शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
2
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
3
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
4
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
5
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
6
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
7
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
8
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
9
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
10
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
11
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
12
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
13
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
14
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
15
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
16
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
17
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
18
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
19
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
20
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...

मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनंतरही दुष्काळी उपाययोजना शून्यच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2018 00:21 IST

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मागील महिन्यात जिल्हा दौऱ्यावर आले होते. यावेळी घेण्यात आलेल्या आढावा बैठकीमध्ये दुष्काळ निवारणासाठी विविध सूचना जिल्हा प्रशासनाला दिल्या होत्या. मात्र एक महिना उलटून देखील योजना राबवण्याचे प्रमाण अत्यल्प आहे.

प्रभात बुडूख ।लोकमत न्यूज नेटवर्कबीड : जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती आढावा घेण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मागील महिन्यात जिल्हा दौऱ्यावर आले होते. यावेळी घेण्यात आलेल्या आढावा बैठकीमध्ये दुष्काळ निवारणासाठी विविध सूचना जिल्हा प्रशासनाला दिल्या होत्या. मात्र एक महिना उलटून देखील योजना राबवण्याचे प्रमाण अत्यल्प आहे.राज्य शासनाच्या वतीने जिल्ह्यात तीव्र दुष्काळ जाहीर करण्यात आल्यानंतर, टंचाईवर मात करण्यासाठी विविध योजना जिल्ह्यात राबवण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांकडून देण्यात आले होते. त्यानंतर मागील महिन्यात १२ डिसेंबर रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्ह्यातील पाहणी व आढावा बैठक घेण्यासाठी आले होते. यावेळी राज्य पातळीवरील अधिकारी, विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे, पालकमंत्री पंकजा मुंडे, जिल्ह्यातील सर्व विभागांचे प्रमुख अधिकारी यांची उपस्थिती होती. जिल्ह्यातील दुष्काळ निवारणासाठी कोणत्या योजना राबवाव्यात जेणेकरुन टंचाई स्थितीमध्ये नागरिकांना दिलासा मिळेल. याविषयी मुख्यमंत्र्यांनी सूचना केल्या होत्या, मात्र प्रशासनाच्या वतीने योजना राबवण्यामध्ये दिरंगाई होत असल्याचे चित्र आहे. तसेच जिल्ह्यातील टंचाईच्या संदर्भातील ख-या परिस्थितीचा अहवाल योग्यरीत्या राज्य शासनाकडे पाठवला जात नसल्याचे आरोप देखील नागरिकांमधून होत आहेत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या सूचनांना जिल्हा प्रशासनाने केराची टोपली तर दाखवली नाही ना अशी चर्चा सुरु झाली आहे. यासंदर्भात प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी संपर्क साधला असता प्रमुख अधिका-यांशी संपर्क होऊ शकला नाही.टँकरचे प्रस्ताव प्रलंबितजिल्ह्यात दुष्काळी परिस्थितीमुळे तीव्र पाणी टंचाई आहे, त्यामुळे नागिरकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. त्यामुळे टँकर सुरु करण्याची मागणी नागरिकांमधून होऊ लागली आहे. ग्रामपंचायतच्या वतीने पंचायत समितीकडे प्रस्ताव पाठवले आहेत. प्रस्ताव देऊन महिना उलटला आहे तरी देखील प्रशासनाच्या वतीने कुठलीही कार्यवाही न झाल्यामुळे प्रस्ताव प्रलंबित राहिले आहेत.

टॅग्स :droughtदुष्काळDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसwater shortageपाणीटंचाई