शहरं
Join us  
Trending Stories
1
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
2
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
3
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
4
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
5
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
6
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
7
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
8
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
9
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
10
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
11
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
12
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
13
Infosys ADR News: इन्फोसिसच्या एडीआरमध्ये ४० टक्क्यांची तेजी; ट्रेडिंगही थांबवलं, पाहा नक्की काय आहे प्रकरण
14
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
15
ठाकरेंना जय महाराष्ट्र, भाजपचा आणखी एक धक्का! लोकसभा लढवणारे संजोग वाघेरेंचा मोठा निर्णय
16
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
17
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
18
मल्लिका शेरावतने डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत व्हाईट हाऊसमध्ये केलं ख्रिसमस डिनर; फोटो केले शेअर
19
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
20
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
Daily Top 2Weekly Top 5

पावसाने पाठ फिरवल्याने १३ हजार हेक्टरवरील उभ्या पिकांवर फिरविला नांगर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2019 11:54 IST

बीड जिल्ह्यातील १५ गावांतील शेतकऱ्यांची व्यथा

ठळक मुद्देकृषी विभागाने तहसीलदारांना दिला परिस्थिती अहवालपरिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता 

- राम लंगे 

वडवणी (जि.बीड): शेतकऱ्यांनी उसनवार करून, खाजगी सावकाराचे कर्ज काढून बी-बियाणे, खते घेऊन जूनच्या मध्यंतरी थोड्याफार प्रमाणात पडलेल्या पावसावर पेरणी केली होती.  त्यानंतर दोन महिने होऊनही पावसाचा थेंबही न पडल्याने पेरलेले बियाणे उगवून संपूर्णपणे जळून गेले आहे. त्यामुळे तालुक्यातील १५ गावांमध्ये शेतकरी संपूर्ण पिकावर नांगर फिरवीत असल्याचे  विदारक चित्र सध्या दिसत आहे. 

प्रशासनाने तात्काळ खरीप हंगामातील पिकांचे पंचनामे करून  नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी निवेदनाद्वारे केली आहे.तालुक्यातील एकूण पेरणी योग्य ३२ हजार हेक्टर क्षेत्र असून, त्यापैकी यावर्षी कापूस १९ हजार ७८ हेक्टर, तूर १ हजार ८३ हेक्टर, सोयाबीन ४ हजार २०० हेक्टर, बाजरी ३ हजार ९२५ हेक्टर, मूग १०० शंभर हेक्टर व इतर पिकांची २ हजार हेक्टरावरील क्षेत्रावर पेरणी झाली. थोड्या पावसाने कापूस उगवला, मात्र वाढ खुंटली. 

पाऊसच नसल्याने उभे पीक वाळू लागले. १५ गावांमधील ८० टक्के नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी तब्बल १३ हजार हेक्टरवरील  कापसासह खरीप पिकामध्ये औत घालून आपल्या हाताने पीक मोडून टाकले. चिंचवडगाव, देवडी,  वडवणी, कवडगाव, साळींबा, मामला, मोरेवाडी, पिपरखेड, कान्हापूर, लक्ष्मीपूर, ढोरवाडी,  चिंचोटी, बाहेगव्हाण, हिवरगव्हाण,हरिश्चंद्र पिंप्री, काडीवडगाव, चिंचाळा, पिप्ां्री, येथील शेकडो शेतकऱ्यांनी कापसाच्या उभ्या पिकात औत घालून कापसाचे पीक आपल्या हाताने उद्ध्वस्त केले. कापसासह सोयाबीन, मटकी, मूग, उडीद या पिकांवरही नांगर फिरवावा लागला. तब्बल १३ हजार हेक्टरवरील खरीप पीक आतापर्यंत उद्ध्वस्त केले आहे. पिकांचे पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी साळींबा येथील शेतकरी दीपक जाधव, मामला येथील शेतकरी अंगद लंगे, चिचोटी येथील शेतकरी सुमंत गोंडे,अ‍ॅड राज पाटील यांनी तहसील प्रशासनाकडे व कृषी अधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

परिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता तालुक्यातील दुष्काळी परिस्थिती गंभीर झाली असून, खरीप हंगामात १५ गावांतील पिके जवळपास ८० टक्के नुकसान झाले असून याबाबत कृषी विभागाने पीक परिस्थिती अहवाल तहसीलदार यांना कळविला आहे. चार दिवसांत पाऊस न पडल्यास तालुक्यातील इतर गावातील परिस्थितीही गंभीर बनण्याची शक्यता निर्माण होऊ शकते, अशी माहिती तालुका कृषी अधिकारी शरद शिनगारे यांनी दिली.

टॅग्स :FarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्रagricultureशेतीBeedबीडRainपाऊस