शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
3
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
4
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
5
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
6
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
7
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
8
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
9
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
10
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
11
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
12
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
13
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
14
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
15
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
16
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
17
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
18
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
19
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया

माजलगावात शेतकऱ्यांचा बैलगाडी मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2018 00:39 IST

कारखान्यांनी शेतक-यांचे थकलेले पैसे तात्काळ द्यावेत, यासह इतर मागण्यांसाठी शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने गंगाभीषण थावरे यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी तहसील कार्यालयावर बैलगाडी मोर्चा काढण्यात आला.

लोकमत न्यूज नेटवर्कमाजलगाव : कारखान्यांनी शेतक-यांचे थकलेले पैसे तात्काळ द्यावेत, यासह इतर मागण्यांसाठी शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने गंगाभीषण थावरे यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी तहसील कार्यालयावर बैलगाडी मोर्चा काढण्यात आला.सन २०१६-१७ या गळीत हंगामात तेलगाव येथील सुंदरराव सोळंके कारखान्याने व सावरगाव येथील छत्रपती कारखान्याने जयमहेश कारखान्यापेक्षा ६०० रुपयांनी कमी भाव शेतकºयांना दिला. त्यामुळे त्यांनी ६०० रु पयांप्रमाणे शेतकºयांना आधी पैसे अदा करावेत तसेच यावर्षी देखील दोन्ही काररखान्यांनी शेतकºयांना एफआरपी पेक्षा वाढवून भाव देण्याचे आश्वासन देऊन पुन्हा तोंडफिरवणी केली. त्यामुळे या दोन्ही कारखान्यांनी शेतकºयांचे पैसे अगोदर द्यावेत, आगामी गळीत हंगामात कार्यक्षेत्रातील ऊस संपल्याशिवाय गेटकेन ऊस आणू नये, यावर्षी पावसाने दडी मारल्याने तात्काळ दुष्काळ जाहीर करावा, शेतकºयांना सरसकट कर्ज माफी द्यावी, लवादाचा करार तीन वर्षांचा करण्यात यावा, इंधन दरवाढ रद्द करण्यात यावी, पीक विमा व बोंडआळीचे पैसे शेतकºयांना त्वरीत द्यावेत, या व इतर मागण्यांसाठी येथील परभणी चौकातून बैलगाडी मोर्चा काढला. डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकमार्गे मोर्चा तहसीलवर धडकला. त्यानंतर तहसीलदार एन.जी.झंपलवाड यांना निवेदन दिले. शेतकरी बैलगाड्यांसह सहभागी झालेपेट्रोल दरवाढीचा निषेधया मोर्चात सामील झालेल्या बैलगाड्या पेट्रोल पंपावर नेण्यात आल्या. या ठिकाणी बैलगाड्यांमध्ये पेट्रोल भरून शासनाच्या इंधन दरवाढीचा निषेध करण्यात आला. यावेळी शासनविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

टॅग्स :BeedबीडFarmerशेतकरीagitationआंदोलन