शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीत सारे काही आलबेल? मंत्र्यांच्या नाराजीनंतर शिंदेनी दरे नाही, दिल्ली गाठली; अमित शहांकडे तक्रार...
2
"राजा रघुवंशी प्रमाणे...!" ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानला धडा शिकवणाऱ्या जवानाला वाटते भीती, 'सोनमसारखं' करण्याची धमकी देतेय पत्नी!
3
माळेगावात तणाव! शरद पवार राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष नितीन तावरे यांच्यावर जीवघेणा हल्ला 
4
₹१०००००००००००००० स्वाहा...! 6 आठवड्यांत क्रिप्टो मार्केट क्रॅश, बिटकॉइन 27% घसरला; गुंतवणूकदारांवर डोकं झोडून घ्यायची वेळ
5
'घातपाताच्या सूत्रधाराला वाचवणाऱ्या सरकारचे संरक्षण नको!' मनोज जरांगेंचा मोठा निर्णय
6
क्रिकेट चाहत्यांना धक्का! विश्वचषकात भारत-पाकिस्तान सामना होणार नाही, आयसीसीने ग्रुप स्टेजसाठी घेतला मोठा निर्णय...
7
KTM च्या बाईकना आग लागण्याचा धोका; Duke मॉडेल माघारी बोलविल्या...
8
एक 'ट्रिप'... एक 'ट्रिक'... अन् उभा राहिला १.५ कोटींचा उद्योग; कोल्हापूरच्या अद्वैतचा नादच खुळा
9
Travel : भारतापासून हजारो मैल दूर वसलाय 'मिनी इंडिया'; दिसायला सुंदर, फिरायला बेस्ट अन् इतिहासही आहे रंजक!
10
"मी अनेक वेळा रात्रीचे जेवण करत नाही, विचार करते...!"; करण जौहरसोबत अगदी मोकळेपणानं बोलली सानिया मिर्झा
11
नवी Honda City पाहिलीत का? कधी येणार; डिझाईन आणि प्लॅटफॉर्मची माहिती लीक झाली...
12
"तुमचा अहंकार ड्रेसिंग रुममध्ये ठेवा!" गावसकरांनी गंभीर-आगरकरांनाही सुनावलं
13
"जेव्हापासून बिहारचे निकाल लागलेत, माझी झोपच उडालीये", प्रशांत किशोरांना कोणत्या गोष्टीची सल?
14
अनमोल बिश्नोईला ११ दिवसांची कोठडी; ३५ हून अधिक हत्यांशी त्याचा थेट संबंध असल्याचा 'NIA'चा दावा
15
अल फलाह विद्यापीठाचे संस्थापक जवाद सिद्दीकींना ४१५ कोटींच्या फसवणुकी प्रकरणी ईडी कोठडी; १३ दिवसांची रिमांड
16
"जेव्हा मुस्लीम अल्लाहवर विश्वास ठेवतो, तेव्हा शत्रूवर फेकलेली मातीही मिसाइल बनते, पुन्हा युद्द झाले तर..."; मुनीर यांची 'कोल्हेकुई' 
17
'हो, आम्ही काश्मीरपासून लाल किल्ल्यापर्यंत हल्ले केले... ', सीमापार दहशतवादाबद्दल पाक नेत्याची धक्कादायक कबुली
18
Delhi Blast : "आता कुटुंबाचं पोट कसं भरणार?"; दिल्ली स्फोटातील जखमींची मन हेलावून टाकणारी गोष्ट
19
अफगाणिस्तानचे उद्योगमंत्री भारत दौऱ्यावर; 'या' महत्वाच्या विषयांवर होणार चर्चा...
20
जुन्या वाहन मालकांना जबर धक्का...! वाहनांचे आयुष्य १५ वरून १० वर्षे झाले, फिटनेसचे शुल्क १० पटींनी वाढविले...
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांनो सावधान, पेरणीची घाई करू नका...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:45 IST

अविनाश कदम लोकमत न्यूज नेटवर्क आष्टी : शेतकरी पावसाळा सुरू झाला की पेरणीची लगबग सुरू करतात. पुन्हा पावसाने उघडीप ...

