शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
4
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
5
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
6
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
7
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
8
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
9
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
10
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
11
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
12
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
13
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
14
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
15
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
16
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
17
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
18
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
19
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
20
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...

आश्वासनांवर निवडणुका लढता येणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2018 11:30 IST

आम्ही हा विकास करु तो विकास करु असे म्हणण्याचे दिवस गेले आहेत. या पुढील काळात केवळ अश्वासनावर निवडणूका लढवता येणार नाहीत. आधी काम करा मगच बोला असे जनता बोलत आहे. त्यामुळे नेत्यांना प्रत्यक्षात आधी कामे करावी लागणार आहेत.

ठळक मुद्देबीडमध्ये बहुप्रतीक्षित पासपोर्ट सेवा केंद्राचे उद्घाटन

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : आम्ही हा विकास करु तो विकास करु असे म्हणण्याचे दिवस गेले आहेत. या पुढील काळात केवळ अश्वासनावर निवडणूका लढवता येणार नाहीत. आधी काम करा मगच बोला असे जनता बोलत आहे. त्यामुळे नेत्यांना प्रत्यक्षात आधी कामे करावी लागणार आहेत. जिल्ह्याच्या विकास कामात राजकारण न करता सर्वांनी एकत्र येण्याची गरज असल्याचे मत खा. डॉ. प्रीतम मुंडे यांनी व्यक्त केले. संसदेत मागणी केल्यानंतर बीड येथे पासपोर्ट कार्यालय सुरु करण्यासाठी कसरत करावी लागली. आजारी असतानाही परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी मदत केली. त्यामुळे सुरु झालेल्या या सुविधेचा जनतेला लाभ होणार असल्याचे त्या म्हणाल्या.

येथील राजूरी वेस परिसरातील डाकघर कार्यालयात गुरूवारी पासपोर्ट सेवा केंद्राचे उद्घाटन झाले. त्यावेळी त्या बोलत होत्या. व्यासपीठावर नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर, जि.प अध्यक्षा सविता गोल्हार, आ. लक्ष्मण पवार, आ. संगीता ठोंबरे, माजी आ. आदिनाथराव नवले, विजयकुमार पालसिंगणकर, संतोष हंगे, रमेश पोकळे, सलीम जहांगीर, डाक पासपोर्ट कार्यालयाचे क्षेत्रीय अधिकारी अनंत ताकवाले, प्रणव कुमार, एस.एन. शास्त्री, कोळी आदी उपस्थित होते.

या वेळी नगराध्यक्ष क्षीरसागर म्हणाले, स्व. खा. केशर काकू व स्व. गोपीनाथ मुंडे हे बीडच्या विकासासाठी राजकारण दूर करून एकत्र येत होते. रेल्वेच्या कामाचे स्वप्न हे खऱ्या अर्थाने त्यांच्या प्रयत्नामुळे पूर्ण होत असल्याचे ते म्हणाले. क्षेत्रीय अधिकारी ताकवले म्हणाले, पासपोर्टसाठीच्या अटी, नियम, कागदपत्र शिथिल केले आहेत. बीड मधील जनतेने लाभ घेण्याचे आवाहन त्यांनी केले. प्रास्ताविक प्रणवकुमार यांनी केले. सूत्रसंचालन डाक अधिकारी नरके यांनी केले.

खेळण्यातील इंजिन तरी आणले का ?बीड रेल्वेचे काम हे प्रगतीपथावर आहे, या कामात बाधा आणण्याचा प्रयत्न काही विघ्नसंतोषी लोक करत आहेत. मावेजाच्या नावाखाली ते दिशाभूल करत आहेत. रेल्वे भूसंपादनात सामान्य शेतकºयांवर अन्याय झाला असेल तर तो दूर केला जाईल . मात्र कोणाच्या तरी सांगण्यावरून हे असले प्रक ार करू नयेत. जे आरोप करत आहेत, त्यांनी खेळण्यातील इंजिन तरी बीडसाठी आणले का असा खोचक टोला खा. मुंडे यांनी विरोधकांना लगावला.

कार्यकर्त्यांची भाऊगर्दी, राजशिष्टाचाराचा विसरकोणत्याही केंद्रीय किंवा राज्य पातळीवरील शासकीय कार्यक्रमाचा राजशिष्टाचार असतो. मात्र कार्यकर्त्यांच्या भाऊ गर्दीमुळे राजशिष्टाचाराचा विसर अधिकारी तसेच नेत्यांना पडल्याचे या कार्यक्रमात दिसून आले.

टॅग्स :BeedबीडPritam Mundeप्रीतम मुंडेMarathwadaमराठवाडाPoliticsराजकारणpassportपासपोर्ट