शहरं
Join us  
Trending Stories
1
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
2
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
3
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
4
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
5
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना
6
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
7
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 
8
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
9
'हार मानणार नाही..'; कार्तिक आर्यनच्या 'चंदू चँपियन'चा ट्रेलर, मराठमोळ्या हेमांगी कवीने वेधलं लक्ष
10
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास
11
केजरीवाल यांचे माजी पीए बिभव कुमार अखेर अटकेत; स्वाती सहज बाहेर पडल्या, ‘आप’ने जारी केला व्हिडीओ 
12
'सिंघम 3' च्या सेटवरुन अजय देवगण-जॅकी श्रॉफचा फाईट सीन लीक, व्हिडीओ व्हायरल
13
आता भाजप सक्षम, सगळे निर्णय स्वबळावर; रा.स्व. संघाची मदत घेण्याबाबत जे.पी.नड्डा यांचे मत
14
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
15
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
16
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
17
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
18
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
19
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
20
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 

कर्मचारी कमतरतेने पाणी चोर निर्धास्त 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2017 5:23 PM

कालव्याच्या मार्गातील अनेक गावातील नागरिकांनी हा कालवा जागोजागी फोडलेला आहे. यासोबतच धरणातील पाण्याची देखील मोठया प्रमाणावर चोरी होत आहे.परंतु; जलसंधारण व उपसा सिंचन विभागाच्या माजलगाव येथील कार्यालयात कर्मचा-यांची कमतरता असल्याने पाणी चोरीवर नियंत्रण मिळवणे कठीण झाले आहे. 

ऑनलाईन लोकमत

माजलगाव (बीड), दि. १३ : पैठण येथील जायकवाडी धरणाच्या उजव्या कालव्याचा बराचसा भाग गेवराई व माजलगांव तालुक्यातुन माजलगांव धरणापर्यंत आलेला आहे. कालव्याच्या मार्गातील अनेक गावातील नागरिकांनी हा कालवा जागोजागी फोडलेला आहे. यासोबतच धरणातील पाण्याची देखील मोठया प्रमाणावर चोरी होत आहे.परंतु; जलसंधारण व उपसा सिंचन विभागाच्या माजलगाव येथील कार्यालयात कर्मचा-यांची कमतरता असल्याने पाणी चोरीवर नियंत्रण मिळवणे कठीण झाले आहे. 

माजलगांव धरणाच्या पाण्यावर तसेच पैठण येथुन कालव्याद्वारे सोडलेल्या पाण्यावर नियंत्रण ठेवण्याचे काम उपसा सिंचन योजनेच्या दोन शाखांमार्फत केले जाते. दोन्ही शाखांमध्ये मिळुन कालवा निरीक्षकांची 6 पदे, दप्तर कारकुनची 2 पदे व मजुरांची 6 अशी 14 पदे रिक्त आहेत. यामुळे या शाखांमार्फत आता केवळ कार्यालयीन कामच होते. प्रत्यक्ष कामासाठी येथे कर्मचारीच नाहीत. 

बिनधास्त चोरले जाते पाणी  धरणाकडे येणा-या कालव्याला ठिकठिकाणी लोकांनी छिद्र पाडून पाणी वळवलेले आहे. एका गावात तर चक्क बंधा-यात ओढुन घेतलेले आहे त्यामुळे पैठण वरुन निघालेल्या पाण्याच्या केवळ 10 टक्के इतकेच पाणी धरणात येते. याने  कालव्याची अगदी चाळण झाली आहे. यातच कालवा निरीक्षकांची पदे रिक्त असल्यामुळे कालव्यावर नेमके काय चाललेय याची माहिती विभागाला फार उशिराने मिळते. माहिती मिळते तेव्हा खूप उशीर झालेला असतो. तसेच कारवाईसाठी निरीक्षकच नसल्यामुळे या पाणी चोरांवर कोणतीच कारवाई करता येत नाही. यामुळे हे पाणी चोर अगदी निर्धास्त आहेत. 

दुसरीकडे, याच विभागाच्या नियंत्रणाखाली असलेल्या धरणातील पाण्याचा देखील मोठया प्रमाणावर अवैधरीत्या उपसा  होत आहे. धरणावरुन शेतीसाठी पाणी उपसा करण्याचे 1586 जणांना परवाने देण्यात आलेले आहेत. यातील केवळ 350 परवाना धारकाच पाणी उपसा करत आहेत. या व्यतिरिक्त दीड ते दोन हजार मोटार मात्र विनापरवानाच पाणी उपसा करत आहेत. पाटबंधारे विभागा अंतर्गत असलेली जवळपास सर्वच कार्यालये ही सन 2000 मध्ये माजलगांव येथुन परळी येथे स्थलांतरीत झालेले आहेत. यामुळे विभागाचा सारा कारभार परळी येथून राबवला जातो. हा कारभार म्हणजे उंटावरुन शेळया हाकल्या सारखाच असल्याने पाणी चोरीला आळा घालणे अवघड झाले आहे.

कर्मचारी कमतरतेने अडचणीकार्यालयात कर्मचा-यांच्या कमतरतेबाबत आम्ही वरिष्ठांना वेळोवेळी कळवलेले आहे. कर्मचा-यांचे संख्याबळ कमी असल्यामुळे पाणी चोरी संदर्भात कारवाई करण्यास अडचणी येतात.- व्ही. आर.फड, शाखा अधिकारी, माजलगांव जलसंधारण व उपसासिंचन शाखा क्र.- 2