शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानसोबत मॅच खेळायची असेल तर पहलगाममध्ये मारला गेलेला माझा भाऊ परत आणून द्या"
2
'ऑपरेशन सिंदूरदरम्यान काँग्रेस पाकिस्तानी सैन्याच्या बाजूने होती', पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
3
"मी शिव भक्त, सर्व विष गिळून टाकतो...", पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; म्हणाले...
4
पाकिस्तानविरुद्ध खेळण्यास देशातून तीव्र विरोध, टीम इंडिया दबावात, ड्रेसिंग रूममधून आली अशी बातमी
5
हरमनप्रीत कौरनं रचला इतिहास; आता 'या' दिग्गज खेळाडूंसोबत घेतलं जाईल नाव!
6
Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य
7
BMW ने कार आणि बाईक्सच्या किमतीत केली मोठी कपात; तब्बल ₹१३.६ लाखांची होणार बचत...
8
सोन्याची विक्रमी झेप! आठवड्यात ३,३०० रुपयांनी महागले; चांदीचाही नवा उच्चांक, आजचा दर काय?
9
टीम इंडियाला धक्का! पाकिस्तानविरूद्धच्या सामन्याआधी शुबमन गिलच्या हाताला दुखापत, अपडेट काय?
10
Sushila Karki: 'आम्ही सत्तेचा आस्वाद घेण्यासाठी आलेलो नाही, ६ महिन्यांतच...' पंतप्रधान सुशीला कार्की 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये!
11
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
12
तुमचे LPG गॅस सिलेंडरचे अनुदान बंद झाले? घरबसल्या मोबाईलवरुन करता येईल सुरू
13
अलर्ट मोड ऑन! फेस्टिव्ह सेलच्या स्वस्ताईला भुलू नका; एक चूक अन् गमवाल आयुष्यभराची कमाई
14
शेतकऱ्यांनो, दिवाळीआधी PM किसानचा २१वा हप्ता येणार का? वाचा कधी जमा होणार पैसे?
15
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
16
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
17
लोकप्रिय 'दामिनी' मालिका पुन्हा येतेय प्रेक्षकांच्या भेटीला, ही अभिनेत्री मुख्य भूमिकेत, या चॅनेलवर होणार प्रसारण
18
चालकाचं नियंत्रण सुटलं अन् कार थेट उड्डाणपुलावरून खाली रेल्वे रुळावर पडली!
19
निम्न तेरणा प्रकल्पातून ७६३६ क्युसेक पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
20
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?

डोक्यावर आग, टंचाईमुळे पोटात गोळा; बीडमध्ये सव्वापाच लाख लोकांचा टँकरकडे डोळा

By शिरीष शिंदे | Updated: May 4, 2024 18:16 IST

बीड जिल्ह्यात दिवसेंदिवस टँकरच्या मागणीत होतेय वाढ; ३१४ टँकरवर सव्वापाच लाख लोकांची भिस्त

बीड : जिल्ह्यात दुष्काळी परिस्थितीमुळे तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. ग्रामीण भागात पाण्याचे स्रोत आटल्यामुळे त्यांना टँकरवर अवलंबून राहावे लागत आहे. आजघडीला जिल्ह्यातील ५ लाख ३७ हजार ४७ लोकांची तहान ३१४ टँकरद्वारे भागविली जात आहे. दिवसेंदिवस टँकरच्या मागणीत वाढ होत असल्याचे दिसून येत आहे.

