शहरं
Join us  
Trending Stories
1
भगवान विष्णू यांच्यावरील वक्तव्यासंदर्भात CJI बीआर गवई यांचं स्पष्टिकरण; 'संयम राखायला हवा...', विश्वहिंदू परिषदेचा सल्ला
2
IND vs PAK हस्तांदोलन वादाचा खरा आरोपी सापडला... सामनाधिकारी पॉयक्रॉफ्टची चूकच नव्हती!
3
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
4
अंगणवाडी सेविकांना मिळणार स्मार्टफोन, वाढणार मानधन; योगी आदित्यनाथ यांची मोठी घोषणा
5
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
6
सुनेला वाचवण्यासाठी धावली सासू, पण तेवढ्यात धडाधड कोसळली भिंत, सून वाचली पण...  
7
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
8
सावधान! आयफोन १७च्या नावाखाली फसवणूक, सायबर गुन्हेगार 'असे' करतात खाते रिकामी
9
Sarva Pitru Amavasya 2025: सर्वपित्री अमावस्येला आहे सूर्यग्रहण; काळजीपूर्वक टाळा 'या' चुका!
10
बंगळुरुतील योग गुरुचा 8 महिलांवर अत्याचार; अल्पवयीन पीडितेने दाखवले धाडस, पोलिसांनी आवळल्या मुसक्या
11
३० पैशांवरुन २४ रुपयांवर आला 'हा' शेअर; १ लाखाचे केले ८ कोटी, गुंतवणूकदार मालामाल
12
GST कपातीनंतर Maruti ची मोठी घोषणा! S-Presso ₹ 3.50 लाखात तर Wagon R फक्त...
13
Surya Grahan 2025: ग्रहण सूर्याला मात्र 'या' राशींचे भाग्य येईल फळाला; १०० वर्षांनी जुळून आलाय अपूर्व योग!
14
पेन्शनधारकांसाठी गुड न्यूज! १ ऑक्टोबरपासून NPS चे नियम बदलणार, तरुणांना सर्वाधिक फायदा
15
पोहे आणि उपमा नेहमीच खातो पण त्याचे फायदे माहितीहेत का, दोघांपैकी आरोग्यासाठी बेस्ट काय?
16
पितृपक्ष २०२५ शिवरात्री: व्रतात ‘हे’ मंत्र म्हणा, महादेव प्रसन्न होतील, पूर्वज वरदान देतील!
17
Gold Silver Price 18 September: अचानक का कमी होताहेत सोन्या-चांदीचे दर; पुढेही सुरू राहणार का ही घसरण?
18
ऑनलाइन पद्धतीने मतदाराचे नाव मतदार यादीतून हटवता येते का? निवडणूक आयोग म्हणाले...
19
११ वर्षांनी लहान मुलाच्या प्रेमात पडली २८ वर्षांची तरुणी; लग्नाला नकार मिळाल्यावर मागू लागली ५० लाख!
20
Navi Mumbai: 'कपडे काढ नाहीतर तुझ्या भावालाच संपवेन'; 12 वर्षाच्या मुलीवर घरी नेऊन केला बलात्कार, नवी मुंबईतील घटना

रेल्वे धावल्याने बीडकरांत उत्साह; ५० वर्षांच्या स्वप्नपूर्तीमागे राजकीय नेत्यांपासून सर्वसामान्यांचा संघर्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2025 12:12 IST

बीडकरांची स्वप्नपूर्ती झाल्याने उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण आहे.

बीड : बीडकरांच्या जिव्हाळ्याचा असलेला रेल्वे प्रकल्प ५० वर्षांनंतर पूर्णत्वास जात आहे. बीड ते अहिल्यानगर असे १६६ किलोमीटरचे काम पूर्ण झाले असून, मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या मुहूर्तावर डेमू रेल्वेही धावली. यासाठी विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी आंदोलने केली, तुरुंगातही गेले होते. पण आता बीडकरांची स्वप्नपूर्ती झाल्याने उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण आहे. दिवसभर रेल्वे स्थानकावर बीडकरांची गर्दी दिसून आली. अजूनही बीड ते परळी या मार्गाचे काम अपूर्ण आहे.

