शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

दिवाळी जोमात, सावट ओल्या दुष्काळाचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2019 12:21 AM

दोन दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याने दिव्यांची रोषणाई आणि फटाक्यांच्या आतिषबाजीत लक्ष्मीपूजन थाटात पार पडले.

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : दोन दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याने दिव्यांची रोषणाई आणि फटाक्यांच्या आतिषबाजीत लक्ष्मीपूजन थाटात पार पडले. याप्रसंगी खातेवही आणि व्यवसायातील संगणकाची एकत्र पूजा अनेकांनी केली. तर पाडव्याच्या मुहुर्तावर सोने- चांदी तसेच वाहन बाजाराला मोठी आशा आहे. जवळपास ३०० दुचाकी आणि ९० चारचाकी वाहनांची खरेदी होण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली. मात्र ऐन दिवाळीच्या तोंडावर आठवडाभर सतत पावसामुळे ग्रामीण भागावर ओल्या दुष्काळाचे सावट जाणवले. बाजारात खरेदीसाठी चाकरमान्यांचीच गर्दी जास्त दिसून आली.सप्टेंबरपर्यंत पुरेसा पाऊस नसल्याने दुष्काळी सावट होते. नंतर निवडणुकांमुळे बाजारात ग्राहकी नव्हती. याच कालावधीत अवेळी पाऊस झाल्याने खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे शेतकरी हताश झाले. तरीही दिवाळी आनंद आणि उत्साहात साजरी झाली.शनिवारी रात्रीपासूनच ग्रामीण भागातील फूल विक्रेत्यांनी बाजारातील जागा निश्चित केल्या होत्या. पावसामुळे झेंडू ओला झाल्याने विकताना शेतकऱ्यांच्या नाकी नऊ आले. मोठी आवक व भिजलेला असल्याने सकाळी ४० रुपये विकलेला झेंडू दुपारनंतर ८ ते १० रुपये किलोने विकण्याची वेळ विक्रेत्यांवर आली. पावसामुळे गुलाब, कमळ, शेवंती, निशिगंध, मोगरा आदी फुलांची आवक फारशी नव्हती.सोन्याला चढली झळाळीसाडेतीन मुहूर्तापैकी एक विजयादशमीला बाजार सुस्त होता. मात्र दिवाळीनिमित्त धत्रयोदशी, लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सोने- चांदीची खरेदी ग्राहकांनी केली तर पाडव्याच्या (बलिप्रतिपदा) मुहूर्तावर खरेदीसाठी अनेक ग्राहकांनी आगाऊ नोंदणी केली. सुवर्ण वेढणी, चांदीचे शिक्के, दागिने खरेदीकडे ग्राहकांचा कल होता. रविवारी सोने ३९ हजार रुपये तोळा तर चांदी ५० हजार रुपये किलो होती.वाहन बाजाराला आशामागील दोन वर्षांपासून मंदीत असलेल्या वाहन बाजाराला पाडवा आणि नंतर मोठ्या आशा आहेत. वाहन खरेदीच्या विचारात असतानाच पावसामुळे परिस्थिती बदलली. तरीही पाडव्याला जवळपास ३०० दुचाकी आणि शंभरावर चार चाकी वाहनांची खरेदी होण्याची शक्यता असल्याचे सूत्रांनी सांगितले.दिवाळीनिमित्त आपल्या कुटुंबाचा आनंद साजरा करत असताना वंचितांनाही सहभागी करुन घेणारे सामाजिक उपक्रम मागील दोन तीन दिवसांपासून सुरु होते.

टॅग्स :Diwaliदिवाळीcultureसांस्कृतिकMarketबाजारReligious programmeधार्मिक कार्यक्रमCrackersफटाके