शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

शाळेचा अनधिकृत नळ ग्रामपंचायतने तोडला; विद्यार्थ्यांचे पाण्यासाठी पंचायत समिती कार्यालयात आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2019 18:11 IST

अनधिकृत नळ जोडणी असल्याने ग्रामपंचायतने तोडले शाळेचे पाणी 

माजलगाव (बीड ) : तालुक्यातील मंजरथ येथील गोदावरी विद्यालयाच्या पिण्याच्या पाण्याची जोडणी ग्रामपंचायतने अनधिकृत ठरवून तोडले आहे. विद्यार्थ्याना शाळेत पाणी पिळत नाही. यामुळे त्यांनी थेट पंचायत समितीसमोर पाण्यासाठी आर्त टाहो फोडला. शाळा प्रशासन आणि ग्रामपंचायत पदाधिकारी यांच्यात असलेल्या सुंदोपसुंदीत विद्यार्थ्यांची पाण्यासाठी होत असलेली हेळसांड आज (दि. १७ ) दुपारी चर्चेची ठरली.  

एक महिन्यांपूर्वी येथील गोदावरी विद्यालयाची नळ जोडणी अनधिकृत ठरवून ग्रामपंचायतीने तोडले. त्यामुळे शाळेतील विध्यार्थ्यांची पाण्याअभावी चांगलीच हेळसांड सुरू आहे. मागील एक महिन्यापासून चाललेल्या या प्रकाराला अखेर बुधवारी तोंड फुटले. विद्यार्थी आणि पालकांनी थेट पंचायत समिती कार्यालय गाठत पिण्याच्या पाण्याच्या मागणी केली. यामुळे पंचायत समिती आवारात एकाच धांदल उडाली. सुमारे चार तास हा गोंधळ सुरू होता. 

या वेळी गटविकास अधिकारी बी.टी. चव्हाण , पोलीस निरीक्षक सय्यद सुलेमान, उपसभापती डॉ. वसीम मनसबदार  यांनी मानवीय दृष्टिकोनातून ग्रामपंचायत ने नळ सुरू करून देऊन कागदोपत्री पूर्तता करून घ्यावी अशी मध्यस्थी केली. मात्र, सरपंच श्रतुता आनंदगावकर यांनी अधिकृत मागणी झाल्याशिवाय नळ सुरू करण्यात येणार नाही अशी भूमिका घेतली. शेवटी गटविकास अधिकारी चव्हाण यांनी ग्रामसेवकास नळ कनेक्शन सुरू करून कागदपत्रांची रीतसर पूर्तता करून घेण्याचा आदेश दिला. 

अधिकृत मागणी फेटाळली नळ जोडणी तोडल्यामुळे मागील एक महिन्यापासून विद्यार्थ्यांची पाण्यासाठी हेळसांड होत आहे. नळ जोडणीचे रीतसर दिलेले पत्र ग्रामपंचायतने फेटाळले. - आर.डी. काकडे -- मुख्याध्यापक   

रीतसर जोडणी घ्यावीतीन महिन्यांपूर्वी शाळेला अनधिकृत नळ जोडणी अधिकृत करून घेण्याची नोटीस दिली होती. मात्र, शाळेने याची पूर्तता केली नसल्याने नळ जोडणी तोडली. शाळेने रीतसर अर्ज केल्यास नळ जोडणी देण्यात येईल. - ऋतुजा आनंदगावकर, सरपंच

ग्रामपंचायत कायम चर्चेत सरपंच ऋतुजा आनंदगावकर या बाहेर गावी एका मोठ्या कंपनीत नोकरीला आहेत. त्या गावात कमी राहत असल्याने वडील राजेंद्र आनंदगावकर हेच काम पाहतात. सरपंच नसल्याने प्रत्येक कामात त्यांच्या नातेवाईकांकडून होत असलेली मनमानी वादास कारणीभूत ठरत असल्याचे आरोप विरोधक करत आहेत. तर सरपंच या अभियंता व त्यांचे पालक उच्चशिक्षित आहेत. यामुळे कोणतेही काम नियमानुसारच होईल असा त्यांचा आग्रह असतो.  

विद्यार्थ्यांची पाण्यासाठी होत असलेली हेळसांड पाहता मानवीय दृष्टीकोनातुन संबंधित ग्रामसेवकास तात्काळ नळ जोडून देऊन आगामी काळात कागदपत्रांची पूर्तता करून घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. - बी. टी. चव्हाण, गटविकास अधिकारी  

टॅग्स :WaterपाणीBeedबीडgram panchayatग्राम पंचायतStudentविद्यार्थी