शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

परतीच्या पावसाच्या तडाख्याने शेतकरी संकटात; सोयाबीन, कापूस पिके पाण्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2022 20:17 IST

या ढगफुटी सदस्य पावसामुळे सोयाबीन व कापूस या पिकांचे कमाल नुकसान झाले आहे.

दिंद्रुड ( बीड ) : माजलगाव तालुक्याच्या नित्रुड महसूल मंडळात मंगळवारी दुपारी ढगफुटी सदृश्य पाऊस झाला. या पावसात शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. उभे सोयाबीनचे व कापसाचे पीक पाण्यात गेले असून शेतकरी संकटात सापडला आहे. प्रशासनाने व विमा कंपन्यांनी तात्काळ दखल घेत झालेल्या नुकसानीची भरपाई देण्याची मागणी शेतकरी वर्ग करत आहे.

नित्रुड महसूल मंडळात मंगळवारी दुपारी तीनच्यानंतर जवळपास चार तास मुसळधार पाऊस झाला. या ढगफुटी सदस्य पावसामुळे सोयाबीन व कापूस या पिकांचे कमाल नुकसान झाले आहे. विमा कंपन्यांकडे विमा भरूनही विमा मिळत नसल्याने शेतकरी वर्ग संतप्त आहे. नित्रुड महसूल मंडळातील गट नंबर 65 मधिल अनंत विठ्ठलराव नाईकनवरे यांच्या तिन एकर कापूस व दोन एकर सोयाबीनमध्ये पाणीच पाणी झाले आहे. नुकसानीकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी नाईकनवरे यांनी बोंबमारो आंदोलन केले. याचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. सरकार भांडणात व्यस्त तर जिल्हाधिकारी, तहसीलदार यांचे लक्ष नसल्याने शेतकऱ्यांचे हाल होत आहेत. प्रचंड नुकसानीची भरपाई तात्काळ द्यावी अन्यथा शेतकऱ्यांना आत्महत्या केल्याशिवाय पर्याय राहणार नसल्याचे शेतकरी नाईकनवरे यांनी भावना व्यक्त केल्या.

टॅग्स :RainपाऊसagricultureशेतीFarmerशेतकरीBeedबीड