शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

दसरा मेळावा म्हणजे भक्ती आणि उर्जेचा मिलाप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2018 00:18 IST

सावरगावचा दसरा मेळावा हा राजकीय नसून देशभरातील उसतोड कामगार, शेतमजुरांना उर्जा देणारा आहे. या मेळाव्यातून भक्ती आणि उर्जेचा सुंदर मिलाप पहावयास मिळतो. मेळाव्यातून उसतोड कामगारांना स्फूर्ती, उर्जा, नवा विचार मिळतो, असे खा.डॉ.प्रीतम मुंडे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

ठळक मुद्देप्रीतम मुंडे यांचे प्रतिपादन : सावरगाव येथे होणाऱ्या मेळावा मैदानासह इतर व्यवस्थेचा घेतला आढावा

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : सावरगावचा दसरा मेळावा हा राजकीय नसून देशभरातील उसतोड कामगार, शेतमजुरांना उर्जा देणारा आहे. या मेळाव्यातून भक्ती आणि उर्जेचा सुंदर मिलाप पहावयास मिळतो. मेळाव्यातून उसतोड कामगारांना स्फूर्ती, उर्जा, नवा विचार मिळतो, असे खा.डॉ.प्रीतम मुंडे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या उपस्थितीत होणारा भगवान गडावरील दसरा मेळावा त्याच्या निधनानंतर गत वर्षापासून संत भगवानबाबांची जन्मभूमी सावरगांव घाट ता. पाटोदा येथे होत आहे. सावरगाव येथे कामाचा आढावा घेताना त्या बोलत होत्या. या मेळाव्याचे हे दुसरे वर्ष असून भगवानबाबांच्या भव्य २५ फूट उंचीची मूर्ती व स्मारकाचे लोकार्पण या मेळाव्यात होणार असल्याचे डॉ. प्रीतम मुंडे यांनी सांगितले. जवळपास अडीच एकर परिसरात हे भव्य स्मारक उभारण्यात येत आहे. ६४ बाय ६४ फूट गोलाकार आकाराचे बांधकाम केले आहे. यात जवळपास सव्वादोन लाख लिटर पाणी साठविले आहे. पाण्यावर बसून भगवानबाबांनी ज्ञानेश्वरी वाचली. त्याप्रमाणे दसºयाला या मूर्तीची स्थापना करण्यात येणार आहे. या स्मारकामुळे सावरगावचे रुपच बदलत आहे. वाहतुकीस अडथळा होऊ नये म्हणून मंदीर परिसरातील रस्त्यांचे रुंदीकरण करण्यात येत आहे.पत्रकारांशी बोलताना खा.प्रीतम मुंडे म्हणाल्या की, दसरा मेळावा म्हणजे उसतोड कामगार आणि समाजासाठी एक आकर्षण असे. या मेळाव्या मुंडेसाहेब काय बोलणार, याबद्दल सर्वांनाच उत्सुकता असे. समाज आणि कामगारांच्या विविध प्रश्नांवर या मेळाव्यात विचार मंथन होत असे. साहेबांनंतर पंकजाताईनी हे कार्य हाती घेतले आहे. त्यांच्या भाषणातून उर्जा घेऊन भाविक, ऊसतोड कामगार, शेतमजूर आपापल्या गावी परतत असे.त्यामुळे भक्ती आणि उर्जेचा मेळावा आहे, असे त्या म्हणाल्या.पावसाअभावी भयानक असा दुष्काळ पडला आहे. सर्वच पिके हातून गेली आहेत. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होत आहे. जिल्ह्यातील सरसकट शेतकºयांना शासनाकडून मदत कशी मिळेल, यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत, असे मुंडे म्हणाल्या.रेल्वेमार्गाच्या कामाने गती घेतली आहे. २०१९ पर्यंत काम कसे पूर्ण होईल, यासाठी प्रयत्न चालू आहे, असेही त्यांनी यावेळी बोलताना सांगितले.

टॅग्स :BeedबीडPritam Mundeप्रीतम मुंडेReligious programmeधार्मिक कार्यक्रम