शहरं
Join us  
Trending Stories
1
माझं काम न करणाऱ्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची यादी मी अजितदादांकडे दिली, पण...; श्रीरंग बारणेंचा आरोप
2
Sunita Kejriwal : "अच्छे दिन येणार, मोदीजी जाणार; माझे पती जेलमध्ये जाऊ नयेत असं तुम्हाला वाटत असेल तर..."
3
धक्कादायक! मोबाईलनं घेतला २२ वर्षीय युवतीचा जीव; डॉक्टरांनी रहस्य उलगडलं, पोलीस हैराण
4
“कुणालाही पाठीशी घालू नका”; पुणे पोर्शे अपघात प्रकरणी CM एकनाथ शिंदेंचे पोलिसांना निर्देश
5
HSC Result 2024 Maharashtra Board: बारावीत ९३.३७ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण, 'कोकण'च्या विद्यार्थ्यांनी बाजी मारली
6
लोन घेतलं नाही, पण IDFC Bankनं EMI कापला, आता कोर्टानं ठोठावला मोठा दंड; काय आहे प्रकरण?
7
Vaishakh Purnima 2024: वैशाख पौर्णिमेला राशीनुसार करा दान; मिळेल सौख्य, शांति, समाधान!
8
आकडा कमी होणार, तरीही भाजपला ३०० जागा मिळणार! प्रशांत किशोर यांचा दावा
9
Arvind Kejriwal : "देशातील लोक पाकिस्तानी आहेत का?"; अरविंद केजरीवालांचा अमित शाहांवर पलटवार
10
कली म्हणतात तो हाच; जो आता घराघरात शिरलाय, नव्हे तर मनामनात शिरलाय!
11
क्रीम अँड ब्लॅक गाऊन, डायमंड नेकलेस, शॉर्ट हेअरकट; 'देसी गर्ल'चा प्रेमात पाडणारा परदेशी लूक!
12
टीम इंडियाचा नवा कोच धोनी ठरवणार? BCCI कडून हालचालींना वेग, द्रविडची खुर्ची कोणाला?
13
वडिलांकडे फी भरण्यासाठी नव्हते पैसे, गरिबीत गेलं बालपण; आज आहे 485 कोटींची मालकीण
14
आएगा तो मोदी...! भाजपाला किती जागा मिळणार?; प्रशांत किशोर यांची भविष्यवाणी
15
ही दोस्ती तुटायची नाय...! एकत्र केली UPSC तयारी; दोघं IAS तर एक मित्र IPS बनला
16
Veritaas Advertising IPO: लिस्ट होताच शेअरवर गुंतवणूकदारांच्या उड्या, ₹१४४ चा शेअर पोहोचला ₹२८८ वर; गुंतवणूकदार मालामाल
17
...म्हणूनही मला संघात घेतलं नव्हतं; Gautam Gambhir चा खळबळजनक खुलासा
18
सावधान! RTO ने नियम बदलले, १ जूनपासून लागू होणार नवे रुल्स;...तर भरावा लागेल २५ हजारांचा दंड
19
काँग्रेस, आप दुफळीत भाजपचा मोठा फायदा; ना नेत्यांची, ना कार्यकर्त्यांची मने जुळली
20
'आता मी कोणाचाच प्रचार करणार नाही कारण...' अलका कुबल यांनी मांडलं स्पष्ट मत

पांढऱ्या सोन्याला यंदा दुष्काळाचा गंज !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2018 12:20 AM

तालुक्यात यावर्षी पावसाने हुलकावणी दिल्याने तालुक्यातील खरीपातील पिके धोक्यात आली आहेत. तालुक्यातील सर्व लघुप्रकल्प कोरडेठाक पडले असल्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे.

ठळक मुद्देगेवराई तालुक्यातील परिस्थिती : २५ गावांत पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न; कापसाच्या उत्पादनात घट

