शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

वैद्यनाथ कारखान्याच्या कर्मचार्‍यांचे वेतनासाठी उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2019 14:37 IST

सलग दुसर्‍या दिवशी उपोषण सुरूच

ठळक मुद्दे13 महिन्यांपासून पगार नाही18 महिन्यापासून पी.एफ. भरला नाही

परळी वै. : बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री यांच्या ताब्यात असलेल्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याच्या कर्मचार्‍यांनी आपल्या मागण्यांसाठी सुरू केलेल्या उपोषणाचा आज दुसरा दिवस आहे. 100 च्या वर कर्मचारी उपोषणाला बसले असतानाही कारखाना प्रशासनाने त्याची दखल घेतली नसल्याने कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.

दरम्यान उपोषणामध्ये 3 राष्ट्रवादी काँग्रेसचे बुथ एजंट असल्याचा आरोप करणार्‍या संचालक शिवाजीराव गुट्टे यांच्या वक्तव्याचा समाचार घेताना आंदोलकांनी आम्ही 3 नव्हे तर 100 कर्मचारी उपोषणाला बसलो आहोत,  एखादा दुसरा राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता असला तरी उर्वरित 98 भाजपाचा प्रचार करीत असतात हे त्यांनी लक्षात ठेवावे आणि कारखान्यासाठी प्रामाणिकपणे काम करणार्‍या कर्मचार्‍यांना वार्‍यावर सोडणार का ? असा सवाल केला आहे.

दरम्यान या कर्मचार्‍यांचे आर्थिक वर्ष 2017-18 पासून अंशदानाची रक्कम भरलेली नाही, मागील 13 महिन्यांपासून या कर्मचार्‍यांना पगार मिळालेला नाही, 18 महिन्यांपासून त्यांचा पी.एफ. जमा केला नाही आणि 2 वर्षांपासून रेटेन्शन अलाऊंस मिळालेला नसल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.कारखाना प्रशासन शेतकर्‍यांपाठोपाठ ज्यांच्या जीवावर कारखाना चालतो त्या कर्मचार्‍यांची ही पिवळणूक, लूट आणि अडवणूक करीत असल्याचा ही आरोप कर्मचार्‍यांनी केला आहे.

त्या कर्मचार्‍यांच्या अ‍ॅडव्हान्सची चौकशी करादरम्यान कारखाना प्रशासन दावा करत असलेल्या आणि मोठी थकबाकी असलेल्या 3 कर्मचार्‍यांची चौकशी करा. या कर्मचार्‍यांना अ‍ॅडव्हान्स का आणि कसा दिला ? आणि ते पैसे स्वतः च्याच मर्जीतील लोकांना नियमबाह्यरित्या कसे वाटप केले ? याचीही चौकशी होऊन जाऊ द्या. कारखान्याचे पितळ उघडे पडल्याशिवाय राहणार नाही, असे ही कर्मचार्‍यांनी म्हटले आहे.

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखानेagitationआंदोलनBeedबीड