शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

चार महिन्यांनंतर जाणवला पावसाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2019 23:37 IST

रविवारी जिल्ह्यात परतीच्या पावसामुळे समाधान व्यक्त होत असून चार महिन्यानंतर आनंदाचे डोही आनंदाचे तरंग जाणवू लागले आहे.

ठळक मुद्देबीड जिल्ह्यात सर्वदूर पाऊस : बंधारे, नद्यांना पाणी; परतीच्या पावसाने समाधान; सातपुते वस्तीवर वीज कोसळून घोडा ठार

बीड : रविवारी जिल्ह्यात परतीच्या पावसामुळे समाधान व्यक्त होत असून चार महिन्यानंतर आनंदाचे डोही आनंदाचे तरंग जाणवू लागले आहे. सकाळपासूनच सर्वत्र ढगाळ वातावरण होते, त्यामुळे सूर्यदर्शन झाले नाही. दुपारपासून जिल्ह्यात पावसाने चांगली हजेरी लावली. गेवराईत दीड तास चांगला पाऊस झाला. धारुर, केज, वडवणी तालुक्यात काही ठिकाणी जोरदार तर काही ठिकाणी रिमझिम पाऊस झाला. शिरुर कासार तालुक्यातील रूप्पुर, गोमळवाडा, वारणी भागात पाऊस झाला. बंडाळ्याच्या ओढ्याला आलेले पाणी सिध्देश्वर बंधाऱ्यात पोहचले. पिंळनेर परिसरातील रिद्धीसिद्धी नदीला पाणी आले, तर मांजरसुंभा, चौसाळा, पालसिंगण परिसरातही चांगला पाऊस झाला.येल्डा येथे वीज कोसळलीअंबाजोगाई तालुक्यातील येल्डा परिसरातील सातपुते वस्तीवर रविवारी कानिकनाथ शंकर सातपुते हे परिसरातील माळावर मेंढ्या चारत होते. त्यासोबतच त्यांच्या मालकीचा घोडाही चरत होता. त्यांच्याच शेजारी भगवान सातपुते यांचीही जनावरे चरण्यासाठी सोडलेली होती. दुपारी ३.३० ते ४ च्या दरम्यान अचानक गरजण्याचा आवाज झाला अंगावरच वीज कोसळल्याने घोडा जागीच ठार झाला. सुदैवाने कानिकनाथ व भगवान हे दोघे घटनेपासून शंभर फूट अंतरावर होते. त्यांच्यासमोर ही वीज कोसळली. विजेच्या धक्क्याने काही क्षण या दोघांच्या डोळ्यांसमोर काळोख झाला. अंधारी गेल्यावर पाहिले तर घोडा मरण पावलेला होता, असे भगवान सातपुते यांनी सांगितले. इतर जनावरे मात्र सुरक्षित राहिली. या घटनेमुळे कानिकनाथ यांचे ५० ते ६० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.दरम्यान, या घटनेची माहिती तलाठी व गावच्या सरपंचाना दिली होती. परंतू सायंकाळपर्यंत पंचनामा झालेला नव्हता.सिद्धेश्वर बंधारा भरला : कापरी नदीला पूरपाणी टंचाई हे सातत्याचे समिकरण असलेल्या शिरूर शहराला रविवारी आनंदाची वार्ता पावसाने दिली. शहराजवळ असलेला सिध्देश्वर बंधारा भरला तर कापरी नदी देखील भरून गेल्याने चांगला दिलासा मिळाला. रविवारी कालिका देवी मंदिरात अष्टमीचा होमहवन विधी होऊन पुर्णाहुती झाली. त्याचबरोबर बंधारा देखील भरल्याने समाधान व्यक्त होत आहे.गेली वर्षभर टॅकरवर शहर विसंबुन होते सतत पाऊस धरसोड करत होता ,बंधारा आणि मध्यम प्रकल्प यावर्षी भरण्याची आशा धुसर झाली होती. पाणी टंचाई समस्या निर्माण होते किंवा काय अशी शंका वाटू लागली असतानाच रविवारी प्रथमच सिध्देश्वर बंधारा भरल्याने आता सिंदफणा व उथळा मध्यमप्रकल्प देखील भरतील अशी आशा लागली आहे .

टॅग्स :BeedबीडRainपाऊस