शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: उद्योगपती नुस्ली वाडिया यांच्यासह कुटुंबावर गुन्हा दाखल, नेमकं प्रकरण काय?
2
"भारतासोबतचे संबंध महत्त्वाचे, आशा आहे की..."; अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री रुबियोंनी दिले टॅरिफ कमी करण्याचे संकेत
3
चांगले मायलेज हवे असेल तर टायरमधील हवा नेमकी किती असावी? टायरवाला तर ४० पीएसआय भरतो...
4
भारतातील एकमेव सक्रिय ज्वालामुखी अचानक गरजला! अंदमानमध्ये भूकंपाचा धक्का जाणवला
5
घरी रोख रक्कम ठेवण्याची मर्यादा किती? जाणून घ्या आयकर विभागाचा महत्त्वाचा नियम
6
एच-१बी व्हिसा धोरणावर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ३६ तासांतच यू-टर्न का घेतला? 
7
सकाळ सकाळीच उपमुख्यमंत्री अजित पवार करमाळ्यात; पूरग्रस्त भागाची पाहणी सुरू
8
ग्राहकांची झुंबड! वाहनांच्या विक्रीने नवा उच्चांक गाठला; कोणत्या क्षेत्रांना किती होणार फायदा?
9
सोलापुरातील महापुराचा रेल्वे वाहतुकीला फटका; वंदे भारत, सिद्धेश्वर एक्सप्रेसला उशिरा, अनेक गाड्या सोलापूर विभागात थांबविल्या
10
UPI EMI: आता UPI पेमेंट करताना EMI चा पर्याय निवडता येणार; NPCI आणणार नवी सुविधा
11
रोज-रोज चटणी भात... पतीने केली चिकनची मागणी; पत्नीने नकार देताच उचलले टोकाचे पाऊल!
12
"अवामवर बॉम्बस्फोट करुन वेळ मिळाला तर...", भारताच्या क्षितिज त्यागी यांनी संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेत पाकिस्तानला सुनावले
13
शेअर बाजार पुन्हा घसरला, सेन्सेक्स १४७ अंकांनी आपटला; 'या' शेअर्समध्ये मोठी घसरण
14
Online Shopping Tips: ऑनलाइन खरेदीवर खरोखर सूट मिळते का, कसे ओळखायचे? ध्रुव राठीने सांगितली ट्रिक
15
Post Office Scheme: बँक FD विसरुन जाल! Post Office ची ही स्कीम देईल १० वर्षात ४२ लाखांचा फंड, पटापट करा चेक
16
डोळ्यांसमोर पत्नीवर झाले ४५ वार, तरीही पती गप्प कसा बसला? पोलिसांना संशय आला; तपास करताच मोठा ट्विस्ट निघाला!
17
डोळ्यांत ओला दुष्काळ! मायबाप सरकार, माझं कसं होणार? कुटुंब काय खाणार?; आसवांचा महापूर
18
६ लाखांत झेडपी, १० लाखांत मनपा लढवायची तरी कशी?; खर्चाची मर्यादा वाढवण्याची मागणी
19
आर्यन खानने 'बॅड्स ऑफ बॉलिवूड' दिग्दर्शित केलीच नाही? या चर्चांवर मुख्य अभिनेत्री म्हणाली...
20
"H-1B व्हिसा धोरण अन्यायकारक, भारतीय-अमेरिकननी विरोध करावा", शशी थरूरांचे आवाहन

चारा छावण्यांचा आर्थिक ताळमेळ जुळेना !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2019 00:58 IST

छावण्या चालविताना होणारा खर्च व मिळणारे अनुदान याचा ताळमेळ बसविताना छावणी चालक मेटाकुटीला आले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कगेवराई : राज्य शासनाने दुष्काळी संकटातून बळीराजाला दिलासा मिळावा म्हणून चारा छावण्या सुरू केल्या; मात्र, छावणी सुरू करण्यास विलंब लावून ती चालवण्यासाठी इच्छुक असलेल्यांना तीन महिने हेलपाटे मारायला लावत त्या सुरु करण्याची परवानगी गत महिन्यात देण्यात सुरूवात केली. आता याच छावण्या चालविताना होणारा खर्च व मिळणारे अनुदान याचा ताळमेळ बसविताना छावणी चालक मेटाकुटीला आले आहेत. वाढीव खर्च पाहता ‘चार आण्याची कोंबडी अन् बारा आण्याचा मसाला’ अशीच परिस्थिती छावणी चालकाची होत असल्याचे दिसून येत आहे.छावणी सुरू करण्याचा निर्णय झाल्यानंतर प्रत्यक्षात त्या सुरू करण्यास खूप विलंब झाला. छावणी सुरू करण्याचा प्रस्ताव सादर करताना कागदपत्रांची जमवाजमव करण्यासाठी इच्छूक छावणी चालकांची पळापळ झाली. अनेकदा काढण्यात येणाऱ्या त्रुटी पूर्ण करून छावण्या सुरू करण्यास मंजुरी देण्यात आली. मात्र, छावणी सुरू करण्यासाठी घालण्यात आलेल्या अटी व शर्ती पूर्ण केल्याची खात्री केल्याशिवाय छावण्या सुरू करण्यास परवानगी देण्यात आली नाही. नियमानुसार सर्व बाबी पूर्ण केल्यावरच छावण्या सुरू करण्यास परवानगी देण्यात आली.मात्र, त्यानंतर छावणी चालवण्यासाठीचा खर्च व मिळणारे अनुदान याचा ताळमेळ घालताना छावणी चालकाची कसरत होऊ लागली आहे. चारा व पाणी याची खरेदी, वाहतूक खर्च वाढला. गेवराई तालुक्यात गत तीन-चार वर्षांपासून समाधानकारक पाऊस न झाल्याने ऊस, मका पीक सध्या उपलब्ध नाही. जालना जिल्ह्यातून चारा आणताना खरेदी, तोडणी, भरणी वाहतूक व खाली करणे आदी खर्चात वाढ झाली.तसेच तालुक्यात ग्रामीण भागात पाणी उपलब्ध नसल्याने ४० ते ५० किलोमीटरवरुन पाणी आणावे लागत आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात खर्च होत आहे. शेडनेटच्या सावलीतील जनावरांना कडबा कुट्टीच्या मदतीने बारीक केलेला चारा देण्यासाठी वीजपुरवठ्यावर अवलंबून राहावे लागत आहे. छावणीतील प्रत्येक गोष्ट सीसीटीव्हीच्या देखरेखीखाली करायची असल्याने वीजपुरवठा अत्यावश्यक झाला आहे.जनावरांसाठी " १०० अनुदान देत आहे. जनावराला पूर्वी १५ किलो चारा देण्यात येत होता पण आता त्यात वाढ करून तो १८ किलो करण्यात आला आहे. होणारा खर्च " १३१ असला तर अनुदान " १०० असल्याने छावणी चालक मेटाकुटीला आले आहेत. शासन प्रत्येक जनावरास ४० लिटर पाणी द्या असे सांगते पण भयंकर उन्हाळयामुळे सरासरी प्रत्येक जनावरास ७० लिटर पाणी द्यावे लागते.

टॅग्स :droughtदुष्काळFarmerशेतकरी