शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
5
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
6
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
7
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
8
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
9
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
10
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
11
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
12
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
13
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
14
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
15
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
16
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
17
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
18
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
19
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
20
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...

पावसाने पाठ फिरवल्याने १३ हजार हेक्टरवरील उभ्या पिकांवर फिरविला नांगर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2019 11:54 IST

बीड जिल्ह्यातील १५ गावांतील शेतकऱ्यांची व्यथा

ठळक मुद्देकृषी विभागाने तहसीलदारांना दिला परिस्थिती अहवालपरिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता 

- राम लंगे 

वडवणी (जि.बीड): शेतकऱ्यांनी उसनवार करून, खाजगी सावकाराचे कर्ज काढून बी-बियाणे, खते घेऊन जूनच्या मध्यंतरी थोड्याफार प्रमाणात पडलेल्या पावसावर पेरणी केली होती.  त्यानंतर दोन महिने होऊनही पावसाचा थेंबही न पडल्याने पेरलेले बियाणे उगवून संपूर्णपणे जळून गेले आहे. त्यामुळे तालुक्यातील १५ गावांमध्ये शेतकरी संपूर्ण पिकावर नांगर फिरवीत असल्याचे  विदारक चित्र सध्या दिसत आहे. 

प्रशासनाने तात्काळ खरीप हंगामातील पिकांचे पंचनामे करून  नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी निवेदनाद्वारे केली आहे.तालुक्यातील एकूण पेरणी योग्य ३२ हजार हेक्टर क्षेत्र असून, त्यापैकी यावर्षी कापूस १९ हजार ७८ हेक्टर, तूर १ हजार ८३ हेक्टर, सोयाबीन ४ हजार २०० हेक्टर, बाजरी ३ हजार ९२५ हेक्टर, मूग १०० शंभर हेक्टर व इतर पिकांची २ हजार हेक्टरावरील क्षेत्रावर पेरणी झाली. थोड्या पावसाने कापूस उगवला, मात्र वाढ खुंटली. 

पाऊसच नसल्याने उभे पीक वाळू लागले. १५ गावांमधील ८० टक्के नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी तब्बल १३ हजार हेक्टरवरील  कापसासह खरीप पिकामध्ये औत घालून आपल्या हाताने पीक मोडून टाकले. चिंचवडगाव, देवडी,  वडवणी, कवडगाव, साळींबा, मामला, मोरेवाडी, पिपरखेड, कान्हापूर, लक्ष्मीपूर, ढोरवाडी,  चिंचोटी, बाहेगव्हाण, हिवरगव्हाण,हरिश्चंद्र पिंप्री, काडीवडगाव, चिंचाळा, पिप्ां्री, येथील शेकडो शेतकऱ्यांनी कापसाच्या उभ्या पिकात औत घालून कापसाचे पीक आपल्या हाताने उद्ध्वस्त केले. कापसासह सोयाबीन, मटकी, मूग, उडीद या पिकांवरही नांगर फिरवावा लागला. तब्बल १३ हजार हेक्टरवरील खरीप पीक आतापर्यंत उद्ध्वस्त केले आहे. पिकांचे पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी साळींबा येथील शेतकरी दीपक जाधव, मामला येथील शेतकरी अंगद लंगे, चिचोटी येथील शेतकरी सुमंत गोंडे,अ‍ॅड राज पाटील यांनी तहसील प्रशासनाकडे व कृषी अधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

परिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता तालुक्यातील दुष्काळी परिस्थिती गंभीर झाली असून, खरीप हंगामात १५ गावांतील पिके जवळपास ८० टक्के नुकसान झाले असून याबाबत कृषी विभागाने पीक परिस्थिती अहवाल तहसीलदार यांना कळविला आहे. चार दिवसांत पाऊस न पडल्यास तालुक्यातील इतर गावातील परिस्थितीही गंभीर बनण्याची शक्यता निर्माण होऊ शकते, अशी माहिती तालुका कृषी अधिकारी शरद शिनगारे यांनी दिली.

टॅग्स :FarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्रagricultureशेतीBeedबीडRainपाऊस