शहरं
Join us  
Trending Stories
1
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
2
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
3
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
4
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
5
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
6
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
7
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
8
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
9
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
10
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
11
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
12
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
13
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
14
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
15
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
16
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
17
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
18
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
19
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
20
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!

आश्वासनांवर निवडणुका लढता येणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2018 11:30 IST

आम्ही हा विकास करु तो विकास करु असे म्हणण्याचे दिवस गेले आहेत. या पुढील काळात केवळ अश्वासनावर निवडणूका लढवता येणार नाहीत. आधी काम करा मगच बोला असे जनता बोलत आहे. त्यामुळे नेत्यांना प्रत्यक्षात आधी कामे करावी लागणार आहेत.

ठळक मुद्देबीडमध्ये बहुप्रतीक्षित पासपोर्ट सेवा केंद्राचे उद्घाटन

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : आम्ही हा विकास करु तो विकास करु असे म्हणण्याचे दिवस गेले आहेत. या पुढील काळात केवळ अश्वासनावर निवडणूका लढवता येणार नाहीत. आधी काम करा मगच बोला असे जनता बोलत आहे. त्यामुळे नेत्यांना प्रत्यक्षात आधी कामे करावी लागणार आहेत. जिल्ह्याच्या विकास कामात राजकारण न करता सर्वांनी एकत्र येण्याची गरज असल्याचे मत खा. डॉ. प्रीतम मुंडे यांनी व्यक्त केले. संसदेत मागणी केल्यानंतर बीड येथे पासपोर्ट कार्यालय सुरु करण्यासाठी कसरत करावी लागली. आजारी असतानाही परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी मदत केली. त्यामुळे सुरु झालेल्या या सुविधेचा जनतेला लाभ होणार असल्याचे त्या म्हणाल्या.

येथील राजूरी वेस परिसरातील डाकघर कार्यालयात गुरूवारी पासपोर्ट सेवा केंद्राचे उद्घाटन झाले. त्यावेळी त्या बोलत होत्या. व्यासपीठावर नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर, जि.प अध्यक्षा सविता गोल्हार, आ. लक्ष्मण पवार, आ. संगीता ठोंबरे, माजी आ. आदिनाथराव नवले, विजयकुमार पालसिंगणकर, संतोष हंगे, रमेश पोकळे, सलीम जहांगीर, डाक पासपोर्ट कार्यालयाचे क्षेत्रीय अधिकारी अनंत ताकवाले, प्रणव कुमार, एस.एन. शास्त्री, कोळी आदी उपस्थित होते.

या वेळी नगराध्यक्ष क्षीरसागर म्हणाले, स्व. खा. केशर काकू व स्व. गोपीनाथ मुंडे हे बीडच्या विकासासाठी राजकारण दूर करून एकत्र येत होते. रेल्वेच्या कामाचे स्वप्न हे खऱ्या अर्थाने त्यांच्या प्रयत्नामुळे पूर्ण होत असल्याचे ते म्हणाले. क्षेत्रीय अधिकारी ताकवले म्हणाले, पासपोर्टसाठीच्या अटी, नियम, कागदपत्र शिथिल केले आहेत. बीड मधील जनतेने लाभ घेण्याचे आवाहन त्यांनी केले. प्रास्ताविक प्रणवकुमार यांनी केले. सूत्रसंचालन डाक अधिकारी नरके यांनी केले.

खेळण्यातील इंजिन तरी आणले का ?बीड रेल्वेचे काम हे प्रगतीपथावर आहे, या कामात बाधा आणण्याचा प्रयत्न काही विघ्नसंतोषी लोक करत आहेत. मावेजाच्या नावाखाली ते दिशाभूल करत आहेत. रेल्वे भूसंपादनात सामान्य शेतकºयांवर अन्याय झाला असेल तर तो दूर केला जाईल . मात्र कोणाच्या तरी सांगण्यावरून हे असले प्रक ार करू नयेत. जे आरोप करत आहेत, त्यांनी खेळण्यातील इंजिन तरी बीडसाठी आणले का असा खोचक टोला खा. मुंडे यांनी विरोधकांना लगावला.

कार्यकर्त्यांची भाऊगर्दी, राजशिष्टाचाराचा विसरकोणत्याही केंद्रीय किंवा राज्य पातळीवरील शासकीय कार्यक्रमाचा राजशिष्टाचार असतो. मात्र कार्यकर्त्यांच्या भाऊ गर्दीमुळे राजशिष्टाचाराचा विसर अधिकारी तसेच नेत्यांना पडल्याचे या कार्यक्रमात दिसून आले.

टॅग्स :BeedबीडPritam Mundeप्रीतम मुंडेMarathwadaमराठवाडाPoliticsराजकारणpassportपासपोर्ट