुळे साडेतीन हजार हेक्टर क्षेत्रावरील कांद्याचे नुकसान झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. हातातोंडाशी आलेल्या घासाची माती झाल्याने शेतकरी रडकुंडीला आला आहे.

आले तर लाख,नाहीतर चिखल माती अन् राख !कांदा हे नगदी पीक आहे. कमी दिवसांत जास्त उत्पन्न मिळावे म्हणून राबायचे, पण भाव नसल्याने कांदा साठवणूक करायची, भाव भेटला तर घाईगडबडीत कांदा काढून शेतातच गोण्या भरायच्या, पण अवकाळीने गाठल्यावर हाती चिखल येतो. आले तर लाख, नाहीतर चिखलमाती अन् पदरी राख, अशी अवस्था होते.

कृषी विभागाकडून पंचनामे सुरूतालुक्यात अवकाळी पावसाने साडेतीन हजार हेक्टर क्षेत्रावरील कांद्याचे तसेच इतर शेतीपिकांचे नुकसान झाले असून, कृषी विभागाकडून नुकसानीचे पंचनामे करणे सुरू असल्याचे तालुका कृषी अधिकारी गोरख तरटे यांनी ‘लोकमत’ला सांगितले.

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरीRainपाऊसBeedबीड