टेंबे गणपतीचे दरवर्षी भाद्रपद एकादशीला होते आगमन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2019 11:55 PM2019-09-07T23:55:57+5:302019-09-07T23:56:47+5:30

साधारणत: गणेश चतुर्थीच्या दिवशीच श्री गणरायाचे आगमन होते. काही ठिकाणी दीड दिवसातच गणेश विसर्जन करण्यात येते. परंतु सामान्यपणे १० दिवसांच्या मुक्कामानंतरच गणपती आपल्या गावी जातात. मात्र माजलगाव येथे एका अनोख्या गणपतीची स्थापना होते तो म्हणजे टेंबे गणेश.

Every year, the Bhadrapada visits the Ekadashi | टेंबे गणपतीचे दरवर्षी भाद्रपद एकादशीला होते आगमन

टेंबे गणपतीचे दरवर्षी भाद्रपद एकादशीला होते आगमन

Next
ठळक मुद्देमाजलगावात सोमवारी होणार टेंबे गणपतीची स्थापना

पुरुषोत्तम करवा ।
लोकमत न्यूज नेटवर्क
माजलगाव : साधारणत: गणेश चतुर्थीच्या दिवशीच श्री गणरायाचे आगमन होते. काही ठिकाणी दीड दिवसातच गणेश विसर्जन करण्यात येते. परंतु सामान्यपणे १० दिवसांच्या मुक्कामानंतरच गणपती आपल्या गावी जातात. मात्र माजलगाव येथे एका अनोख्या गणपतीची स्थापना होते तो म्हणजे टेंबे गणेश. या गणेशाचे वैशिष्ट्ये म्हणजे हा स्थापनाही उशिराने होते आणि अवघ्या पाच दिवसानंतर तो विसर्जित केला जातो. पण या दरम्यानच्या काळात कुठेही गणेश विसर्जन राहिलेले नसते. त्यामुळे या गणपतीला विशेष महत्व आहे. तसेच ब्रह्मवृंदांच्या हातानेच या गणपतीची मूर्ती साध्या मातीपासूनच अगदी परंपरेने ११८ वर्षांपासून बनवली जात असल्याने त्या मूर्तीला अनन्यसाधारण महत्व प्राप्त होते.
भट गल्लीमध्ये स्थापन होणाऱ्या व नवसाला पावणारा गणपती म्हणून राज्यभर ओळख असलेल्या या टेंबे गणपतीची स्थापना यावर्षी सोमवारी होणार आहे. मंडळाने यासाठी जय्यत तयारी केली आहे. राज्यामध्ये आगळीवेगळी ओळख असलेल्या टेंबे गणपतीची स्थापना १९०१ साली निजाम राजवटीमध्ये झाली होती. निजामकाळापासून भाद्रपद एकादशीला टेंबे गणेशाचे आगमण होते आणि पाच दिवसांनी म्हणजे भाद्रपद पोर्णिमेला विसर्जन होते. या पाठीमागे देखील एक प्रसंग असून स्वातंत्र्यपूर्व काळात १९०१ साली निजाम राजवटीत गणेशोत्सव साजरा करण्यासाठी रझाकारांची परवानगी लागत असे. गणेश चतुर्थीला टेंबे गणपतीच्या स्थापनेसाठी मंडळाच्या सदस्यांनी रझाकारांची परवानगी न घेता मिरवणूक काढली होती. गणपती बाप्पाच्या स्थापनेचा परवाना निझाम सरकारकडून मागितला गेला. त्यामुळे मंडळाचे तत्कालिन सदस्य कोंडोपंत जोशी, गणतप जोशी, मल्हार जोशी, राजाराम जोशी, राम जोशी, काशिनाथजोशी यांनी परवाना आणण्यासाठी वाहनांची सोय नसल्यामुळे घोड्यावरून भाग्यनगर म्हणजेच हैद्राबाद येथे गेले व तिथून ताम्रपटावर गणपती स्थापनेची परवानगी आणली.
या दरम्यान गेलेल्या कालावधीमुळे या गणपतीची स्थापना उशिराने होते आणि विसर्जन देखील उशिराने होते. या पाच दिवसीय गणेशोत्सवात रक्तदान शिबीर, वृक्षारोपण, वह्या पुस्तके वाटप, गणवेश वाटप, दुष्काळग्रस्तांना मदत, सामूहिक विवाह सोहळा, गोरगरिबांना मदत आदी विविध सामाजिक उपक्र म दरवर्षी राबविण्यात येतात. यंदा वाजतगाजत सोमवारी भाद्रपद एकादशीला टेंबे गणपतीची स्थापन होणार आहे.

Web Title: Every year, the Bhadrapada visits the Ekadashi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.