शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे म्हणाले, 'आता माझी सटकली, आता तुमची...' एकनाथ शिंदेंनी दिलं असं प्रत्युत्तर
2
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
3
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
4
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
5
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
6
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
7
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
8
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
9
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
10
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
11
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
12
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
13
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
14
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
15
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
16
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
17
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
18
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
19
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
20
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप

वातावरणातील बदलाला अनुसरून शेती करणे काळाची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 06, 2021 4:37 AM

लोकमत न्यूज नेटवर्क आष्टी : वातावरणातील बदलामुळे मानवी जीवनावर तसेच शेतीवर होणाऱ्या विपरीत परिणामांचा शेतकऱ्यांना सामना करावा लागतो. त्यामुळे ...

लोकमत न्यूज नेटवर्क

आष्टी : वातावरणातील बदलामुळे मानवी जीवनावर तसेच शेतीवर होणाऱ्या विपरीत परिणामांचा शेतकऱ्यांना सामना करावा लागतो. त्यामुळे वातावरणातील बदलावर आधारित शेती करणे ही आता काळाची गरज बनली आहे, असे प्रतिपादन होगनास इंडिया प्रा. लि.या कंपनीचे कार्यकारी संचालक सुनील मुरलीधरन यांनी केले.

नवजीवन प्रतिष्ठान समन्वयित व होगनास इंडिया प्रा. लि.च्या अर्थसाहाय्याने आष्टी तालुक्यातील हरितग्राम वाघळूज प्रकल्पांतर्गत दुरुस्त केला आहे. या पाझर तलावाचे शनिवारी झालेल्या जलपूजन व लोकार्पण सोहळ्याप्रसंगी मुरलीधरन बोलत होते. कंपनीचे संचालक डॉ. शरद मगर अध्यक्षस्थानी होते. यावेळी व्यवस्थापक सुभाष तोडकर, नवजीवन प्रतिष्ठानचे राजेंद्र पवार, कार्यक्रमाचे मुख्य संयोजक संतोष गुंड, वाघळूजचे सरपंच कांतीलाल गटकळ, उपसरपंच अजय गुंड, डॉ. अनिल गुंड, ॲड. हनुमंत थोरवे, प्राचार्य शिवराम जाधव उपस्थित होते.

कंपनीच्या अर्थसाहाय्याने वाघळूज येथील पाझर तलावाची दुरुस्ती, २५०० आंबा झाडे लागवड, सार्वजनिक जागेत वृक्षारोपण ही कामे केली आहेत. यावेळी डॉ. अनिल गुंड, जालिंदर गुंड, माजी सभापती संतोष गुंड यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सचिन गुंड, राजू चितळे, ज्ञानदेव मोहिते, नितीन पिंगळे, संदीप बालवे, संतोष ठोंबरे, भगवान राऊत, बाळू गुंड, संजय गुंड, दत्तोबा गुंड, बंडूशेठ गुंड यांनी परिश्रम घेतले. उपसरपंच अजय गुंड यांनी आभार मानले. यावेळी पाहुण्यांच्या हस्ते गुणवंतांचा सत्कार करण्यात आला.

050921\img-20210905-wa0214_9.jpg

आष्टी तालुक्याीतील वाघळूज तलावाचे जलपूजन करताना सुनील मुरलीधरण