शहरं
Join us  
Trending Stories
1
देशात 'अल-कायदा'चे स्लीपर सेल? NIAने ५ राज्यांत १० ठिकाणी छापे टाकले; गुजरात कनेक्शनमुळे खळबळ
2
मोदी सरकारने दिल्ली स्फोटाला दहशतवादी घटना मानले; चौकशीचे दिले आदेश
3
डोक्यात गोळी झाडून मित्रांकडून व्यावसायिकाचा खून; दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडमुखवाडी येथील घटना
4
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
5
Video : ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
6
१५ लाखांची लाच स्विकारताच न्यायाधीशांना कॉल अन्... न्याय देणारे न्यायाधीशच अडकले लाच प्रकरणात!
7
राहुल बनून खुशबूला भुलवलं, लग्न करण्यासाठी धर्म बदलण्याचा दबाव टाकला! कासिमने अखेर तोंड उघडलं
8
देसी गर्ल इज बॅक! 'ग्लोबेट्रोटर'मध्ये 'मंदाकिनी'च्या भूमिकेत प्रियंका चोप्रा, फर्स्ट लूक पाहून चाहते थक्क
9
IPL 2026 Trade Deal : अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्स संघातून OUT? 'ऑल कॅश ट्रान्सफर डील' चर्चेत
10
‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली पावणेतीन कोटींची फसवणूक; सहा संशयिताना बेड्या
11
Delhi Blast : ६ डिसेंबरला मोठ्या हल्ल्याची होती तयारी, पण १० नोव्हेंबरला झाला स्फोट; 'डॉक्टर ऑफ टेरर'चा भयानक कट असा झाला अयशस्वी
12
तुम्ही मित्र-मैत्रिणींशी बोलता अन् लगेच त्याच संदर्भात जाहिराती दिसू लागतात; खरंच तुमचा फोन तुमचं बोलणं ऐकतो?
13
धक्कादायक! झिरकपूर उड्डाणपुलावर 'VIP' एस्कॉर्टचा अहंकार; कारने निवृत्त लेफ्टनंट जनरलच्या गाडीला ठोकले, तसेच पळाले...
14
बिहारमध्ये लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक...
15
Ratnagiri: 'माझ्या पत्नीला भुताने नेऊन मारले,' पतीचा कट पडला उघडा, न्यायालयाने दिली मोठी शिक्षा
16
लग्नातच झाली बैठक, डॉ. आदिल राठर कसा सापडला, त्याच्या काय होती जबाबदारी? इनसाईड स्टोरी
17
"धनंजय मुंडेंना चौकशीला आणा! नाहीतर महागात पडेल!" जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा
18
Bihar Exit Poll : 'बिहार'मधील मागील निवडणुकीतील एक्झिट पोल खरे ठरले? काय होते अंदाज, काय होता निकाल, जाणून घ्या
19
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
20
तीन मुलांची आई प्रेमात पडली, बॉयफ्रेंडला म्हणाली 'माझ्या नवऱ्याला गोळ्या घाल'; मग पुढे जे झालं...

पाहणी नको, मदत द्या; त्यातूनच आता कर्ज फेडू...! बांधावर आलेल्या सरकारला शेतकऱ्यांची साद

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2025 16:10 IST

"ताई, दादा… आता कसली पाहणी करताय? काहीच शिल्लक राहिले नाही. आम्हाला थेट मदत द्या, त्यातून कसेबसे कर्ज फेडू," अशा भावना शेतकरी सरकारपुढे व्यक्त करत आहेत.

बीड : गेल्या दोन आठवड्यांपासून जिल्ह्यात पावसाने हाहाकार माजवला असून, होत्याचे नव्हते झाले आहे. जिल्ह्यातील १२१३ गावांना या अतिवृष्टीचा फटका बसला आहे. आष्टी, शिरूर आणि माजलगाव तालुक्यांतील अनेक गावांना पुराने वेढा घातला आहे. यात अनेक निष्पाप लोक वाहून गेले, पिके आडवी झाली आणि जमिनी वाहून गेल्याने केवळ दगडगोटे शिल्लक राहिले आहेत.

याच नुकसानीची पाहणी करण्यासाठी आता मंत्री आणि आमदार बांधावर जात आहेत. या भेटीत शेतकरी डोळ्यात अश्रू आणून आपली व्यथा मांडत आहेत. "ताई, दादा… आता कसली पाहणी करताय? काहीच शिल्लक राहिले नाही. आम्हाला थेट मदत द्या, त्यातून कसेबसे कर्ज फेडू," अशा भावना शेतकरी सरकारपुढे व्यक्त करत आहेत. याच नुकसानीची पाहणी करण्यासाठी बुधवारी उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार बीडमध्ये मुक्कामी आहेत.

६ लाख हेक्टरवर नुकसानजिल्ह्यात खरीप हंगामात ७ लाख ८९ हजार हेक्टरवर पेरणी झाली होती. मात्र, यातील ६ लाख १७ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. यात सोयाबीन, तूर अशी अनेक पिके हातातोंडाशी आलेली असताना वाया गेली आहेत. उर्वरित केवळ १ लाख ७२ हजार हेक्टरवरील पिकेच चांगली आहेत, पण असाच पाऊस सुरू राहिला तर तीही हातून जाण्याची भीती आहे.

तीन मंत्री, आमदार बांधावरमंत्री गिरीश महाजन यांनी बीड तालुक्यातील नांदूर हवेली येथे, तर मंत्री पंकजा मुंडे यांनी अंबाजोगाई आणि गेवराई तालुक्यात नुकसानीची पाहणी केली. महाजन हे ट्रॅक्टरमधून तर पंकजा मुंडे बैलगाडीतून बांधावर पोहोचल्या. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही बीड तालुक्यात पाहणी केली. यासोबतच आमदार सुरेश धस, संदीप क्षीरसागर, विजयसिंह पंडित, धनंजय मुंडे आणि ठाकरे गटाचे अंबादास दानवे यांनीही नुकसानीची पाहणी केली. दरम्यान, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे देखील गुरुवारी दुपारी बीड तालुक्यातील कुर्ला येथे पाहणी करणार असल्याचे सांगण्यात आले.

८ लोकांचा जीव गेला, ३०१ जनावरे दगावलीया अतिवृष्टीत जिल्ह्यात अनेक नद्या-नाल्यांना पूर आला. यात ८ जण वाहून किंवा बुडून मयत झाले आहेत. सोबतच ३०१ जनावरे दगावली आहेत. जवळपास २०५ गावांत जीवितहानीच्या घटना घडल्या आहेत. यासोबतच घरांचीही पडझड झाली असून अनेकांचे संसार उघड्यावर आले आहेत.

सत्ताधाऱ्यांसोबत विरोधकही बांधावरसत्ताधारी मंत्री, आमदारांसोबतच विरोधी पक्षातील नेतेही शेतकऱ्यांच्या बांधावर जावून पाहणी करत आहेत. सरसकट ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना मदत द्यावी, अशी मागणी त्यांच्याकडून केली जात आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Farmers plead for aid, not surveys, to repay debts.

Web Summary : Beed farmers, devastated by heavy rains, implore the government for direct financial aid instead of damage assessments to help them repay loans. Crops across 6 lakh hectares are ruined. Ministers and opposition leaders visit to assess losses and demand drought relief.
टॅग्स :FarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्रfloodपूरBeedबीड