शहरं
Join us  
Trending Stories
1
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
2
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
3
पेट्रोल-डिझेलचे दर कमी होणार का? कच्च्या तेलाच्या दरात मोठी घसरण
4
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
5
'त्याला लवकरात लवकर श्रीलंकेला पाठवा' पंजाबविरुद्धच्या पराभवानंतर मथिशा पाथिराना होतोय ट्रोल
6
पहलगाम हल्ल्याच्या लिंक शोधतेय ATS! तपासला सुरुवा होताच रुग्णालयात पोहोचली सीमा हैदर; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
7
UPI युजर्ससाठी दिलासादायक बातमी, आता प्रत्येक ट्रान्झॅक्शन १५ सेकंदात होणार; स्टेटसही लवकर कळणार
8
अमृता खानविलकरची Waves summit मध्ये हजेरी, 'थलायवा'सोबत फोटो शेअर करत म्हणाली...
9
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
10
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
11
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस
12
"समस्या दाढीची नाही, तर..."; पतीला सोडून दीरासोबत पळाली होती वहिनी, कहानीत नवा ट्विस्ट
13
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
14
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
15
भरत जाधव यांनी शेतात बांधलंय राधाकृष्णाचं मंदिर, म्हणाले- "मुंबईत येताना वडिलांनी कृष्णाचा फोटो आणला आणि... "
16
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
17
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
18
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
19
अजिबात 'या' वेळी करू नका ब्रश, नाहीतर लवकर किडतील दात; ९०% लोक करतात 'ही' चूक
20
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी

मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनंतरही दुष्काळी उपाययोजना शून्यच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2018 00:21 IST

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मागील महिन्यात जिल्हा दौऱ्यावर आले होते. यावेळी घेण्यात आलेल्या आढावा बैठकीमध्ये दुष्काळ निवारणासाठी विविध सूचना जिल्हा प्रशासनाला दिल्या होत्या. मात्र एक महिना उलटून देखील योजना राबवण्याचे प्रमाण अत्यल्प आहे.

प्रभात बुडूख ।लोकमत न्यूज नेटवर्कबीड : जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती आढावा घेण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मागील महिन्यात जिल्हा दौऱ्यावर आले होते. यावेळी घेण्यात आलेल्या आढावा बैठकीमध्ये दुष्काळ निवारणासाठी विविध सूचना जिल्हा प्रशासनाला दिल्या होत्या. मात्र एक महिना उलटून देखील योजना राबवण्याचे प्रमाण अत्यल्प आहे.राज्य शासनाच्या वतीने जिल्ह्यात तीव्र दुष्काळ जाहीर करण्यात आल्यानंतर, टंचाईवर मात करण्यासाठी विविध योजना जिल्ह्यात राबवण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांकडून देण्यात आले होते. त्यानंतर मागील महिन्यात १२ डिसेंबर रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्ह्यातील पाहणी व आढावा बैठक घेण्यासाठी आले होते. यावेळी राज्य पातळीवरील अधिकारी, विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे, पालकमंत्री पंकजा मुंडे, जिल्ह्यातील सर्व विभागांचे प्रमुख अधिकारी यांची उपस्थिती होती. जिल्ह्यातील दुष्काळ निवारणासाठी कोणत्या योजना राबवाव्यात जेणेकरुन टंचाई स्थितीमध्ये नागरिकांना दिलासा मिळेल. याविषयी मुख्यमंत्र्यांनी सूचना केल्या होत्या, मात्र प्रशासनाच्या वतीने योजना राबवण्यामध्ये दिरंगाई होत असल्याचे चित्र आहे. तसेच जिल्ह्यातील टंचाईच्या संदर्भातील ख-या परिस्थितीचा अहवाल योग्यरीत्या राज्य शासनाकडे पाठवला जात नसल्याचे आरोप देखील नागरिकांमधून होत आहेत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या सूचनांना जिल्हा प्रशासनाने केराची टोपली तर दाखवली नाही ना अशी चर्चा सुरु झाली आहे. यासंदर्भात प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी संपर्क साधला असता प्रमुख अधिका-यांशी संपर्क होऊ शकला नाही.टँकरचे प्रस्ताव प्रलंबितजिल्ह्यात दुष्काळी परिस्थितीमुळे तीव्र पाणी टंचाई आहे, त्यामुळे नागिरकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. त्यामुळे टँकर सुरु करण्याची मागणी नागरिकांमधून होऊ लागली आहे. ग्रामपंचायतच्या वतीने पंचायत समितीकडे प्रस्ताव पाठवले आहेत. प्रस्ताव देऊन महिना उलटला आहे तरी देखील प्रशासनाच्या वतीने कुठलीही कार्यवाही न झाल्यामुळे प्रस्ताव प्रलंबित राहिले आहेत.

टॅग्स :droughtदुष्काळDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसwater shortageपाणीटंचाई