शहरं
Join us  
Trending Stories
1
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
2
वर्ल्ड बँकेकडून पाकिस्तानला ७०० मिलियन डॉलर्ची 'खैरात', भारताच्या विरोधानंतरही मिळाले कर्ज
3
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
4
"तुम्ही एक कोटी देताय; मी एअर इंडियाला दोन कोटी देते, माझे वडील परत द्या"; बाप गमावला, मुलीच्या अश्रूंचा फुटला बांध
5
झापुक-झुपुक...! देशी कंपनीने एकाचवेळी दोन स्वस्त ५जी फोन लाँच केले, स्मार्टफोन मार्केटमध्ये अजून काय हवे...
6
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट'? काय आहे याचा अर्थ?
7
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
8
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
9
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
10
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
11
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
12
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
13
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
14
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
15
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
16
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
17
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
18
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
19
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
20
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस

कौटुंबिक वाद; चिमुकल्यांचा बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2018 01:06 IST

कौटुंबिक वाद, तणाव आणि आलेल्या रागाच्या भरात पोटच्या दोन चिमुकल्या मुलींना पाण्याच्या हौदात बुडवून ठार मारले. त्यानंतर ती निर्दयी माता माहेरी निघून गेली.

ठळक मुद्देनिर्दयी मातेचा कहरपोलिसांनी लावला प्रकरणाचा दोन तासांत छडापतीने चारित्र्यावर संशय घेतल्याने रागाच्या भरात पोटच्या गोळ्याला टाकले हौदात

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : कौटुंबिक वाद, तणाव आणि आलेल्या रागाच्या भरात पोटच्या दोन चिमुकल्या मुलींना पाण्याच्या हौदात बुडवून ठार मारले. त्यानंतर ती निर्दयी माता माहेरी निघून गेली. मात्र पोलिसांनी योग्य दिशेने तपास करीत अवघ्या दोन तासांत छडा लावला आणि खुनी मातेला गजाआड केले. तीनेही केलेल्या गुन्ह्याची कबुली दिल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. वारंवार पतीकडून घेतलेल्या चारित्र्यावरील संशयातून आपण हे कृत्य रागाच्या भरात केल्याचे तीने पोलिसांना सांगितल्याचे समजते. दरम्यान, या ह्रदयद्रावक घटनेमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.बीड तालुक्यातील खांडे पारगाव येथील राधेश्याम आमटे हे काही वर्षांपूर्वी रिक्षा चालविण्यासाठी बीडला आले. शहरातील नरसोबानगर भागात ते किरायाच्या घरात रहात होते. आई-वडील व छोटा भाऊ, पत्नी आणि गौरी, गायत्री आणि चार महिन्यांची मुलगी असा त्यांचा परिवार. राधेशाम यांना दारूचे व्यसन आहे. त्यामुळे घरात भांडणे होत होती. राधेशाम हा पत्नी दीपालीच्या चारित्र्यावर संशय घेत असे. यावरून त्याने अनेकवेळा दीपालीला मारहाणही केली होती. काही दिवसांपासून तर हे दररोजचेच झाले होते. याला दीपाली पूर्णत: वैतागली होती. दोन दिवसांपूर्वी तिचे पतीसोबत कडाक्याचे भांडणही झाले होते. यावेळी तिने टोकाचे पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला. सोमवारी सकाळीच सासु, सासरा, दीर आणि मोठी मुलगी गौरी हे दीपालीच्या नणंदेकडे बार्शीनाका येथे गेले होते. राधेशाम हा रिक्षा घेऊन गेला. दीपाली घरी एकटीच होती. दिवसभर विचार केला. सायंकाळी सात वाजेच्या सुमारास तिने गायत्री आणि चार महिन्यांच्या चिमुकलीला जवळ घेतले. अगोदर गायत्रीला हौदात टाकले. त्यानंतर चार महिन्याच्या चिमुकलीला. नऊ महिने पोटात वाढविलेल्या मुली डोळ्यासमोर बुडत असतानाही केवळ राग असल्याने दीपाली घराला कुलूप लावून अंधारात बाहेर पडली. रात्री ९ वाजेच्या सुमारास पती राधेशाम घरी आल्यावर त्याला पत्नी आणि मुली दिसल्या नाहीत. त्याने शिवाजीनगर पोलीस ठाणे गाठून माहिती दिली. तेवढ्यात खेर्डा (ता.गेवराई) येथील दीपालीच्या माहेरच्यांनी पोलिसांना फोन केला. घडलेला प्रकार सांगितला. खात्री पटल्यावर पोलिसांनी घरी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतले. जिल्हा रूग्णालयात त्यांचे शवविच्छेदन करण्यात आले. राधेश्यामच्या फिर्यादीवरून दीपालीविरोधात खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. घडला प्रकार भावासमोर कथन मुलींना हौदात टाकल्यावर दीपाली खेर्डा या आपल्या माहेरी गेली. घरी जाताच तिने आपण रागाच्या भरात केलेले कृत्य भावासमोर कथन केले. भावाने तात्काळ गावातील प्रतिष्ठीत व्यक्तींच्या कानावर ही बाब टाकली. त्यांनी पोलिसांना फोन करून कल्पना दिली. शिवाजीनगर पोलीस तात्काळ खेर्डात पोहचले आणि दीपालीला ताब्यात घेतले. चौकशीत तिने आपण हे कृत्य केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले.

राधेश्यामच होता आरोपीच्या पिंजऱ्यात

राधेशामवर यापूर्वी दोन गुन्हे दाखल आहेत. पोलिसांवर प्राणघातक हल्ले त्याने केलेले आहेत. त्याचे रेकॉर्ड पहात पोलिसांचा संशय राधेशामवर होता. त्यातच तो रात्री काही वेळ गायब होता. पहाटे अडीच वाजेच्या सुमारास त्याला बसस्थानकातील शौचालय परिसरात ताब्यात घेतले. मात्र चौकशीत दीपालीने सर्व कबुली दिल्यानंतर त्याला सोडून देण्यात आले.

एसपी, डीवायसपींची धाव

घटनेचे गांभीर्य पाहत अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, उपअधीक्षक सुधीर खिरडकर यांनी घटनास्थळी धाव घेतली. तर शिवाजीनगर ठाण्याचे पोनि शिवलाल पुरभे हे रात्रभर या प्रकरणाचा छडा लावत होते. त्यांच्यासोबत ठाण्यातील कर्मचारीही होते. पोलीस अधीक्षक जी.श्रीधर यांना याबाबत माहिती देण्यात येत होती.

दीपालीला जीवे मारण्याच्या धमक्या

राधेशाम हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा आहे. तो नेहमी दीपालीला त्रास देत असे. रविवारी त्याने दीपालीला मारहाण करून तिचा गळा आवळण्याचा प्रयत्न केला. तसेच कोयत्याने तुकडे करण्याची धमकीही दिली होती. यामुळे दीपाली दहशतीखाली होती. यातूनच तिने हे कृत्य केल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.

गौरीला बसला धक्का

आई आणि आपल्या लहान बहिणींना भेटून गौरी आत्याकडे गेली होती. मंगळवारी सकाळी तिला हा प्रकार समजल्यानंतर धक्काच बसला. आईकडे पाहून तिने जोरात आक्रोश केला. आपल्या बहिणींचे मृतदेह पाहून ती काही वेळासाठी बेशुद्धच झाली होती. इतर नातेवाईकांनाही ही घटना समजल्यानंतर धक्का बसला.

टॅग्स :BeedबीडMurderखूनCrime Newsगुन्हेगारीBeed policeबीड पोलीस