शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमाळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; अनेक पर्यटक बुडाल्याची भीती
2
"तो काहीच खात नाही, सुन्न झालाय"; अहमदाबाद घटनेचा व्हिडीओ काढणाऱ्या मुलाला बसलाय धक्का!
3
"PM मोदी खूप मोठी चूक करतायेत, जाणूनबुजून..."; इस्त्रायल-इराण तणावावर अबू आझमी संतापले
4
Neha Marda : 'बालिका वधू'मधील 'गेहना' कुठे झाली गायब? अभिनेत्री बनली बिझनेसवुमन, आता करणार कमबॅक
5
नशिबाचा खेळ! केदारनाथ हेलिकॉप्टर अपघातात आई-वडील, चिमुकलीचा मृत्यू; मुलगा वाचला
6
सोने-चांदी किंवा शेअर नाही तर गुंतवणूकदारांची 'या' पर्यायाला पसंती; मार्केटमध्ये नवा 'ट्रेंड'?
7
सुधाकर बडगुजरांच्या भाजप प्रवेशाला लागणार मुहूर्त; पदाधिकाऱ्यांचा विरोध मावळला
8
विहीण बाईंवर जीव जडला, बायको वाटू लागली अडचण! पतीने केलेलं कृत्य ऐकून बसेल धक्का 
9
बाबांसोबत खेळणाऱ्या 'या' चिमुरड्याला ओळखलंत का? आज करतोय क्रिकेटविश्वावर राज्य
10
इराण-इस्रायल संघर्षामुळे सोन्याचे दर भडकले! आठवड्यात ३,६४५ रुपयांची वाढ; आजचे दर काय?
11
मैत्रीला धोका? ७३% मित्र पैसेच परत करत नाहीत; तुम्हीही 'या' चुकीला बळी पडलाय का?
12
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
13
Mumbai: मुंब्रा दुर्घटनेची माहिती असल्यास रेल्वेला कळवा, प्रशासनाचे नागरिकांना आवाहन!
14
सोमनाथसोबत खरंच लग्न केलं? अखेर राजेश्वरी खरातचा मोठा खुलासा, म्हणाली- "लवकरच मी गुड न्यूज.."
15
'टीम इंडिया'तून वगळलेल्या सरफराज खानचे 'वनडे स्टाईल' शतक, बुमराहला एकही विकेट नाही, ऋतुराजही अपयशी
16
दिवसा काम, रात्री अभ्यास! मोबाईल कव्हर विकणारा रोहित होणार डॉक्टर; NEETमध्ये रचला इतिहास
17
काव्या मारनसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर संगीतकार रविचंदरने सोडलं मौन; म्हणाला, "लग्न...?"
18
'फादर्स डे': विराट कोहलीसाठी लेक वामिकाने बनवलं खास ग्रिटींग कार्ड, लिहिलाय खास संदेश
19
परिसरात किती पाणी भरलंय? लगेच कळणार; शहरात रडार लेव्हल ट्रान्समीटर बसवले!

माजलगाव बाजार समितीसमोर शेतकऱ्यांनी केली उसाची होळी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2018 16:58 IST

शेतकऱ्यांना संपूर्ण कर्ज माफी द्यावी, या मागणीसाठी आज शेतकरी संघर्ष समितीने बाजार समिती कार्यालयासमोर हुमणी लागलेल्या उसाची होळी केली. 

माजलगाव :  गेल्या तीन वर्षांपासून माजलगाव तालुक्यात व परिसरात दुष्काळी परिस्थिती आहे. कापसाचे पीक जळून गेलेले आहे तर उसाला हुमनीने ग्रासले आहे त्यामुळे शेतकऱ्यांना संपूर्ण कर्ज माफी द्यावी, या मागणीसाठी आज शेतकरी संघर्ष समितीने बाजार समिती कार्यालयासमोर हुमणी लागलेल्या उसाची होळी केली.

पावसा अभावी शेतकरी मेटाकुटीला आलेला आहे. सोयबिन, कापूस इत्यादी पिके पूरती हातची निघून गेलेली आहेत. कारखानदारांच्या चुकीच्या धोरणामुळे या वर्षी बहुसंख्य शेतकऱ्यांनी 265 जातीचा ऊस सोडून इतर वाणाचा उस लावला. मात्र त्यावर हुमणी रोगाचा प्रादुर्भाव झाला. यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. यातून दिलासा देण्यासाठी शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करावी, या मागणीसाठी शेतकरी संघर्ष समितीने भाई गंगाभीषण थावरे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन छेडले आहे. आंदोलनाची सुरुवात आज सकाळी येथील बाजार समितीच्या कार्यालयासमोर हुमणीने वाळलेल्या उसाची होळी करून करण्यात आली. यावेळी मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.

टॅग्स :FarmerशेतकरीSugar factoryसाखर कारखानेBeedबीडAgriculture Sectorशेती क्षेत्रagitationआंदोलन