शहरं
Join us  
Trending Stories
1
बँकिंग क्षेत्राला हादरवणारी बातमी! ३८ भारतीय बँकांचा डेटा लीक; पगार ट्रान्सफर, लोनचे हफ्ते सगळेच...
2
जीएसटी कपातीचा उलटा फेरा! वह्या, पुस्तके महागणार; शिक्षणासोबत काय खेळ केला पहा...
3
बिहारमध्ये महिला मंडळ खूश...! 'लाडकी बहीण नाही', सुरू करण्यात आली ही खास योजना; खात्यात धडा-धड जमा झाले 10-10 हजार; PM मोदी म्हणाले...
4
कार, आयफोन आणि विदेशवारीचे आमिष देऊन करत होता विद्यार्थिनींची निवड! चैतन्यानंदवर आणखी गंभीर आरोप
5
"दुर्गा मातेला प्रार्थना करतो की, निवडणुकीनंतर असे सरकार बनावे जे..."; बंगालमध्ये नेमकं काय म्हणले अमित शाह?
6
Amazon.in च्या 'ग्रेट सेव्हिंग्ज सेलिब्रेशन' स्टोअरफ्रंटसह GST बचतीचा धमाका
7
तू परत आलास..?? IND vs PAK Final वरून पाकिस्तानची खिल्ली उडवणाऱ्या भन्नाट मीम्सचा पाऊस
8
Vodafone-Idea च्या शेअरमध्ये मोठी घसरण, AGR प्रकरणाची पुढील सुनावणी ६ ऑक्टोबरला
9
“STकडे १३ हजार एकर लँड बँक, NAREDCOने विकासात योगदान द्यावे”; प्रताप सरनाईक यांचे आवाहन
10
पोस्ट ऑफिसची गॅरंटी! फक्त ₹५० लाखांचा विमाच नाही, 'या' स्कीममध्ये मिळतात टॅक्स आणि कर्जाचे फायदे
11
“PM केअर फंडातून राज्याचा शेतकरी कर्जमुक्त करा”: राऊत, ठाकरे गट बळीराजासाठी रस्त्यावर उतरणार
12
'लडाख हिंसाचार' प्रकरणी आता मोदी सरकार 'अ‍ॅक्शन मोड'वर! दिल्लीहून एक दूत पाठवला; उपराज्यपालांनी बैठक बोलावली
13
झोमॅटोद्वारे हॉटेल मालकाने २१,००० रुपयांच्या १०७ ऑर्डर बनवून दिल्या, हातात किती शिल्लक राहिले... तुम्हीच पहा...
14
'सर्व दोष माझ्यावर टाकण्यात आले, तर...'; सोनम वांगचुक यांनी परदेशी निधीवर स्पष्टच सांगितले
15
Navratri 2025: देवीचे वाहन सिंह आणि लक्ष्मीचे घुबड का? त्यामागे आहे महत्त्वपूर्ण कारण!
16
सोने-चांदीच्या दरात आज मोठी उलथापालथ; Gold झालं स्वस्त, पण चांदी अवाक्याच्या बाहेर
17
"पाकिस्तानचा संघ एवढा भारी आहे की..."; IND vs PAK FINAL आधी कर्णधार सलमानने भारताला डिवचले
18
VIRAL :'सोनार बनवणार नाही, चोर चोरणार नाही'! ट्रेनमध्ये विक्रेत्याचा शायराना अंदाज; तरुणाची स्टाईल पाहून पब्लिक झाली फॅन!
19
३० वर्षांनी केंद्र त्रिकोण राजयोग: ८ राशींना वक्री शनि करेल मालामाल, बक्कळ पैसा; चौपट लाभ!
20
४ लाख कोटी स्वाहा! TATA च्या 'या' शेअरनं गुंतवणूकदारांना दिला मोठा झटका, आणखी खाली जाऊ शकते किंमत?

मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनंतरही दुष्काळी उपाययोजना शून्यच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2018 00:21 IST

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मागील महिन्यात जिल्हा दौऱ्यावर आले होते. यावेळी घेण्यात आलेल्या आढावा बैठकीमध्ये दुष्काळ निवारणासाठी विविध सूचना जिल्हा प्रशासनाला दिल्या होत्या. मात्र एक महिना उलटून देखील योजना राबवण्याचे प्रमाण अत्यल्प आहे.

प्रभात बुडूख ।लोकमत न्यूज नेटवर्कबीड : जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती आढावा घेण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मागील महिन्यात जिल्हा दौऱ्यावर आले होते. यावेळी घेण्यात आलेल्या आढावा बैठकीमध्ये दुष्काळ निवारणासाठी विविध सूचना जिल्हा प्रशासनाला दिल्या होत्या. मात्र एक महिना उलटून देखील योजना राबवण्याचे प्रमाण अत्यल्प आहे.राज्य शासनाच्या वतीने जिल्ह्यात तीव्र दुष्काळ जाहीर करण्यात आल्यानंतर, टंचाईवर मात करण्यासाठी विविध योजना जिल्ह्यात राबवण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांकडून देण्यात आले होते. त्यानंतर मागील महिन्यात १२ डिसेंबर रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्ह्यातील पाहणी व आढावा बैठक घेण्यासाठी आले होते. यावेळी राज्य पातळीवरील अधिकारी, विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे, पालकमंत्री पंकजा मुंडे, जिल्ह्यातील सर्व विभागांचे प्रमुख अधिकारी यांची उपस्थिती होती. जिल्ह्यातील दुष्काळ निवारणासाठी कोणत्या योजना राबवाव्यात जेणेकरुन टंचाई स्थितीमध्ये नागरिकांना दिलासा मिळेल. याविषयी मुख्यमंत्र्यांनी सूचना केल्या होत्या, मात्र प्रशासनाच्या वतीने योजना राबवण्यामध्ये दिरंगाई होत असल्याचे चित्र आहे. तसेच जिल्ह्यातील टंचाईच्या संदर्भातील ख-या परिस्थितीचा अहवाल योग्यरीत्या राज्य शासनाकडे पाठवला जात नसल्याचे आरोप देखील नागरिकांमधून होत आहेत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या सूचनांना जिल्हा प्रशासनाने केराची टोपली तर दाखवली नाही ना अशी चर्चा सुरु झाली आहे. यासंदर्भात प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी संपर्क साधला असता प्रमुख अधिका-यांशी संपर्क होऊ शकला नाही.टँकरचे प्रस्ताव प्रलंबितजिल्ह्यात दुष्काळी परिस्थितीमुळे तीव्र पाणी टंचाई आहे, त्यामुळे नागिरकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. त्यामुळे टँकर सुरु करण्याची मागणी नागरिकांमधून होऊ लागली आहे. ग्रामपंचायतच्या वतीने पंचायत समितीकडे प्रस्ताव पाठवले आहेत. प्रस्ताव देऊन महिना उलटला आहे तरी देखील प्रशासनाच्या वतीने कुठलीही कार्यवाही न झाल्यामुळे प्रस्ताव प्रलंबित राहिले आहेत.

टॅग्स :droughtदुष्काळDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसwater shortageपाणीटंचाई