शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
4
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
5
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
6
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
7
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
8
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
9
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
10
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
11
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
12
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
13
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
14
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
15
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
16
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
17
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
18
नाशिक: मुलासोबत ट्रेकिंगला गेले अन् पांडव लेणीच्या डोंगरावर अडकले; नंतर...
19
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
20
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!

गाळमुक्त धरण-गाळयुक्त शिवार योजनेमुळे पाणीसाठा वाढणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2019 00:40 IST

तीव्र दुष्काळी परिस्थितीमुळे जिल्ह्यातील बहुतांश धरणे ही कोरडीठाक पडली आहेत, तर काही ठिकाणी मृत साठा उपलब्ध आहे. त्यामुळे शासनाच्या योजनेनुसार गाळमुक्त धरण  गाळ युक्त शिवार योजना राबवली जात आहे.

ठळक मुद्देसेवाभावी संस्थांचा सहभाग : ६६ ठिकाणी गाळ काढण्याचे काम सुरू

बीड : तीव्र दुष्काळी परिस्थितीमुळे जिल्ह्यातील बहुतांश धरणे ही कोरडीठाक पडली आहेत, तर काही ठिकाणी मृत साठा उपलब्ध आहे. त्यामुळे शासनाच्या योजनेनुसार गाळमुक्त धरण  गाळ युक्त शिवार योजना राबवली जात असून, ६६ कामे सुरु आ यामध्ये मानवलोक या सेवाभावी संस्थेचा देखील पुढाकार असून ३१ कामे त्यांच्यामार्फत सुरु आहेत. त्यामुळे येणाऱ्या पावसात धरणांमधील पाणीसाठा वाढण्यास मदत होणार आहे.धरण क्षेत्रातील पाणी आटल्यानंतर किंवा मृत साठ्यात प्रकल्प गेल्यानंतर, त्या ठिकाणचा गाळ काढून शेतात ठाकण्यासाठी गाळमुक्त धरण-गाळयुक्त शिवार योजना सुरु करण्यात आली होती. यामुळे धरणातील गाळ कमी होऊन साठवण क्षमता वाढणार आहे. तर हा गाळ शेतात टाकल्यामुळे पिकांसाठी फायद्याचा ठरुन शेतातील उत्पादन वाढवून शेतकऱ्यांना लाभ होणार होणार आहे. प्रशासनाच्या वतीने २३३ कामे प्रस्तावित होती. त्यामध्ये जवळपास ४३ लाख ७७ हजार ३४३ घनमीटर एवढा गाळ निघेल असा अंदाज व्यक्त केला जात होता. मात्र, प्रत्यक्षात फक्त ६६ कामे सुरु झाल्यामुळे यामधून १६ लाख ६५ हजार ८८७ घनमीटर एवढी गाळाची माती आतपर्यंत काढण्यात आली आहे. त्यापैकी मानवलोक, भारतीय जैन संघटना व इतर सामाजिक संस्थेच्या वतीने ७ लाख ६४ हजार ७८९ घ.मी. गाळ काढण्यात आला आहे.जलसंधारण, पाठबंधारे विभाग, जिल्हापरिषद व इतर विभागाअंतर्गत येणाºया छोट्या मोठ्या २३३ प्रकल्पामंधून गाळ काढण्याचे प्रस्तावित केले होते. त्यापैकी फक्त ३५ ठिकाणी या विभागांच्या माध्यमातून, तर इतर ३१ ठिकाणी लोकसहभागातून काम सुरु आहे. ज्या ठिकाणी लोकसहभाग व साजिक संस्था गाळ काढण्याचे काम करत आहे. त्याठिकाणी योग्यरित्या काम सुरु आहे. मात्र, प्रशासकीय अधिकाºयांच्या अर्थपूर्ण व्यवहारामुळे काही ठिकाणी गाळ हा शेतात न टाकता इतर व्यवसायिक कामासाठी वापरला जात असल्याची खात्रिशीर सूत्रांची माहिती आहे.पोषक मुलद्रव्य असलेली माती जाते वीटभट्टीसाठी४गाळाची माती ही शेतातील मातीपेक्षा अधिक उपजाऊ असते, ती माती शेततात टाकल्यानंतर पिकांना मोठ्या प्रमाणात पोषक द्रव्य मिळातात व पीक जोमात येते.४तसेच अशी पोषक माती तयार होण्यासाठी अनेक वर्ष जावे लागतात. परंतु ही पोषक माती शेतात न टाकता विटभट्टी चालकांकडून अवैधरित्या विटा तयार करण्यासाठी नेली जात आहे.४संबंधित अधिकाºयांच्या अर्थपूर्ण दुर्लक्षामुळे विटभट्टी चालककाडून तळे तसेच धरणांमधील मातीचा गैरवापर होत आहे. याची वरिष्ठांनी दखल घेऊन कारवाई करण्याची मागणी होत आहे.

टॅग्स :BeedबीडJalyukt Shivarजलयुक्त शिवारDamधरण