शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
2
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
3
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
4
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
5
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
6
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
7
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
8
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
9
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
10
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
11
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
12
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
13
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
14
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका
15
लहान सीमारेषा क्रिकेटला साजेशी नाही; अश्विन : आयपीएलमध्ये सातत्याने उभारला जातोय धावडोंगर
16
छोट्या क्रिकेट मैदानांकडे दुर्लक्ष करू नका; सरफराझ खानने नवोदित क्रिकेटपटूंना दिला सल्ला
17
दीर्घ फलंदाजीचा अभाव; हार्दिक, जडेजाच्या खराब फॉर्मची चिंता
18
इंग्लंडचा संघ निवडण्यासाठी ‘एआय’चा वापर
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

बीडमध्ये नाफेडच्या खरेदी केंद्रांना शेतक-यांची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2017 1:10 AM

बीड : नाफेडच्या वतीने जिल्ह्यात सुरु केलेल्या खरेदी केंद्रांवर उडीद, मूग व सोयाबीनची १७ दिवसात केवळ २९९० क्विंटल खरेदी ...

ठळक मुद्दे१७ दिवसात फक्त २९९० क्विंटल धान्याची खरेदी

बीड : नाफेडच्या वतीने जिल्ह्यात सुरु केलेल्या खरेदी केंद्रांवर उडीद, मूग व सोयाबीनची १७ दिवसात केवळ २९९० क्विंटल खरेदी झाली असून सरासरी दिवसाकाठी केवळ १७० क्विंटल इतकी कमी खरेदी झाली आहे. आॅनलाईन नोंदणी न केल्याने तसेच विविध कारणांमुळे शेतक-यांनी पाठ फिरविली असून शेतकरी केंद्रांवर का येईनात असा प्रश्न यंत्रणेलाही पडला आहे.

जिल्ह्यात हमीदराने खरेदीसाठी नाफेडच्या वतीने ३० आॅक्टोबरपासून अकरा केंद्र सुरु करण्यात आले. या केंद्रांवर माल विकणा-या शेतक-यांना आॅनलाईन नोंदणी आवश्यक आहे. या नोंदणीसाठी अर्ज दिल्यानंतर अ‍ॅपद्वारे नोंदणी प्रक्रिया पूर्ण करावयाची आहे. मात्र, अ‍ॅपची संख्या कमी असल्याने यात विलंब होत आहे. तर दुसरीकडे केंद्रावर माल विकण्यासाठी आर्द्रतेसह हेक्टरी मर्यादा निश्चित केली होती. शेतक-यांमधून ओरड सुरु झाल्यानंतर यात काही अंशी सुधारणा करण्यात आली. सरासरी कृषी पे-यानुसार हेक्टरी क्विंटल मर्यादा तसेच निश्चित केलेल्या उता-यानुसार विक्रीसाठी शिथीलता देण्यात आली. मात्र, नोंदणीअभावी अद्याप बहुतांश शेतकरी नाफेडच्या खरेदी केंद्रापासून दूरच आहेत.

या पार्श्वभूमीवर बीडमध्ये जिल्हाधिकारी एम. डी. सिंह यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या वेळी जिल्हा उपनिबंधक एस. पी. बडे, राज्य मार्केटिंग फेडरेशनचे जनरल मॅनेजर देशमुख, जिल्हा मार्केटिंग अधिकारी एस. के. पांडव यांच्यासह अधिकारी उपस्थित होते. आॅनलाईन नोंदणीचे काम जलदगतीने करण्यासाठी प्रत्येक केंद्रावर किमान दहा मोबाईल अ‍ॅप नोंदणीसाठी उपलब्ध करण्याबाबत जिल्हाधिकारी सिंग यांनी आदेश दिले.बीड केंद्रावर ३०१.३३, पाटोदा येथे ६८.९८, कडा येथे १०.३० तर माजलगाव येथे ८३८.७१ अशी चार केंद्रांवर उडीदाची १२१९.३२ क्विंटल खरेदी झाली आहे.मुगाची बीड येथे ६९.२४, गेवराईत ७३.३०, धारुरमध्ये १८.२५, माजलगावात ८७०.९१ तर पाटोदा केंद्रावर ४१८ याप्रमाणे पाच केंद्रांवर १०३५.८८ क्विंटल खरेदी झाली आहे. बीड केंद्रावर ६७.९६, गेवराईत ७३.३०, माजलगावात ६६०.७३ अशी तीन केंद्रावर सोयाबीनची ७३४.५९ क्विंटल खरेदी करण्यात आली आहे.