शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

शेतकरी अनुदानावर बँकांकडून डल्ला...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2019 12:35 AM

दुष्काळी परिस्थितीमुळे दोन्ही हंगामातील पिके हातची गेली आहेत. यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडलेले आहेत. खरीप दुष्काळ अनुदान, २०१६ अतिवृष्टी अनुदान, पिक विम्याचे पैसे बँकामध्ये जमा झाले आहेत. मात्र, यामधून कर्जाची रक्कम वळती करुन घेतली जात आहे. तसेच जिल्हा बँकेकडून अनुदान वाटपात हलगर्जीपणा होत आहे.

ठळक मुद्देबीड जिल्हा बँकेकडून अनुदान वाटपात हलगर्जीपणा : आदेशाला हरताळ

प्रभात बुडूख।लोकमत न्यूज नेटवर्कबीड : दुष्काळी परिस्थितीमुळे दोन्ही हंगामातील पिके हातची गेली आहेत. यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडलेले आहेत. खरीप दुष्काळ अनुदान, २०१६ अतिवृष्टी अनुदान, पिक विम्याचे पैसे बँकामध्ये जमा झाले आहेत. मात्र, यामधून कर्जाची रक्कम वळती करुन घेतली जात आहे. तसेच जिल्हा बँकेकडून अनुदान वाटपात हलगर्जीपणा होत आहे.जिल्हा दुष्काळाच्या खाईत हरपळत असतना शेतकऱ्यांना मिळालेल्या अनुदानाचे पैसे जिल्ह्यातील बँकांकडून कर्जाच्या रकमेमध्ये वळते केले जात आहेत. मिळालेल्या अनुदानामुळे शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळेल, अशी आशा असताना बँकाकडून ही रक्कम वळती केली जात असल्यामुळे शेतकºयांमधून संताप व्यक्त केला जात आहे. तर जिल्हा बँकेमध्ये शेतकºयांचे खाते मोठ्या प्रमाणात आहेत. त्या ठिकाणी जमा झालेल्या अनुदानाची रक्कम देखील अधिक आहे.ही रक्कम इतर बँकांमध्ये ठेव स्वरुपात ठेवल्यामुळे शेतकºयांना वेळेवर अनुदान दिले जात नसल्याची सूत्रांची माहिती आहे. त्यामुळे जिल्हा बँकेत शेतकºयांचे जवळपास ८४५ कोटी रुपये अनुदान अडकले आहे. या दुष्काळी गंभीर परिस्थितीमध्ये शेतकºयांचे हाल होत असताना देखील जिल्हा बँकेकडून हा बनाव केला जात असल्याने संतप्त झालेल्या शेतकºयांनी तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाकडून बँकेच्या विरोधात जन आंदोलन उभारण्याचा इशारा दिला आहे.तसेच प्रशासनाने देखील या प्रकरणी जिल्हा बँकेची व इतर बँकेची चौकशी करुन योग्य ती कार्यवाही करण्याची मागणी शेतकºयांमधून केली जात आहे.चालू वर्षात ८४५ कोटीचे विमा व अनुदानसोयाबीनसोडून इतर कापूस,मूग,तूर,उडीद, तीळ यासर इतर पिकांच्या विम्यापोटी ३४६ कोटी ३९ लाख रुपये शेतकºयांच्या खात्यावर जमा झाले आहेत. त्यामुळे ही रक्कम देखील कर्जातून वळती करुन घेतली जाणार असल्याची माहिती आहे.जिल्हा बँकेककडे यापुर्वीच खरीप दुष्काळी अनुदानापोटी ४२८ कोटी रुपये मार्च महिन्यात वर्ग करण्यात आले आहेत तर २०१६ अतिवृष्टी अनुदानापोटी ६८ कोटी रुपये प्रशासनाकडून बँकेमध्ये जमा करण्यात आले आहेत.यापैकी राष्ट्रीय कृत बँकेतील अनुदान शेतकºयांच्या खात्यावर वर्ग करण्यात आले आहे. मात्र, जिल्हा बँकेकडून अनुदानाची रक्कम वाटप करण्यात हलगर्जीपणा केला जात आहे. तसेच इतर बँकेतून कर्जाची रक्कम वळती केली जात आहे.आरबीआयकडून बँकांनाआदेश देण्याची गरजकर्जाच्या रकमेमधून अनुदान व विम्याची रक्कम वळती करु नये, असे मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले आहेत असे विचारले असता, लीड बँकेचे व्यवस्थापक विजय चव्हाण म्हणाले, सर्व राष्ट्रीयकृत बँकाना भारतीय रिर्झंव बँकेने पत्राद्वारे असे आदेश देण्याची आवश्यकता असते, असे पत्र प्राप्त झाल्यानंतर ही रक्कम वळती केली जाणार नाही.

टॅग्स :BeedबीडFarmerशेतकरीBanking Sectorबँकिंग क्षेत्र