शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Local Body Elections: २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतीसाठी निवडणूक जाहीर; 'असा' आहे कार्यक्रम, 'दुबार मतदार'ही समजणार
2
दुबार मतदारांच्या नावासमोर 'डबल स्टार' येणार; राज्य निवडणूक आयोगाचं मोठं पाऊल, कशी असेल नवी मोहीम?
3
लग्नात का येताहेत समस्या? कोणत्या सुधारणा आवश्यक? न्यायालयानं स्पष्टच सांगितलं
4
माणुसकीचा जमानाच राहीला नाही! ओला रायडरची मदत केली अन् तो तरुणीसोबत 'असा' वागला
5
अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा शिंदेंना धक्का, रायगडमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेशी आघाडी
6
महादेव बेटिंग अ‍ॅप प्रकरणातील मुख्य आरोपी दुबईतून बेपत्ता, भारताच्या प्रत्यार्पणाच्या आशेला धक्का
7
'या' योजनेत गुंतवणूक केल्यास मिळेल दुहेरी फायदा आणि तगडा परतावा, निवृत्तीनंतरचे टेन्शन होईल 'गायब'!
8
सप्तपदीनंतर दोन तासांत लग्न मोडलं, वधू पक्षाने वराला झोड झोड झोडलं, नेमकं काय घडलं?  
9
कॅनडाने भारतीय विद्यार्थ्यांना दिला मोठा धक्का, ७४% विद्यार्थी व्हिसा अर्ज नाकारले
10
उद्योग जगताला मोठा धक्का! हिंदुजा ग्रुपचे अध्यक्ष गोपीचंद पी. हिंदुजा यांचे लंडनमध्ये निधन
11
चॅटजीपीटी आता तुम्हाला 'या' मुद्द्यांवर सल्ला देणार नाही! कंपनीने का बदलले नियम?
12
'एक गरिबांचा, तर दुसरा श्रीमंतांचा; दोन देश निर्माण केले', राहुल गांधींचा PM मोदींवर निशाणा
13
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किंमतीत मोठी घसरण, Silver ₹३५०० तर Gold किती रुपयांनी झालं स्वस्त?
14
DSP Rishikant Shukla: दहा वर्षांच्या सेवेतच जमवली १०० कोटींची माया; एक दोन नव्हे, तब्बल १२ भूखंड, ११ दुकाने अन्...
15
पत्नीने दिला जुळ्यां मुलांना जन्म, पती म्हणाला, ही माझी मुलंच नाहीत, जोरदार राडा, अखेरीस समोर आलं वेगळंच सत्य
16
बाजारात खळबळ! Hyundai ने ₹७.९० लाखात लाँच केली नवीन 'व्हेन्यू २०२५'; जबरदस्त फीचर्स आणि ADAS सह एंट्री
17
अरे व्वा! पांढरे केस हे वाढलेल्या वयाचं लक्षण नाही, ही तर आहे शरीरासाठी संरक्षण ढाल
18
दीड वर्षांपूर्वीच्या पल्लेदार कौशल हत्येचा पर्दाफाश! बायकोच्या 'डबल गेम'ने पोलीसही हादरले
19
मैदान गाजवले, आता ब्रँड व्हॅल्यूही वाढली! महिला क्रिकेटपटूंच्या कमाईत दुप्पट वाढ; सर्वाधिक फी कोणाची?
20
पाकिस्तानच्या सुप्रीम कोर्टात मोठा स्फोट! इस्लामाबादमध्ये खळबळ; बेसमेंटमध्ये झालेल्या ब्लास्टने इमारतीला हादरवले

डोक्यावर आग, टंचाईमुळे पोटात गोळा; बीडमध्ये सव्वापाच लाख लोकांचा टँकरकडे डोळा

By शिरीष शिंदे | Updated: May 4, 2024 18:16 IST

बीड जिल्ह्यात दिवसेंदिवस टँकरच्या मागणीत होतेय वाढ; ३१४ टँकरवर सव्वापाच लाख लोकांची भिस्त

बीड : जिल्ह्यात दुष्काळी परिस्थितीमुळे तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. ग्रामीण भागात पाण्याचे स्रोत आटल्यामुळे त्यांना टँकरवर अवलंबून राहावे लागत आहे. आजघडीला जिल्ह्यातील ५ लाख ३७ हजार ४७ लोकांची तहान ३१४ टँकरद्वारे भागविली जात आहे. दिवसेंदिवस टँकरच्या मागणीत वाढ होत असल्याचे दिसून येत आहे.