अविनाश कदम

लोकमत न्यूज नेटवर्क

आष्टी : शेतकरी पावसाळा सुरू झाला की पेरणीची लगबग सुरू करतात. पुन्हा पावसाने उघडीप दिल्यावर नुकसानीला सामोरे जावे लागते. त्यासाठी शेतकऱ्यांनी पेरणीयोग्य पाऊस झाल्यावर पेरणीला सुरुवात करावी, असा सल्ला आष्टी कृषी विभागाने दिला आहे.

तालुक्यातील अनेक गावांमध्ये पुरेसा पाऊस नाही. काही गावांमध्ये पाऊस झाला आहे. शेतकऱ्यांच्या पेरण्या झाल्या आहेत. तरी काही गावांमध्ये पावसाचे प्रमाण कमी आहे. पेरणी झालेल्या गावांमध्ये मागील आठ दिवसांपासून पावसाने दडी मारली आहे. आणखी पावसाने अशी ओढ दिल्यास शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवू शकते. यामुळे शेतकऱ्यांनी किमान ७ इंच ओल झाल्याशिवाय पेरणीची घाई करू नये, असे आवाहन आष्टी कृषी विभागाच्यावतीने केलेले आहे.

कडा, धामणगाव, धानोरा, आष्टी तालुक्यांच्या पश्चिम भागातील अनेक गावांमध्ये पावसाचे प्रमाण कमी आहे. तर आष्टीच्या पूर्वेकडील गावात खरिपाच्या पेरण्या झाल्या आहेत. मागील ४ ते ५ दिवसांपासून दमदार पाऊस झाला नाही. येत्या २ ते ४ दिवसांमध्ये पाऊस झाला नाही तर या शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवू शकते.

.....

पेरणीयोग्य पावसानंतरच पेरणी करा

जोपर्यंत ८० ते १०० मि.मी. पाऊस पडत नाही, तोपर्यंत शेतकऱ्यांनी पेरणी करू नये. यापेक्षा कमी पाऊस पडल्यानंतर शेतकऱ्यांनी पेरणी केल्यास पुरेशा प्रमाणात ओलावा नसतो. जमिनीच्या उष्णतेमुळे बियाणे अतिशय कमी प्रमाणात अंकुरते व बियाणे जळण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार बियाणे पेरण्याची वेळ येऊ शकते. यामध्ये आर्थिक फटका बसतो. पैसे आणि वेळपण अधिक खर्च होतो. याचा विपरीत परिणाम उत्पादनावर होऊन उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे. दुबार पेरणीचा खर्चही शेतकऱ्यांना करावा लागतो. त्यामुळे पेरणीयोग्य पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नये.

-राजेंद्र सुपेकर, तालुका कृषी अधिकारी, आष्टी.

...

सुरुवातीला दमदार पावसाने हजेरी लावली. यंदा पाऊस चांगला राहील या आशेने शेतकऱ्यांनी बियाणे, खते खरेदीस प्रारंभ केला होता. कऱ्हेवडगांव परिसरातील संपूर्ण पेरणीची कामेदेखील पूर्ण झाली आहेत. आठ दिवसांपासून पावसाचे प्रमाण कमी होत गेल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. पेरणी झालेली पिके आता कुठे वर दिसू लागताच कडक उन्हामुळे ती करपण्याची शक्यता आहे. यामुळे मोठ्या पावसाची अपेक्षा आहे.

- राम नागरगोजे, शेतकरी, कऱ्हेवडगांव

.....

मंडळनिहाय पर्जन्यमान

आष्टी - ६३.५ मि.मी.

कडा - ६०.२ मि.मी.

टाकळसिंग - ४५.४ मि.मी.

दौलावडगांव - ६५.९ मि.मी.

धामणगांव - ५१.४ मि.मी

धानोरा - ३८.६ मि.मी.

पिंपळा - १२२ मि.मी.