शहरं
Join us  
Trending Stories
1
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
2
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
3
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
4
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
5
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
6
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
7
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
8
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
9
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
10
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
11
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
12
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
13
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
14
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
15
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
16
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
17
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
18
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
19
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
20
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वे धावल्याने बीडकरांत उत्साह; ५० वर्षांच्या स्वप्नपूर्तीमागे राजकीय नेत्यांपासून सर्वसामान्यांचा संघर्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2025 12:12 IST

बीडकरांची स्वप्नपूर्ती झाल्याने उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण आहे.

बीड : बीडकरांच्या जिव्हाळ्याचा असलेला रेल्वे प्रकल्प ५० वर्षांनंतर पूर्णत्वास जात आहे. बीड ते अहिल्यानगर असे १६६ किलोमीटरचे काम पूर्ण झाले असून, मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या मुहूर्तावर डेमू रेल्वेही धावली. यासाठी विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी आंदोलने केली, तुरुंगातही गेले होते. पण आता बीडकरांची स्वप्नपूर्ती झाल्याने उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण आहे. दिवसभर रेल्वे स्थानकावर बीडकरांची गर्दी दिसून आली. अजूनही बीड ते परळी या मार्गाचे काम अपूर्ण आहे.

बीडला रेल्वे यावी, ही अनेक वर्षांपासूनची मागणी आहे. दिवंगत माजी खासदार केशरकाकू क्षीरसागर, गोपीनाथराव मुंडे यांच्यासह अनेक नेते आणि रेल्वे कृती समितीच्या सदस्यांनी पाठपुरावा केला. त्यानंतर १९९५ साली अहिल्यानगर ते बीड या रेल्वे मार्गासाठी तांत्रिक मान्यता मिळाली. तेव्हा ३३५ कोटी रुपयांचा निधीही मंजूर झाला होता, पण कामाचा खर्च वाढत गेल्याने तो आता ४ हजार ८०० कोटी रुपयांपर्यंत गेला आहे. केंद्र आणि राज्य सरकारने निधी वितरित केल्याने मंगळवारी बीड ते अहिल्यानगर या मार्गावर पहिल्यांदाच डेमू रेल्वे धावली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह इतर मान्यवरांनी हिरवा झेंडी दाखवून ही रेल्वे मार्गस्थ केली. अजूनही बीड ते परळी आणि बीड ते छत्रपती संभाजीनगर ते धाराशिव या मार्गासाठी लोकप्रतिनिधी आणि बीडकरांचा लढा सुरूच आहे.

५० टक्के वाटा न दिल्याने प्रकल्प रखडले : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसरेल्वे प्रकल्पांसाठी ५० टक्के निधी देणार नाही, असा निर्णय मागील सरकारने घेतल्यामुळे राज्यातील सर्वच रेल्वे प्रकल्पांची कामे रखडली, अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे सरकारचा नामोल्लेख न करता केली. मागील दहा वर्षांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने मराठवाड्यातील रेल्वे प्रकल्पांसाठी २१ हजार कोटी रुपये दिले. त्याआधीच्या सरकारने दहा वर्षांत केवळ ४५० कोटी रुपये दिल्याचा दावाही त्यांनी केला. आजचा दिवस श्रेयवादाचा नसून आनंदाचा आहे. हा जगन्नाथाचा रथ प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष ओढणाऱ्या सर्वांचा उल्लेखही फडणवीस यांनी केला.

मुंबईसाठी रेल्वे पुण्यापर्यंत जोडणारउपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, आज बीडकरांची रेल्वेची स्वप्नपूर्ती होत आहे. सध्या डेमू रेल्वे सुरू झाली आहे. महिनाभरात इलेक्ट्रिकचे काम सुरू होईल. त्यानंतर टप्प्याटप्प्याने बीड-अहिल्यानगर प्रवासाचा वेळ कमी होईल. मुंबईला जाण्यासाठी ही रेल्वे पुण्यापर्यंत नेणार आहे." बीडमध्ये रेल्वेच नव्हे, तर विमानतळ लवकरच होईल, असेही ते म्हणाले. तसेच, अतिवृष्टीने नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करून मदत देण्यासाठी तत्पर असल्याचा विश्वासही त्यांनी दिला.

बीड-अहिल्यानगर रेल्वेची ठळक आकडेवारीमार्गाची एकूण लांबी : २६१.२५ किलोमीटर (अहिल्यानगर-बीड-परळी रेल्वे मार्ग)निधी : ४८०५.१७ कोटीडेमू रेल्वे (बीड ते अहिल्यानगर)सुटण्याची वेळ (अहिल्यानगरहून) : सकाळी ६:५५ वाजतापोहोचण्याची वेळ (बीड येथे) : दुपारी १२:३० वाजतासुटण्याची वेळ (बीडहून) : दुपारी १:०० वाजतापोहोचण्याची वेळ (अहिल्यानगर येथे) : सायंकाळी ६:३० वाजतातिकीट दर : ४० रुपयेथांबे : एकूण १३पूर्ण झालेले काम : अहिल्यानगर ते बीडबाकी असलेले काम : बीड ते परळी वैजनाथ

टॅग्स :BeedबीडMarathwadaमराठवाडाrailwayरेल्वे