शहरं
Join us  
Trending Stories
1
VIDEO: उत्तरकाशीमध्ये ढगफुटी; १४ सेकंदात सगळं गाव उद्ध्वस्त, घरांसह अनेकजण ढिगाऱ्याखाली गाडले गेले
2
मंत्रिमंडळ बैठकीत ७ मोठे निर्णय; स्टार्टअप उद्योजगता धोरण जाहीर, समृद्धी फ्रेट कॉरिडॉर मंजूर
3
मराठीशी पंगा महागात! निशिकांत दुबेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता; मनसेकडून याचिका दाखल
4
बिहारमध्ये डोमिसाईल पॉलिसी मंजूर; शिक्षक भरतीमध्ये ८५ टक्के बिहारींनाच नोकरी मिळणार
5
पाकिस्तानातील प्रत्येक सहावा व्यक्ती भिकारी; परदेशात पसरलं नेटवर्क, दरवर्षी ११७ ट्रिलियन कमाई
6
सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; घटस्फोटानंतर 12 कोटी रुपये अन् BMW कार मागणाऱ्या पत्नीला काय मिळाले?
7
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
8
युजवेंद्र चहलने घटस्फोटावर उघडपणे विधान केल्यानंतर Ex-पत्नी धनश्रीची पोस्ट, म्हणाली- शांतता...
9
सरकारांना ईव्हींवर आणखी ऑफर्स द्याव्या लागणार? विक्रीच्या वेगावर निती आयोगाचे वक्तव्य...
10
छोट्या भावावर हात उचलणाऱ्याला कायमचं संपवलं; भावाचा बदला घेणारी २२ वर्षीय 'लेडी डॉन' कोण?
11
नवऱ्याचं पोट फाडलं, मृतदेहावर अ‍ॅसिड ओतलं; बॉयफ्रेंडसाठी तबस्सुमनं गाठला क्रूरतेचा कळस 
12
Jalana: "भाजप प्रवेशाच्या निव्वळ अफवा"; राजेश टोपेंनी चर्चांना दिला पूर्णविराम
13
कथावाचक प्रदीम मिश्रा यांच्या कुबेरेश्वर धाममध्ये चेंगराचेंगरी, २ महिलांचा मृत्यू, अनेकजण जखमी   
14
Satyapal Malik Death: जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
15
Thane: ठाण्यातील प्रतिष्ठित शाळेत ४ वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार, पालकांच्या आरोपानंतर तपास सुरू
16
“मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंना चांगले यश मिळेल”; महायुतीतील नेत्याचा मोठा दावा
17
Satyapal Malik: 'मला सत्य सांगायचे आहे', शेवटच्या पोस्टमध्ये काय म्हणाले होते सत्यपाल मलिक?
18
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! दिवाळीपूर्वी पगारात होणार इतकी वाढ? कोणाला मिळणार फायदा?
19
"Help Me! गर्लफ्रेंडसोबत फिरायला जायचंय..."; बॉयफ्रेंडने लावले UPI स्कॅनर असलेले पोस्टर
20
Mumbai: कबुतरांना दाणे टाकताना रोखलं, वृद्ध व्यक्तीसह त्यांच्या मुलावर लोखंडी रॉडने हल्ला!

दसरा मेळावा म्हणजे भक्ती आणि उर्जेचा मिलाप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2018 00:18 IST

सावरगावचा दसरा मेळावा हा राजकीय नसून देशभरातील उसतोड कामगार, शेतमजुरांना उर्जा देणारा आहे. या मेळाव्यातून भक्ती आणि उर्जेचा सुंदर मिलाप पहावयास मिळतो. मेळाव्यातून उसतोड कामगारांना स्फूर्ती, उर्जा, नवा विचार मिळतो, असे खा.डॉ.प्रीतम मुंडे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

ठळक मुद्देप्रीतम मुंडे यांचे प्रतिपादन : सावरगाव येथे होणाऱ्या मेळावा मैदानासह इतर व्यवस्थेचा घेतला आढावा

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : सावरगावचा दसरा मेळावा हा राजकीय नसून देशभरातील उसतोड कामगार, शेतमजुरांना उर्जा देणारा आहे. या मेळाव्यातून भक्ती आणि उर्जेचा सुंदर मिलाप पहावयास मिळतो. मेळाव्यातून उसतोड कामगारांना स्फूर्ती, उर्जा, नवा विचार मिळतो, असे खा.डॉ.प्रीतम मुंडे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या उपस्थितीत होणारा भगवान गडावरील दसरा मेळावा त्याच्या निधनानंतर गत वर्षापासून संत भगवानबाबांची जन्मभूमी सावरगांव घाट ता. पाटोदा येथे होत आहे. सावरगाव येथे कामाचा आढावा घेताना त्या बोलत होत्या. या मेळाव्याचे हे दुसरे वर्ष असून भगवानबाबांच्या भव्य २५ फूट उंचीची मूर्ती व स्मारकाचे लोकार्पण या मेळाव्यात होणार असल्याचे डॉ. प्रीतम मुंडे यांनी सांगितले. जवळपास अडीच एकर परिसरात हे भव्य स्मारक उभारण्यात येत आहे. ६४ बाय ६४ फूट गोलाकार आकाराचे बांधकाम केले आहे. यात जवळपास सव्वादोन लाख लिटर पाणी साठविले आहे. पाण्यावर बसून भगवानबाबांनी ज्ञानेश्वरी वाचली. त्याप्रमाणे दसºयाला या मूर्तीची स्थापना करण्यात येणार आहे. या स्मारकामुळे सावरगावचे रुपच बदलत आहे. वाहतुकीस अडथळा होऊ नये म्हणून मंदीर परिसरातील रस्त्यांचे रुंदीकरण करण्यात येत आहे.पत्रकारांशी बोलताना खा.प्रीतम मुंडे म्हणाल्या की, दसरा मेळावा म्हणजे उसतोड कामगार आणि समाजासाठी एक आकर्षण असे. या मेळाव्या मुंडेसाहेब काय बोलणार, याबद्दल सर्वांनाच उत्सुकता असे. समाज आणि कामगारांच्या विविध प्रश्नांवर या मेळाव्यात विचार मंथन होत असे. साहेबांनंतर पंकजाताईनी हे कार्य हाती घेतले आहे. त्यांच्या भाषणातून उर्जा घेऊन भाविक, ऊसतोड कामगार, शेतमजूर आपापल्या गावी परतत असे.त्यामुळे भक्ती आणि उर्जेचा मेळावा आहे, असे त्या म्हणाल्या.पावसाअभावी भयानक असा दुष्काळ पडला आहे. सर्वच पिके हातून गेली आहेत. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होत आहे. जिल्ह्यातील सरसकट शेतकºयांना शासनाकडून मदत कशी मिळेल, यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत, असे मुंडे म्हणाल्या.रेल्वेमार्गाच्या कामाने गती घेतली आहे. २०१९ पर्यंत काम कसे पूर्ण होईल, यासाठी प्रयत्न चालू आहे, असेही त्यांनी यावेळी बोलताना सांगितले.

टॅग्स :BeedबीडPritam Mundeप्रीतम मुंडेReligious programmeधार्मिक कार्यक्रम