शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे कफनचोर, तुम्ही प्रतिसाद देणार का? देवेंद्र फडणवीसांचा मतदारांना सवाल
2
Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला
3
वापरा आणि फेकून द्या ही भाजपची वृत्ती; त्यांच्या रेल्वेच्या डब्याला भ्रष्टाचाराची चाके- उद्धव ठाकरे
4
धक्कादायक! पुण्यातील वारजे माळवाडीच्या रामनगरमध्ये हवेत गोळीबार; दुचाकीवर आले होते तीन जण
5
सचिन तेंडुलकरच्या शेजाऱ्यांचे एक ट्विट अन् मग झालं असं काही...; वाचा मुंबईतील घराबद्दलचा किस्सा
6
पत्नीने थंड भाजी दिल्याने पतीने घेतला टोकाचा निर्णय, बिट मार्शल्समुळे वाचला जीव
7
Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली
8
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
9
हृदयद्रावक! जळगावमध्ये भरधाव कारने दुचाकीला दिली धडक; आईसह दोन मुले ठार
10
'हमास'च्या समर्थनार्थ पोस्टला लाईक केल्याबद्दल सोमय्या स्कूल व्यवस्थापनाकडून प्राचार्यांचे निलंबन
11
"ज्या-ज्या ठिकाणी चोरलेला धनुष्यबाण आहे, तिथे 'मशाल' जिंकणार"; संजय राऊतांना विश्वास
12
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
13
IPL मध्ये असा गोष्टी घडत असतात...! दिल्लीकडून पराभवानंतर संजू सॅमसनचं विधान चर्चेत 
14
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
15
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
16
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
18
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
19
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
20
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!

कर्मचा-यांच्या मनमानीमुळे जय महेशचा उतारा घटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2018 12:17 AM

पवारवाडी येथील जय महेश साखर कारखान्याचे कर्मचारी ऊसतोड करण्यासाठी शेतक-यांकडे पैशाची मागणी करीत आहेत. पैसे देणा-या शेतक-यांचा आठ महिन्याचाही ऊस गाळपासाठी घेऊन जात असल्याने जय महेश कारखान्याची रिकव्हरी जवळपास एक टक्क्यापर्यंत घटली आहे. यामुळे कारखान्याचे नुकसान होत असून शेतकºयांची पिळवणूक करण्यात येत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कमाजलगाव : पवारवाडी येथील जय महेश साखर कारखान्याचे कर्मचारी ऊसतोड करण्यासाठी शेतक-यांकडे पैशाची मागणी करीत आहेत. पैसे देणा-या शेतक-यांचा आठ महिन्याचाही ऊस गाळपासाठी घेऊन जात असल्याने जय महेश कारखान्याची रिकव्हरी जवळपास एक टक्क्यापर्यंत घटली आहे. यामुळे कारखान्याचे नुकसान होत असून शेतकºयांची पिळवणूक करण्यात येत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत.

या वर्षीचा ऊस गाळप हंगाम शेवटच्या टप्प्यात असतानाही कारखानदार मात्र बाहेरच्या क्षेत्रातील ऊस आणत असल्याने तालुक्यातील शेतकºयांचा ऊस अद्यापही फडातच उभा आहे. जय महेश कारखान्याने आतापर्यंत बाहेरच्या क्षेत्रातील ऊस गाळपासाठी आणल्याने क्षेत्रातील ऊस उभा असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. उशीर होत असल्याने ऊस ऊत्पादक शेतकरी कारखानदाराच्या दारात चकरा मारत असून तोड देण्याची मागणी करीत आहेत.

शेतक-यांच्या या मजबुरीचा फायदा घेण्यासाठी जय महेश कारखान्याचे कर्मचारी पुढे सरसावले आहेत. या संधीचा फायदा घेत अडचणीत सापडलेल्या शेतक-यांकडे पैशाची मागणी करीत आहेत. जो शेतकरी कर्मचाºयांना पैसे देईल त्याचा जूनमध्ये लावलेला अडसाली उसाची तोड करण्यात येत आहे. ८ महिन्याचा ऊस गाळपासाठी येत असल्याने जय महेश कारखान्याची रिकव्हरी शेवटच्या टप्प्यात वाढण्याऐवजी घटायला सुरुवात झाली आहे.

आठ दिवसांपूर्वी कारखान्याची रिकव्हरी ११.३० एवढी होती. आर्थिक तडजोडीतून आठ महिन्याचा ऊस गाळपास आणत असल्याने साखर उतारा कमालीचा घटला आहे. सध्या उतारा १०.४० टक्क्यांपर्यंत आला आहे.

यामुळे शेतक-यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. जय महेश कारखान्याच्या कर्मचा-यांकडून होणारी पिळवणूक थांबविण्याची मागणी शेतक-यांतून होत आहे.

शेतक-याला भाव न मिळू देण्यासाठी डावशासनाच्या नियमाप्रमाणे शेतक-यांना एफ.आर.पी. प्रमाणे भाव देण्याचा नियम आहे. या नियमाप्रमाणे साडेनऊ टक्के पर्यंतच्या रिकव्हरी येणे बंधनकारक आहे. यापुढे जशी रिकव्हरी वाढेल तसा उसाचा भावही वाढवून द्यावा लागतो. रिकव्हरी वाढली तर जास्त पैसे द्यावे लागतील यामुळे कारखान्याच्या उपाध्यक्षाकडून जाणीवपूर्वक रिकव्हरी कमी आणत असल्याचे कारखान्याच्या कर्मचाºयाकडून नाव न छापण्याच्या अटीवर सांगण्यात आले.