शहरं
Join us  
Trending Stories
1
VIDEO: उत्तरकाशीमध्ये ढगफुटी; १४ सेकंदात सगळं गाव उद्ध्वस्त, घरांसह अनेकजण ढिगाऱ्याखाली गाडले गेले
2
मंत्रिमंडळ बैठकीत ७ मोठे निर्णय; स्टार्टअप उद्योजगता धोरण जाहीर, समृद्धी फ्रेट कॉरिडॉर मंजूर
3
मराठीशी पंगा महागात! निशिकांत दुबेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता; मनसेकडून याचिका दाखल
4
बिहारमध्ये डोमिसाईल पॉलिसी मंजूर; शिक्षक भरतीमध्ये ८५ टक्के बिहारींनाच नोकरी मिळणार
5
पाकिस्तानातील प्रत्येक सहावा व्यक्ती भिकारी; परदेशात पसरलं नेटवर्क, दरवर्षी ११७ ट्रिलियन कमाई
6
सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; घटस्फोटानंतर 12 कोटी रुपये अन् BMW कार मागणाऱ्या पत्नीला काय मिळाले?
7
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
8
युजवेंद्र चहलने घटस्फोटावर उघडपणे विधान केल्यानंतर Ex-पत्नी धनश्रीची पोस्ट, म्हणाली- शांतता...
9
सरकारांना ईव्हींवर आणखी ऑफर्स द्याव्या लागणार? विक्रीच्या वेगावर निती आयोगाचे वक्तव्य...
10
छोट्या भावावर हात उचलणाऱ्याला कायमचं संपवलं; भावाचा बदला घेणारी २२ वर्षीय 'लेडी डॉन' कोण?
11
नवऱ्याचं पोट फाडलं, मृतदेहावर अ‍ॅसिड ओतलं; बॉयफ्रेंडसाठी तबस्सुमनं गाठला क्रूरतेचा कळस 
12
Jalana: "भाजप प्रवेशाच्या निव्वळ अफवा"; राजेश टोपेंनी चर्चांना दिला पूर्णविराम
13
कथावाचक प्रदीम मिश्रा यांच्या कुबेरेश्वर धाममध्ये चेंगराचेंगरी, २ महिलांचा मृत्यू, अनेकजण जखमी   
14
Satyapal Malik Death: जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
15
Thane: ठाण्यातील प्रतिष्ठित शाळेत ४ वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार, पालकांच्या आरोपानंतर तपास सुरू
16
“मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंना चांगले यश मिळेल”; महायुतीतील नेत्याचा मोठा दावा
17
Satyapal Malik: 'मला सत्य सांगायचे आहे', शेवटच्या पोस्टमध्ये काय म्हणाले होते सत्यपाल मलिक?
18
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! दिवाळीपूर्वी पगारात होणार इतकी वाढ? कोणाला मिळणार फायदा?
19
"Help Me! गर्लफ्रेंडसोबत फिरायला जायचंय..."; बॉयफ्रेंडने लावले UPI स्कॅनर असलेले पोस्टर
20
Mumbai: कबुतरांना दाणे टाकताना रोखलं, वृद्ध व्यक्तीसह त्यांच्या मुलावर लोखंडी रॉडने हल्ला!

चारा छावण्यांचा आर्थिक ताळमेळ जुळेना !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2019 00:58 IST

छावण्या चालविताना होणारा खर्च व मिळणारे अनुदान याचा ताळमेळ बसविताना छावणी चालक मेटाकुटीला आले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कगेवराई : राज्य शासनाने दुष्काळी संकटातून बळीराजाला दिलासा मिळावा म्हणून चारा छावण्या सुरू केल्या; मात्र, छावणी सुरू करण्यास विलंब लावून ती चालवण्यासाठी इच्छुक असलेल्यांना तीन महिने हेलपाटे मारायला लावत त्या सुरु करण्याची परवानगी गत महिन्यात देण्यात सुरूवात केली. आता याच छावण्या चालविताना होणारा खर्च व मिळणारे अनुदान याचा ताळमेळ बसविताना छावणी चालक मेटाकुटीला आले आहेत. वाढीव खर्च पाहता ‘चार आण्याची कोंबडी अन् बारा आण्याचा मसाला’ अशीच परिस्थिती छावणी चालकाची होत असल्याचे दिसून येत आहे.छावणी सुरू करण्याचा निर्णय झाल्यानंतर प्रत्यक्षात त्या सुरू करण्यास खूप विलंब झाला. छावणी सुरू करण्याचा प्रस्ताव सादर करताना कागदपत्रांची जमवाजमव करण्यासाठी इच्छूक छावणी चालकांची पळापळ झाली. अनेकदा काढण्यात येणाऱ्या त्रुटी पूर्ण करून छावण्या सुरू करण्यास मंजुरी देण्यात आली. मात्र, छावणी सुरू करण्यासाठी घालण्यात आलेल्या अटी व शर्ती पूर्ण केल्याची खात्री केल्याशिवाय छावण्या सुरू करण्यास परवानगी देण्यात आली नाही. नियमानुसार सर्व बाबी पूर्ण केल्यावरच छावण्या सुरू करण्यास परवानगी देण्यात आली.मात्र, त्यानंतर छावणी चालवण्यासाठीचा खर्च व मिळणारे अनुदान याचा ताळमेळ घालताना छावणी चालकाची कसरत होऊ लागली आहे. चारा व पाणी याची खरेदी, वाहतूक खर्च वाढला. गेवराई तालुक्यात गत तीन-चार वर्षांपासून समाधानकारक पाऊस न झाल्याने ऊस, मका पीक सध्या उपलब्ध नाही. जालना जिल्ह्यातून चारा आणताना खरेदी, तोडणी, भरणी वाहतूक व खाली करणे आदी खर्चात वाढ झाली.तसेच तालुक्यात ग्रामीण भागात पाणी उपलब्ध नसल्याने ४० ते ५० किलोमीटरवरुन पाणी आणावे लागत आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात खर्च होत आहे. शेडनेटच्या सावलीतील जनावरांना कडबा कुट्टीच्या मदतीने बारीक केलेला चारा देण्यासाठी वीजपुरवठ्यावर अवलंबून राहावे लागत आहे. छावणीतील प्रत्येक गोष्ट सीसीटीव्हीच्या देखरेखीखाली करायची असल्याने वीजपुरवठा अत्यावश्यक झाला आहे.जनावरांसाठी " १०० अनुदान देत आहे. जनावराला पूर्वी १५ किलो चारा देण्यात येत होता पण आता त्यात वाढ करून तो १८ किलो करण्यात आला आहे. होणारा खर्च " १३१ असला तर अनुदान " १०० असल्याने छावणी चालक मेटाकुटीला आले आहेत. शासन प्रत्येक जनावरास ४० लिटर पाणी द्या असे सांगते पण भयंकर उन्हाळयामुळे सरासरी प्रत्येक जनावरास ७० लिटर पाणी द्यावे लागते.

टॅग्स :droughtदुष्काळFarmerशेतकरी