शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

शाळेचा अनधिकृत नळ ग्रामपंचायतने तोडला; विद्यार्थ्यांचे पाण्यासाठी पंचायत समिती कार्यालयात आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2019 18:11 IST

अनधिकृत नळ जोडणी असल्याने ग्रामपंचायतने तोडले शाळेचे पाणी 

माजलगाव (बीड ) : तालुक्यातील मंजरथ येथील गोदावरी विद्यालयाच्या पिण्याच्या पाण्याची जोडणी ग्रामपंचायतने अनधिकृत ठरवून तोडले आहे. विद्यार्थ्याना शाळेत पाणी पिळत नाही. यामुळे त्यांनी थेट पंचायत समितीसमोर पाण्यासाठी आर्त टाहो फोडला. शाळा प्रशासन आणि ग्रामपंचायत पदाधिकारी यांच्यात असलेल्या सुंदोपसुंदीत विद्यार्थ्यांची पाण्यासाठी होत असलेली हेळसांड आज (दि. १७ ) दुपारी चर्चेची ठरली.  

एक महिन्यांपूर्वी येथील गोदावरी विद्यालयाची नळ जोडणी अनधिकृत ठरवून ग्रामपंचायतीने तोडले. त्यामुळे शाळेतील विध्यार्थ्यांची पाण्याअभावी चांगलीच हेळसांड सुरू आहे. मागील एक महिन्यापासून चाललेल्या या प्रकाराला अखेर बुधवारी तोंड फुटले. विद्यार्थी आणि पालकांनी थेट पंचायत समिती कार्यालय गाठत पिण्याच्या पाण्याच्या मागणी केली. यामुळे पंचायत समिती आवारात एकाच धांदल उडाली. सुमारे चार तास हा गोंधळ सुरू होता. 

या वेळी गटविकास अधिकारी बी.टी. चव्हाण , पोलीस निरीक्षक सय्यद सुलेमान, उपसभापती डॉ. वसीम मनसबदार  यांनी मानवीय दृष्टिकोनातून ग्रामपंचायत ने नळ सुरू करून देऊन कागदोपत्री पूर्तता करून घ्यावी अशी मध्यस्थी केली. मात्र, सरपंच श्रतुता आनंदगावकर यांनी अधिकृत मागणी झाल्याशिवाय नळ सुरू करण्यात येणार नाही अशी भूमिका घेतली. शेवटी गटविकास अधिकारी चव्हाण यांनी ग्रामसेवकास नळ कनेक्शन सुरू करून कागदपत्रांची रीतसर पूर्तता करून घेण्याचा आदेश दिला. 

अधिकृत मागणी फेटाळली नळ जोडणी तोडल्यामुळे मागील एक महिन्यापासून विद्यार्थ्यांची पाण्यासाठी हेळसांड होत आहे. नळ जोडणीचे रीतसर दिलेले पत्र ग्रामपंचायतने फेटाळले. - आर.डी. काकडे -- मुख्याध्यापक   

रीतसर जोडणी घ्यावीतीन महिन्यांपूर्वी शाळेला अनधिकृत नळ जोडणी अधिकृत करून घेण्याची नोटीस दिली होती. मात्र, शाळेने याची पूर्तता केली नसल्याने नळ जोडणी तोडली. शाळेने रीतसर अर्ज केल्यास नळ जोडणी देण्यात येईल. - ऋतुजा आनंदगावकर, सरपंच

ग्रामपंचायत कायम चर्चेत सरपंच ऋतुजा आनंदगावकर या बाहेर गावी एका मोठ्या कंपनीत नोकरीला आहेत. त्या गावात कमी राहत असल्याने वडील राजेंद्र आनंदगावकर हेच काम पाहतात. सरपंच नसल्याने प्रत्येक कामात त्यांच्या नातेवाईकांकडून होत असलेली मनमानी वादास कारणीभूत ठरत असल्याचे आरोप विरोधक करत आहेत. तर सरपंच या अभियंता व त्यांचे पालक उच्चशिक्षित आहेत. यामुळे कोणतेही काम नियमानुसारच होईल असा त्यांचा आग्रह असतो.  

विद्यार्थ्यांची पाण्यासाठी होत असलेली हेळसांड पाहता मानवीय दृष्टीकोनातुन संबंधित ग्रामसेवकास तात्काळ नळ जोडून देऊन आगामी काळात कागदपत्रांची पूर्तता करून घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. - बी. टी. चव्हाण, गटविकास अधिकारी  

टॅग्स :WaterपाणीBeedबीडgram panchayatग्राम पंचायतStudentविद्यार्थी