लोकमत न्यूज नेटवर्कगेवराई : तालुक्यात यावर्षी पावसाने हुलकावणी दिल्याने तालुक्यातील खरीपातील पिके धोक्यात आली आहेत. तालुक्यातील सर्व लघुप्रकल्प कोरडेठाक पडले असल्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. सध्याच्या परिस्थितीत तालुक्यातील २५ गावात पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. गेल्या चार वर्षानंतर अशी परिस्थिती निर्माण झाली असल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडलेल्या अवस्थेत आहे.गेवराई तालुक्यात एकूण भौगोलिक क्षेत्र १ लाख ६ हजार हेक्टर क्षेत्र आहे. यातील पेरणीलायक १ लाख ३४ हजार हेक्टरपर्यंत क्षेत्र आहे. यावर्षी सुरुवातीला पावसाने काही प्रमाणात पावसाने हजेरी लावल्याने तालुक्यातील गेवराई, रेवकी, तलवाडा, जातेगाव, सिरसदेवी, पाचेगाव, मादळमोही, चकलांबा, उमापूर, धोंडराई या दहा महसुली मंडळाच्या ठिकाणी कापूस ७४ हजार हेक्टर, बाजरी, तूर, सोयाबीन, मूग, भूईमूग, मका सह आदी खरीपातील पेरण्या जवळपास ९८ हजार हेक्टर क्षेत्रात करण्यात आल्या होत्या. सुरुवातीलाच पाऊस कमी प्रमाणात पडल्याने तालुक्यातील सर्व पिके ही सलाईनवर होती. कोणत्याही पिकाची वाढ झालेली नाही. त्यामुळे शेतकºयांची आर्थिक पिकेच वाया गेली असून, अत्यल्प प्रमाणात उत्पन्न मिळणार आहे. दरम्यान, शेतकºयांनी उधार उसनवारी करून केलेला खर्च निघणे सुद्धा कठीण झाले आहे.गेवराई तालुका कापसाच्या उत्पादनासाठी मराठवाड्यात एक क्रमांकाचा तालुका मानला जातो. तालुक्यातील विविध भागात जवळपास २५ जिनिंग उभ्या करण्यात आलेल्या आहेत. मात्र, मागील वर्षी कापसाच्या उत्पादनात ५० टक्के जवळपास घट झाली होती. यावेळी जवळपास ८० टक्के कापसाचे उत्पादन कमी होणार असल्याचे शेतकºयांनी सांगितले.गेवराई तालुक्यातील विविध भागात दमदार पाऊसच झाला नसल्यामुळे तालुक्यातील गोविंदवाडी, मादळमोही, जव्हारवाडी, शिंदेवाडी, खडकी, चकलांबा, बंगाली पिंपळा येथील लघुप्रकल्पातील पाणीसाठा शून्य झाला आहे. परतीच्या पावसाने जर मेहरबानी केली तर हे लघुप्रकल्प भरू शकतील.गेवराई तालुक्यातील दहा महसुली मंडळाच्या ठिकाणी अत्यल्प प्रमाणात पाऊस पडला असल्यामुळे तालुक्यात नदी, नाले, भरले नाहीत. त्यामुळे सध्या विहिरी आणि बोअरने तळ गाठला असल्याने तालुक्यातील जवळपास पंचवीसपेक्षा जास्त गावात पिण्याच्या पाण्याची गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. पावसाळ्यातच उन्हाळ्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे.पावसाळ्यातच उन्हाळा : पिके करपू लागलीगेवराई तालुक्यातील हलक्या व भारी जमिनीतील कापसाच्या पिकानी माना टाकल्या असून पावसाची नितांत आवश्यकता आहे. गोदावरीच्या व उजव्या कालव्याच्या धोंडराई, तळणेवाडी, राक्षसभुवन, सुरळेगाव, सावळेश्वर, माळस पिंपळगाव, कोल्हेर, लुखामसला, भोजगाव व इतर ठिकाणी उसाचे जवळपास २० हजार हेक्टर क्षेत्र आहे. मात्र, अनेक दिवसांपासून पाउसच नसल्यामुळे ऊस करपायाला लागले आहेत.तालुक्यातील शेतकºयांनी परतीचा पाऊस पडल्यावर ज्वारीचे पिके घ्यावीत. कारण यामुळे ज्वारी तर मिळेल; पण जनावरांना चारा देखील उपलब्ध होईल. तसेच तालुका कृषी कार्यालयाच्या वतीने तालुक्यात शेतकºयांच्या क्षेत्रीय भेटी सुरु असल्याचे कृषी मंडळ अधिकारी संतोष घसिंग म्हणालेतालुक्यात एकूण पर्जन्यमान ६७५ पैकी फक्त २७५ मि. मी. झाल्याची नोंद आहे. तालुक्यात भर पावसाळ्यात उन्हाळाच असल्याची परिस्थिती आहे.

टॅग्स :BeedबीडRainपाऊसcottonकापूसAgriculture Sectorशेती क्षेत्र