मागच्या वर्षी पावसाळ्यात समाधानकारक पाऊस झाला नाही. जिल्हा प्रशासनाकडील आकडेवारीनुसार ७१ टक्के पाऊस झाला आहे. परंतु, या पावसामुळे नद्या खळखळून वाहिल्या नाहीत. परिणामी, लहान-मोठ्या तलावांत पाणीसाठाच झाला नाही. त्या-त्या वेळी पडलेल्या पावसामुळे फारशी पाणीटंचाई जाणवत नव्हती. दरम्यान, मागच्या वर्षी नोव्हेंबर महिन्यामध्ये अवकाळी पाऊस झाला, त्यानंतर जानेवारी महिन्यातसुद्धा अवकाळी बरसला. त्यामुळे थोडाफार आधार निर्माण झाला होता. एप्रिल महिन्यात झालेल्या अवकाळी पावसाचे बाष्पीभवन वेगाने झाले. परंतु, आता उन्हाच्या तीव्र झळा बसत आहेत. दिवसभराच्या अति उन्हामुळे जमीन तप्त होत आहे. पाणीपातळी खालावली असल्याने ग्रामीण भागात जलस्रोतच शिल्लक राहिलेले नाहीत. पर्याय नसल्यामुळे गावे, वाड्यामधून टँकर मागणीत वाढ होऊ लागली आहे. तहसीलदारांकडे अर्ज दाखल केल्यानंतर उपविभागीय अधिकारी टँकरला मंजुरी देत आहेत. ज्या ठिकाणी टँकरची मागणी होत आहे त्या ठिकाणी सर्व प्रक्रिया पूर्ण करून तत्काळ टँकरची सोय केली जात आहे.

शासकीय टँकर केवळ दोनचबीड जिल्ह्यातील जनतेला पाणीपुरवठा करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने यापूर्वीच टेंडर काढलेले आहे. त्यानुसार पाणीपुरवठा केला जात आहे. विशेष म्हणजे, केवळ दोन शासकीय टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. शासनाकडे टँकरच नसल्याने खासगी टेंडर काढावे लागले असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

४५१ गाव-वाड्यांची सोयबीड जिल्ह्यात २४३ गावे तर २०८ वाड्यांना टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. शासकीय २ तर खासगी ३१२ टँकरद्वारे ही सेवा दिली जात आहे. संबंधित टेंडरधारकास ७३९ खेपा मंजूर करण्यात आल्या आहेत. त्यापैकी ७१८ खेपा पूर्ण झाल्या असून, मागणी अधिक असल्याने २१ खेपा कमी झाल्या असल्याचे आकडेवारीवरून दिसून येत आहे.

२५९ विहिरी, बोअरचे अधिग्रहणग्रामीण भागातील लोकांना गावातच पाण्याची सोय व्हावी यासाठी २५९ विहिरी, बोअरचे अधिग्रहण करण्यात आले आहे. त्यामुळे अनेकांना त्या ठिकाणावरून पाणी मिळत आहे. तसेच टँकरसाठी ६६ बोअर, विहिरींचे अधिग्रहण झाले आहे. जलस्रोत लांब किंवा उपलब्ध नसल्याने ही सोय करण्यात आली आहे. अनेक ठिकाणचे जलस्रोत आटल्यामुळे काही बोअरचा आधार घेतला जात आहे.

शहरी भागातही पाण्याच्या झळाकेवळ ग्रामीण भागातच नव्हे, तर शहरी भागातही गंभीर पाणीटंचाई निर्माण झाली आहे. बीड नगर पालिकेच्या वतीने पूर्वी ८ दिवसाला पाणी दिले जात असे; परंतु, आता २५ दिवसाला पाणी सोडले जात आहे. शहरी भागातील नागरिकांना खासगी टँकरचा आधार घ्यावा लागत आहे.

तालुका-टँकरवर अवलंबित लोकसंख्या - एकूण सुरू टँकरबीड - २,०५,९२४ - ११२गेवराई - १,५८,७०९ - ९८वडवणी - १७,४७९ - ११शिरुर - ३७,७२० - २९पाटोदा - २३,११७ - १३आष्टी - ४८,८३७ - २७अंबाजोगाई - ३,८९८ - २केज - ६,३५० - ४परळी - १७,७०७ - ७धारुर - १४,४३४ - ९माजलगाव - २,८७२ - २एकूण - ५,३७,०४७ - ३१४

टॅग्स :BeedबीडWaterपाणीwater scarcityपाणी टंचाई