मागच्या वर्षी पावसाळ्यात समाधानकारक पाऊस झाला नाही. जिल्हा प्रशासनाकडील आकडेवारीनुसार ७१ टक्के पाऊस झाला आहे. परंतु, या पावसामुळे नद्या खळखळून वाहिल्या नाहीत. परिणामी, लहान-मोठ्या तलावांत पाणीसाठाच झाला नाही. त्या-त्या वेळी पडलेल्या पावसामुळे फारशी पाणीटंचाई जाणवत नव्हती. दरम्यान, मागच्या वर्षी नोव्हेंबर महिन्यामध्ये अवकाळी पाऊस झाला, त्यानंतर जानेवारी महिन्यातसुद्धा अवकाळी बरसला. त्यामुळे थोडाफार आधार निर्माण झाला होता. एप्रिल महिन्यात झालेल्या अवकाळी पावसाचे बाष्पीभवन वेगाने झाले. परंतु, आता उन्हाच्या तीव्र झळा बसत आहेत. दिवसभराच्या अति उन्हामुळे जमीन तप्त होत आहे. पाणीपातळी खालावली असल्याने ग्रामीण भागात जलस्रोतच शिल्लक राहिलेले नाहीत. पर्याय नसल्यामुळे गावे, वाड्यामधून टँकर मागणीत वाढ होऊ लागली आहे. तहसीलदारांकडे अर्ज दाखल केल्यानंतर उपविभागीय अधिकारी टँकरला मंजुरी देत आहेत. ज्या ठिकाणी टँकरची मागणी होत आहे त्या ठिकाणी सर्व प्रक्रिया पूर्ण करून तत्काळ टँकरची सोय केली जात आहे.

शासकीय टँकर केवळ दोनचबीड जिल्ह्यातील जनतेला पाणीपुरवठा करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने यापूर्वीच टेंडर काढलेले आहे. त्यानुसार पाणीपुरवठा केला जात आहे. विशेष म्हणजे, केवळ दोन शासकीय टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. शासनाकडे टँकरच नसल्याने खासगी टेंडर काढावे लागले असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

४५१ गाव-वाड्यांची सोयबीड जिल्ह्यात २४३ गावे तर २०८ वाड्यांना टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. शासकीय २ तर खासगी ३१२ टँकरद्वारे ही सेवा दिली जात आहे. संबंधित टेंडरधारकास ७३९ खेपा मंजूर करण्यात आल्या आहेत. त्यापैकी ७१८ खेपा पूर्ण झाल्या असून, मागणी अधिक असल्याने २१ खेपा कमी झाल्या असल्याचे आकडेवारीवरून दिसून येत आहे.

२५९ विहिरी, बोअरचे अधिग्रहणग्रामीण भागातील लोकांना गावातच पाण्याची सोय व्हावी यासाठी २५९ विहिरी, बोअरचे अधिग्रहण करण्यात आले आहे. त्यामुळे अनेकांना त्या ठिकाणावरून पाणी मिळत आहे. तसेच टँकरसाठी ६६ बोअर, विहिरींचे अधिग्रहण झाले आहे. जलस्रोत लांब किंवा उपलब्ध नसल्याने ही सोय करण्यात आली आहे. अनेक ठिकाणचे जलस्रोत आटल्यामुळे काही बोअरचा आधार घेतला जात आहे.

शहरी भागातही पाण्याच्या झळाकेवळ ग्रामीण भागातच नव्हे, तर शहरी भागातही गंभीर पाणीटंचाई निर्माण झाली आहे. बीड नगर पालिकेच्या वतीने पूर्वी ८ दिवसाला पाणी दिले जात असे; परंतु, आता २५ दिवसाला पाणी सोडले जात आहे. शहरी भागातील नागरिकांना खासगी टँकरचा आधार घ्यावा लागत आहे.

तालुका-टँकरवर अवलंबित लोकसंख्या - एकूण सुरू टँकरबीड - २,०५,९२४ - ११२गेवराई - १,५८,७०९ - ९८वडवणी - १७,४७९ - ११शिरुर - ३७,७२० - २९पाटोदा - २३,११७ - १३आष्टी - ४८,८३७ - २७अंबाजोगाई - ३,८९८ - २केज - ६,३५० - ४परळी - १७,७०७ - ७धारुर - १४,४३४ - ९माजलगाव - २,८७२ - २एकूण - ५,३७,०४७ - ३१४

टॅग्स :BeedबीडWaterपाणीwater scarcityपाणी टंचाई