शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
5
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
6
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
7
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
8
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
9
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
10
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
11
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
12
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
13
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
14
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
15
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
16
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
17
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
18
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
19
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
20
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
Daily Top 2Weekly Top 5

बीडमध्ये शासकीय कार्यालयात विष घेतलेल्या शेतक-याचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2017 12:21 IST

इनामी जमीन पडताळणी प्रमाणपत्रासाठी वारंवार भू-सुधार कार्यालयात खेटे मारले, परंतु काम होत नसल्याने संतापलेल्या शेतक-याने १४ नोव्हेंबर रोजी तहसील कार्यालयाच्या इमारतीत विषारी द्रव प्राशन केले होते. तीन दिवस मृत्यूशी झुंज देणा-या या शेतक-याचा रविवारी सकाळी उपचारादरम्यान मृत्यू झाला.

ठळक मुद्देतीन दिवस मृत्यूशी झुंजप्रशासनाच्या हालगर्जीपणामुळेच आत्महत्या केल्याचा नातेवाईकांचा आरोप

बीड : इनामी जमीन पडताळणी प्रमाणपत्रासाठी वारंवार भू-सुधार कार्यालयात खेटे मारले, परंतु काम होत नसल्याने संतापलेल्या शेतक-याने १४ नोव्हेंबर रोजी तहसील कार्यालयाच्या इमारतीत विषारी द्रव प्राशन केले होते. तीन दिवस मृत्यूशी झुंज देणा-या या शेतक-याचा रविवारी सकाळी उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यानंतर नातेवाईकांनी संबंधित विभागातील अधिकारी, कर्मचा-यांच्या हालगर्जीपणामुळेच शेतक-याने आत्महत्या केल्याचा आरोप करीत शिवाजीनगर पोलीस ठाण्यात ठिय्या मांडला. 

प्रल्हाद हरीभाऊ टेकाळे (नागापूर बु. ता.बीड) असे त्या शेतक-याचे नाव आहे. नागापूर येथे गट नं. १०६ मध्ये सय्यद शफिक सय्यद हमजा यांची २० आर एवढी इनामी जमीन आहे. कृषीक प्रयोजनासाठी ही जमीन टेकाळे यांना देण्यात येणार होती. यासाठी उपजिल्हाधिकारी यांचे जमीन विक्री संदर्भात पडताळणी प्रमाणपत्र/हस्तांतरण करण्याची  परवाणगी पाहिजे होती. यासाठी टेकाळे हे वर्षभरापासून भु-सुधार कार्यालयात खेटे मारत होते. परंतु येथील अधिकारी, कर्मचारी त्यांना टोलवाटोलवी करीत होते. १४ डिसेंबर रोजीही ते याच प्रमाणपत्रासाठी गेले होते. परंतु त्यांना अपेक्षित उत्तर मिळाले नाही. यावर वैतागलेल्या टेकाळे यांनी कार्यालयाच्या आवारातच विषारी द्रव प्राशन केले. यामध्ये त्यांना कार्यालयातील कर्मचा-यांनीच जिल्हा रूग्णालयात दाखल केले होते. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होती. तीन दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर रविवारी सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात नोंद करण्यासाठी नातेवाईकांची गर्दी जमली होती.

गुन्हा दाखल करण्याची मागणीदरम्यान, टेकाळे यांच्या नातेवाईकांनी शिवाजीनगर पोलीस ठाणे गाठून संबंधित प्रशासनातील अधिकारी, कर्मचा-यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली. यावेळी नातेवाईक आक्रमक झाले होते. परिस्थिती पाहून उपअधीक्षक सुधीर खिरडकर यांनी ठाण्यात धाव घेत नातेवाईकांशी चर्चा केली. चौकशी करून गुन्हा दाखल करण्याचे आश्वासन देताच नातेवाईकांचा संताप कमी झाल्याचे दिसले. सकाळी ११ पर्यंत ठाण्यात नोंद झालेली नव्हती. तर सुधीर खिरडकर हे ठाण्यात ठाण मांडून होते.

विष प्राशन केल्यावर परवाणगीटेकाळे यांनी विषारी द्रव प्राशन केल्यानंतरच वर्षभर झोपेत असलेले प्रशासन खडबडून जागे झाले. १६ डिसेंबर रोजी पडताळणी प्रमाणपत्राला परवाणगी देण्यात आली. यावर उपजिल्हाधिकारी (सामान्य) यांची स्वाक्षरीही आहे. प्रशासनातील कामे करून घेण्यासाठी विषारी द्रव प्राशन करून आत्महत्या करावी लागत असल्याने संताप व्यक्त होत असून प्रशासनाचा गलथान कारभार या निमित्ताने चव्हाट्यावर आला आहे.

टॅग्स :Farmerशेतकरीfarmer suicideशेतकरी आत्महत्याBeedबीड