शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
4
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
5
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
6
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
7
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
8
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
9
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
10
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
11
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
12
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
13
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
14
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
15
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
16
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
17
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
18
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
19
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका

जनावरे पालकमंत्र्यांच्या घरी सोडावीत का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2019 23:28 IST

पालकमंत्र्यांच्या घरी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांनी जनावरे सोडावीत का? असा संतप्त सवाल शासकीय मानधनाशिवाय मागील २२ दिवसांपासून चारा छावणी चालविणारे गेवराई पं.स.सदस्य परमेश्वर खरात यांनी केला आहे.

ठळक मुद्देचारा छावणी मंजुरीत राजकारण : २२ दिवसांपासून छावणी चालविणाऱ्या परमेश्वर खरात यांचा प्रशासनाला सवाल

बीड : जिल्ह्यात गंभीर दुष्काळ आणि तिव्र टंचाई परिस्थिती असतानाही शासन दुष्काळग्रस्तांची क्रूर चेष्टा करत आहे. निवडणुकीच्या तोंडावर छावणी मंजुरीचे अधिकार पालकमंत्र्यांना देऊन शासनाने राजकारण केले आहे. पालकमंत्र्यांच्या घरी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांनी जनावरे सोडावीत का? असा संतप्त सवाल शासकीय मानधनाशिवाय मागील २२ दिवसांपासून चारा छावणी चालविणारे गेवराई पं.स.सदस्य परमेश्वर खरात यांनी केला आहे.छावण्यांना मंजुरी देण्यासाठी झालेल्या विलंबामुळे मुक्या जनावरांचा तळतळाट शासनाला आणि पालकमंत्र्यांना लागल्याशिवाय राहणार नाही, असे खरात म्हणाले. बीड जिल्ह्यातील गंभीर दुष्काळ परिस्थितीच्या पार्श्वभुमीवर शेतकऱ्यांनी चारा छावण्या सुरु करण्याची मागणी शासनाकडे केली आहे. जिल्ह्यात चारा टंचाई असतानाही छावण्यांना मंजुरी मिळत नसल्यामुळे शासन विरोधी असंतोष दुष्काळग्रस्तांमध्ये पहावयास मिळत आहेत. शासनाने छावण्यांचे प्रस्ताव स्विकारल्यानंतर मंजुरीचे अधिकार पालकमंत्र्यांना देऊन निवडणुकीच्या तोंडावर राजकारण केल्याचा आरोप विरोधक करत आहेत.गेवराई तालुक्यात पाणी आणि चाºयाची गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक सामाजिक संस्थांनी चारा छावणीचे प्रस्ताव दाखल केले मात्र त्यास प्रशासनाकडून प्रतिसाद मिळाला नाही. मागील वर्षी मौजे सुशी येथे उत्कृष्ट पध्दतीने चारा छावणी सुरु केलेल्या पंचायत समिती सदस्य परमेश्वर खरात यांनी यावर्षीसुध्दा शासनाच्या परवानगीची वाट न पाहता मागील २२ दिवसांपासून सुशी येथे चारा छावणी सुरु केली आहे. त्यांना यावर्षी मंजुरी मिळत नसल्याने त्यांनी तिव्र शब्दांत आपली नाराजी व्यक्त केली. तातडीने निर्णय घेण्याची मागणी त्यांनी प्रशासनाकडे केली आहे.अनेक प्रश्न : निकष पूर्ण होऊनही मंजुरी नाही?याप्रकरणी परमेश्वर खरात म्हणाले की, आमच्या संस्थेने दाखल केलेल्या चारा छावणीच्या प्रस्तावाला प्रशासकीय यंत्रणेकडून सकारात्मक शिफारस मिळाली आहे. जिल्ह्यात आमच्या संस्थेचा पहिला प्रस्ताव दाखल झाला असून या बाबत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवक नोंदणीमध्ये आमच्या प्रस्तावाची क्र मांक एकवर नोंद आहे.शासनाचे सर्व निकष आम्ही पूर्ण करत आहोत, अशा परिस्थितीत आमच्या प्रस्तावाला मंजुरी का मिळत नाही ? याचे उत्तर अधिकारी देत नाहीत. याउलट राजकीय शिफारशीने इतरांना मंजुरी दिली जाते मग आमच्यावर अन्याय का ? दुष्काळग्रस्तांच्या जनावरांना पक्ष आहे का ? कोणत्या पक्षाची जनावरे आहेत हे पाहून छावण्यांना शासन मंजुरी देणार का ? असे सवाल खरात यांनी उपस्थित केला.

टॅग्स :BeedबीडAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरीagitationआंदोलन