शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय सैन्य अन् पहलगाम हल्ल्यातील पीडित कुटुंबांना सर्व मॅचची फी देणार; सूर्यकुमार यादवची घोषणा
2
'४ वर्षांपूर्वीपासून...', सोनम वांगचुकच्या पाकिस्तान कनेक्शनवर त्याची पत्नी गीतांजली वांगचुक काय म्हणाल्या?
3
IND vs PAK Asia Cup Final : पाकिस्तानने आशिया कप ट्रॉफीसह टीम इंडियाची पदके चोरली, बीसीसीआयचा मोठा आरोप
4
लेहमध्ये सलग पाचव्या दिवशी सर्वत्र संचारबंदी; सोनम वांगचुक यांची त्वरित सुटका करण्याची देशभरातून मागणी
5
"आता प्रायश्चित्त घेण्याची वेळ, दसरा मेळावा रद्द करून..."; भाजपाची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका
6
भारताचा आशिया चषकावर विजयी 'तिलक'; पाकिस्तानला सलग तिसऱ्यांदा नमवले! कुलदीप, तिलक यांचे मोलाचे योगदान
7
आजचे राशीभविष्य, २९ सप्टेंबर २०२५: महत्वाच्या कामासाठी खर्च झाला तरी सुद्धा आर्थिक लाभ होतील
8
पंधरा दिवसांत ६०% जास्त पाऊस! मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातील चित्रच बदलले; आजही ६ जिल्ह्यांतऑरेंज अलर्ट
9
महिलांची सक्तीनं नसबंदी; ६० वर्षांनी माफी! ग्रीनलँडमध्ये ४५०० महिलांसोबत काय घडलेलं?
10
मोबाइलसारखीच लवकरच  बदलता येईल गॅसची कंपनी; काय बदल होणार? जाणून घ्या
11
आता पूर ओसरेल, मदत मिळेल... पण शेतकऱ्यांसमोर ३ वर्षे संकट! पुराने पळविले जमिनीचे पोषण, पुढील हंगामात धोका
12
विजयसाठी झुंबड ठरली जीवघेणी; तामिळनाडूच्या चेंगराचेंगरीतील मृतांची संख्या ४०वर
13
थंडगार वाळवंटात ही आग कुणी लावली? केंद्र सरकारशी बोलणी सुरू असतानाही हिंसाचार का?
14
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?
15
मुत्सद्देगिरी हेच औषध! ट्रम्प यांच्या 'टॅरिफ बॉम्ब'ने भारतीय फार्मा कंपन्यांचे काय होणार?
16
केवळ ३.९ टक्के महिलाच रोज करतात व्यायाम : सामाजिक मानसिकता बदलल्याशिवाय महिलांचा फिटनेस अशक्य
17
१७ विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण, ‘बाबा’ अखेर अटकेत; आग्रा येथून घेतले ताब्यात 
18
‘साधी तक्रार पुरेशी नाही; ती पत्नीछळाचा गुन्हा ठरत नाही’; सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले?
19
क्रिकेटपटू, अभिनेते येणार आणखी अडचणीत;  ऑनलाइन बेटिंगप्रकरणी मालमत्तेवर येणार टाच
20
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत

गावकारभारी निवडण्यासाठी मतदारांमध्ये उत्साह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2021 04:38 IST

बीड : जिल्ह्यातील १११ ग्रामपंचायतींसाठी शुक्रवारी मतदान शांततेत पार पडले. गावकारभारी निवडून आणण्यासाठी मतदारांनी मोठा उत्साह दाखविला. एकूण मतदान ...

बीड : जिल्ह्यातील १११ ग्रामपंचायतींसाठी शुक्रवारी मतदान शांततेत पार पडले. गावकारभारी निवडून आणण्यासाठी मतदारांनी मोठा उत्साह दाखविला. एकूण मतदान ८३.५८ टक्के झाल्याचे सांगण्यात आले. जिल्ह्यात प्रथमच ग्रामपंचायत निवडणुका शांततेत पार पडल्या. पहिल्या टप्प्यात जिल्ह्यात १२९ ग्रामपंचायतींची निवडणूक जाहीर झाली होती. यापैकी १८ ग्रामपंचायती बिनविरोध निघाल्या, तर उर्वरित ११ ग्रामपंचायतींच्या ४१३ प्रभागातील १०५१ जागांसाठी शुक्रवारी मतदान झाले. सकाळपासून मतदारांमध्ये उत्साह दिसून आला. बीड तालुक्यात ८७ टक्के, अंबाजाेगाईत ८३.९५, धारुर ७६.४०, माजलगाव ७९.८२, गेवराई ८२.४१, आष्टी ८६.६५, केज ८०.९४, पाटोदा ८७.७२, वहवणी ८३.४४ शिरूर कासार तालुक्यात ८७.८७ टक्के मतदान झाले. एकूण १ लाख ३ हजार ४९८ मतदारांनी आपला हक्क बजावला. यात ६१ हजार ७८८ स्त्री तर ७१ हजार ७१० पुरुष मतदारांचा समावेश होता.

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संवेदनशील गावे, मतदान केंद्रांवर पोलीस बंदोबस्त वाढविला होता. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दक्षतेच्या सूचना देण्यात आल्या होत्या. ४२४ मतदान केंद्रांवर २७० अधिकारी, तर १५३२ कर्मचारी नियुक्त केले होते.

गावचा कारभार हाती घेण्यासाठी अनेक ठिकाणी चुरस पहायला मिळाली. यातच थेट मतदारांपर्यंत प्रभावी संपर्कातून वेवगेळ्या पद्धतीने उमेदवारांनी विनवण्या केल्या. घरकुल, गावचे तसेच वैयक्तिक प्रश्न सोडविण्याची आश्वासने ग्रामस्थांना मिळाली. उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले असून १८ रोजी निकाल लागणार आहे.