बीडला रेल्वे यावी, ही अनेक वर्षांपासूनची मागणी आहे. दिवंगत माजी खासदार केशरकाकू क्षीरसागर, गोपीनाथराव मुंडे यांच्यासह अनेक नेते आणि रेल्वे कृती समितीच्या सदस्यांनी पाठपुरावा केला. त्यानंतर १९९५ साली अहिल्यानगर ते बीड या रेल्वे मार्गासाठी तांत्रिक मान्यता मिळाली. तेव्हा ३३५ कोटी रुपयांचा निधीही मंजूर झाला होता, पण कामाचा खर्च वाढत गेल्याने तो आता ४ हजार ८०० कोटी रुपयांपर्यंत गेला आहे. केंद्र आणि राज्य सरकारने निधी वितरित केल्याने मंगळवारी बीड ते अहिल्यानगर या मार्गावर पहिल्यांदाच डेमू रेल्वे धावली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह इतर मान्यवरांनी हिरवा झेंडी दाखवून ही रेल्वे मार्गस्थ केली. अजूनही बीड ते परळी आणि बीड ते छत्रपती संभाजीनगर ते धाराशिव या मार्गासाठी लोकप्रतिनिधी आणि बीडकरांचा लढा सुरूच आहे.

५० टक्के वाटा न दिल्याने प्रकल्प रखडले : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसरेल्वे प्रकल्पांसाठी ५० टक्के निधी देणार नाही, असा निर्णय मागील सरकारने घेतल्यामुळे राज्यातील सर्वच रेल्वे प्रकल्पांची कामे रखडली, अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे सरकारचा नामोल्लेख न करता केली. मागील दहा वर्षांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने मराठवाड्यातील रेल्वे प्रकल्पांसाठी २१ हजार कोटी रुपये दिले. त्याआधीच्या सरकारने दहा वर्षांत केवळ ४५० कोटी रुपये दिल्याचा दावाही त्यांनी केला. आजचा दिवस श्रेयवादाचा नसून आनंदाचा आहे. हा जगन्नाथाचा रथ प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष ओढणाऱ्या सर्वांचा उल्लेखही फडणवीस यांनी केला.

मुंबईसाठी रेल्वे पुण्यापर्यंत जोडणारउपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, आज बीडकरांची रेल्वेची स्वप्नपूर्ती होत आहे. सध्या डेमू रेल्वे सुरू झाली आहे. महिनाभरात इलेक्ट्रिकचे काम सुरू होईल. त्यानंतर टप्प्याटप्प्याने बीड-अहिल्यानगर प्रवासाचा वेळ कमी होईल. मुंबईला जाण्यासाठी ही रेल्वे पुण्यापर्यंत नेणार आहे." बीडमध्ये रेल्वेच नव्हे, तर विमानतळ लवकरच होईल, असेही ते म्हणाले. तसेच, अतिवृष्टीने नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करून मदत देण्यासाठी तत्पर असल्याचा विश्वासही त्यांनी दिला.

बीड-अहिल्यानगर रेल्वेची ठळक आकडेवारीमार्गाची एकूण लांबी : २६१.२५ किलोमीटर (अहिल्यानगर-बीड-परळी रेल्वे मार्ग)निधी : ४८०५.१७ कोटीडेमू रेल्वे (बीड ते अहिल्यानगर)सुटण्याची वेळ (अहिल्यानगरहून) : सकाळी ६:५५ वाजतापोहोचण्याची वेळ (बीड येथे) : दुपारी १२:३० वाजतासुटण्याची वेळ (बीडहून) : दुपारी १:०० वाजतापोहोचण्याची वेळ (अहिल्यानगर येथे) : सायंकाळी ६:३० वाजतातिकीट दर : ४० रुपयेथांबे : एकूण १३पूर्ण झालेले काम : अहिल्यानगर ते बीडबाकी असलेले काम : बीड ते परळी वैजनाथ

टॅग्स :BeedबीडMarathwadaमराठवाडाrailwayरेल्वे