शहरं
Join us  
Trending Stories
1
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
2
हैदराबाद गॅझेटवर हायकोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्यांना सुनावले, आता मराठा आरक्षणाचे काय?
3
Kangana Ranaut : "माझ्याच हॉटेलचा काल ५० रुपयांचा धंदा", पूरग्रस्तांसमोर कंगना राणौतने मांडली स्वत:चाची व्यथा
4
Javelin Throw Final : भारताचा गोल्डन बॉय नीरज अन् पाक ऑलिम्पिक चॅम्पियन नदीमवर भारी पडला सचिन; पण...
5
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
6
'खोटारडं' पाकिस्तान पुन्हा उघडं पडलं... मॅच रेफरीच्या केबिनमध्ये काय घडलं? सत्य समोर आलं...
7
घटस्फोटाचे प्रमाण कमी करण्यासाठी राज्यात दहा ठिकाणी सुरु होणार प्री-मॅरेज काउन्सिलिंग सेंटर
8
भगवान विष्णू यांच्यावरील वक्तव्यासंदर्भात CJI बीआर गवई यांचं स्पष्टिकरण; 'संयम राखायला हवा...', विश्वहिंदू परिषदेचा सल्ला
9
सात दिवस अविरत उपसले कष्ट, तेव्हा हाती लागली मौल्यवान रत्नं, मजूर महिलेचं नशीब उजळलं 
10
IND vs PAK हस्तांदोलन वादाचा खरा आरोपी सापडला... सामनाधिकारी पॉयक्रॉफ्टची चूकच नव्हती!
11
लग्न कधी करणार? श्रिया पिळगावकरला थेट प्रश्न; म्हणाली, "माझे आईबाबा सांगतात की..."
12
अंगणवाडी सेविकांना मिळणार स्मार्टफोन, वाढणार मानधन; योगी आदित्यनाथ यांची मोठी घोषणा
13
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
14
सुनेला वाचवण्यासाठी धावली सासू, पण तेवढ्यात धडाधड कोसळली भिंत, सून वाचली पण...  
15
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
16
सावधान! आयफोन १७च्या नावाखाली फसवणूक, सायबर गुन्हेगार 'असे' करतात खाते रिकामी
17
Sarva Pitru Amavasya 2025: सर्वपित्री अमावस्येला आहे सूर्यग्रहण; काळजीपूर्वक टाळा 'या' चुका!
18
बंगळुरुतील योग गुरुचा 8 महिलांवर अत्याचार; अल्पवयीन पीडितेने दाखवले धाडस, पोलिसांनी आवळल्या मुसक्या
19
३० पैशांवरुन २४ रुपयांवर आला 'हा' शेअर; १ लाखाचे केले ८ कोटी, गुंतवणूकदार मालामाल
20
GST कपातीनंतर Maruti ची मोठी घोषणा! S-Presso ₹ 3.50 लाखात तर Wagon R फक्त...

गाळमुक्त धरण-गाळयुक्त शिवार योजनेमुळे पाणीसाठा वाढणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2019 00:40 IST

तीव्र दुष्काळी परिस्थितीमुळे जिल्ह्यातील बहुतांश धरणे ही कोरडीठाक पडली आहेत, तर काही ठिकाणी मृत साठा उपलब्ध आहे. त्यामुळे शासनाच्या योजनेनुसार गाळमुक्त धरण  गाळ युक्त शिवार योजना राबवली जात आहे.

ठळक मुद्देसेवाभावी संस्थांचा सहभाग : ६६ ठिकाणी गाळ काढण्याचे काम सुरू

बीड : तीव्र दुष्काळी परिस्थितीमुळे जिल्ह्यातील बहुतांश धरणे ही कोरडीठाक पडली आहेत, तर काही ठिकाणी मृत साठा उपलब्ध आहे. त्यामुळे शासनाच्या योजनेनुसार गाळमुक्त धरण  गाळ युक्त शिवार योजना राबवली जात असून, ६६ कामे सुरु आ यामध्ये मानवलोक या सेवाभावी संस्थेचा देखील पुढाकार असून ३१ कामे त्यांच्यामार्फत सुरु आहेत. त्यामुळे येणाऱ्या पावसात धरणांमधील पाणीसाठा वाढण्यास मदत होणार आहे.धरण क्षेत्रातील पाणी आटल्यानंतर किंवा मृत साठ्यात प्रकल्प गेल्यानंतर, त्या ठिकाणचा गाळ काढून शेतात ठाकण्यासाठी गाळमुक्त धरण-गाळयुक्त शिवार योजना सुरु करण्यात आली होती. यामुळे धरणातील गाळ कमी होऊन साठवण क्षमता वाढणार आहे. तर हा गाळ शेतात टाकल्यामुळे पिकांसाठी फायद्याचा ठरुन शेतातील उत्पादन वाढवून शेतकऱ्यांना लाभ होणार होणार आहे. प्रशासनाच्या वतीने २३३ कामे प्रस्तावित होती. त्यामध्ये जवळपास ४३ लाख ७७ हजार ३४३ घनमीटर एवढा गाळ निघेल असा अंदाज व्यक्त केला जात होता. मात्र, प्रत्यक्षात फक्त ६६ कामे सुरु झाल्यामुळे यामधून १६ लाख ६५ हजार ८८७ घनमीटर एवढी गाळाची माती आतपर्यंत काढण्यात आली आहे. त्यापैकी मानवलोक, भारतीय जैन संघटना व इतर सामाजिक संस्थेच्या वतीने ७ लाख ६४ हजार ७८९ घ.मी. गाळ काढण्यात आला आहे.जलसंधारण, पाठबंधारे विभाग, जिल्हापरिषद व इतर विभागाअंतर्गत येणाºया छोट्या मोठ्या २३३ प्रकल्पामंधून गाळ काढण्याचे प्रस्तावित केले होते. त्यापैकी फक्त ३५ ठिकाणी या विभागांच्या माध्यमातून, तर इतर ३१ ठिकाणी लोकसहभागातून काम सुरु आहे. ज्या ठिकाणी लोकसहभाग व साजिक संस्था गाळ काढण्याचे काम करत आहे. त्याठिकाणी योग्यरित्या काम सुरु आहे. मात्र, प्रशासकीय अधिकाºयांच्या अर्थपूर्ण व्यवहारामुळे काही ठिकाणी गाळ हा शेतात न टाकता इतर व्यवसायिक कामासाठी वापरला जात असल्याची खात्रिशीर सूत्रांची माहिती आहे.पोषक मुलद्रव्य असलेली माती जाते वीटभट्टीसाठी४गाळाची माती ही शेतातील मातीपेक्षा अधिक उपजाऊ असते, ती माती शेततात टाकल्यानंतर पिकांना मोठ्या प्रमाणात पोषक द्रव्य मिळातात व पीक जोमात येते.४तसेच अशी पोषक माती तयार होण्यासाठी अनेक वर्ष जावे लागतात. परंतु ही पोषक माती शेतात न टाकता विटभट्टी चालकांकडून अवैधरित्या विटा तयार करण्यासाठी नेली जात आहे.४संबंधित अधिकाºयांच्या अर्थपूर्ण दुर्लक्षामुळे विटभट्टी चालककाडून तळे तसेच धरणांमधील मातीचा गैरवापर होत आहे. याची वरिष्ठांनी दखल घेऊन कारवाई करण्याची मागणी होत आहे.

टॅग्स :BeedबीडJalyukt Shivarजलयुक्त शिवारDamधरण