शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

दसरा मेळावा म्हणजे भक्ती आणि उर्जेचा मिलाप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2018 00:18 IST

सावरगावचा दसरा मेळावा हा राजकीय नसून देशभरातील उसतोड कामगार, शेतमजुरांना उर्जा देणारा आहे. या मेळाव्यातून भक्ती आणि उर्जेचा सुंदर मिलाप पहावयास मिळतो. मेळाव्यातून उसतोड कामगारांना स्फूर्ती, उर्जा, नवा विचार मिळतो, असे खा.डॉ.प्रीतम मुंडे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

ठळक मुद्देप्रीतम मुंडे यांचे प्रतिपादन : सावरगाव येथे होणाऱ्या मेळावा मैदानासह इतर व्यवस्थेचा घेतला आढावा

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : सावरगावचा दसरा मेळावा हा राजकीय नसून देशभरातील उसतोड कामगार, शेतमजुरांना उर्जा देणारा आहे. या मेळाव्यातून भक्ती आणि उर्जेचा सुंदर मिलाप पहावयास मिळतो. मेळाव्यातून उसतोड कामगारांना स्फूर्ती, उर्जा, नवा विचार मिळतो, असे खा.डॉ.प्रीतम मुंडे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या उपस्थितीत होणारा भगवान गडावरील दसरा मेळावा त्याच्या निधनानंतर गत वर्षापासून संत भगवानबाबांची जन्मभूमी सावरगांव घाट ता. पाटोदा येथे होत आहे. सावरगाव येथे कामाचा आढावा घेताना त्या बोलत होत्या. या मेळाव्याचे हे दुसरे वर्ष असून भगवानबाबांच्या भव्य २५ फूट उंचीची मूर्ती व स्मारकाचे लोकार्पण या मेळाव्यात होणार असल्याचे डॉ. प्रीतम मुंडे यांनी सांगितले. जवळपास अडीच एकर परिसरात हे भव्य स्मारक उभारण्यात येत आहे. ६४ बाय ६४ फूट गोलाकार आकाराचे बांधकाम केले आहे. यात जवळपास सव्वादोन लाख लिटर पाणी साठविले आहे. पाण्यावर बसून भगवानबाबांनी ज्ञानेश्वरी वाचली. त्याप्रमाणे दसºयाला या मूर्तीची स्थापना करण्यात येणार आहे. या स्मारकामुळे सावरगावचे रुपच बदलत आहे. वाहतुकीस अडथळा होऊ नये म्हणून मंदीर परिसरातील रस्त्यांचे रुंदीकरण करण्यात येत आहे.पत्रकारांशी बोलताना खा.प्रीतम मुंडे म्हणाल्या की, दसरा मेळावा म्हणजे उसतोड कामगार आणि समाजासाठी एक आकर्षण असे. या मेळाव्या मुंडेसाहेब काय बोलणार, याबद्दल सर्वांनाच उत्सुकता असे. समाज आणि कामगारांच्या विविध प्रश्नांवर या मेळाव्यात विचार मंथन होत असे. साहेबांनंतर पंकजाताईनी हे कार्य हाती घेतले आहे. त्यांच्या भाषणातून उर्जा घेऊन भाविक, ऊसतोड कामगार, शेतमजूर आपापल्या गावी परतत असे.त्यामुळे भक्ती आणि उर्जेचा मेळावा आहे, असे त्या म्हणाल्या.पावसाअभावी भयानक असा दुष्काळ पडला आहे. सर्वच पिके हातून गेली आहेत. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होत आहे. जिल्ह्यातील सरसकट शेतकºयांना शासनाकडून मदत कशी मिळेल, यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत, असे मुंडे म्हणाल्या.रेल्वेमार्गाच्या कामाने गती घेतली आहे. २०१९ पर्यंत काम कसे पूर्ण होईल, यासाठी प्रयत्न चालू आहे, असेही त्यांनी यावेळी बोलताना सांगितले.

टॅग्स :BeedबीडPritam Mundeप्रीतम मुंडेReligious programmeधार्मिक कार्यक्रम