शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
3
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
4
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
5
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
6
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
7
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
8
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
9
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
10
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
11
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
12
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
13
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
14
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
15
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
16
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
17
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
18
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
19
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
20
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!

तेलगाव रोड भागात २५ दिवसांपासून निर्जळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2019 23:47 IST

मागील काही दिवसांपासून शहराला होणारा नगर पालिकेचा पाणी पुरवठा विस्कळीत झाला असून शहरातील सय्यद अलीनगर ,महंमदिया कॉलनी परिसरातील काही भाग व इतर भागात २५ दिवसांपासून पाणी पुरवठा न झाल्याने टंचाईत भर पडली आहे.

ठळक मुद्दे‘पाणी दो’ आंदोलनाचा इशारा : महिला थेट कलेक्टर कचेरीत; सहयोगनगर, जिजामाता चौक परिसर सोडला वाऱ्यावर

बीड : मागील काही दिवसांपासून शहराला होणारा नगर पालिकेचा पाणी पुरवठा विस्कळीत झाला असून शहरातील सय्यद अलीनगर ,महंमदिया कॉलनी परिसरातील काही भाग, भांडवले गल्ली, आमेर कॉलनी, मिल्लत नगर, पापनेश्वर मंदिर परिसर, तेलगाव रोड, निमरा कॉलनी, मिल्लत नगर, अरीश कॉलनी व इतर भागात २५ दिवसांपासून पाणी पुरवठा न झाल्याने टंचाईत भर पडली आहे.नगरपरिषदेच्या हलगर्जीपणामुळे आणि ढिसाळ नियोजनामुळे ही टंचाई निर्माण झाल्याच्या संतप्त प्रतिक्रिया परिसरातील नागरिकांनी व्यक्त केल्या. पाणी पुरवठा सुरळीत न केल्यास तेलगाव रोडवरील राष्टÑीय महामार्गावर मुख्य रस्त्यावर पाणी दो आंदोलन करण्याचा इशारा माजी सभापती खुर्शीद आलम यांनी दिला आहे. येथील नागरिक नगर पालिकेच्या पाण्यावर मुख्यत: अवलंबून आहेत. ते पाण्यासाठी दूरपर्यंत भटकंती करत आहेत. त्यांना नगरपालिकेकडून पाणी मिळणे आवश्यक आहे, मात्र पालिकेच्या यंत्रणेकडून दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे खुर्शीद आलम यांच्यासह, इलियास सेवक, जलीलभाई, जाफरभाई, रफिकभाई, नसीरभाई, नविद भाई, सगीर भाई, इिम्तयाज भाई, चांद भाई, पप्पूभाई, मुजीब भाई, बिलाल भाई, सईद भाई, रवि भैय्या, महेश भैय्या आदींनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.मोहंमदिया कॉलनी व लगतच्या भागात तीन आठवड्यांपासून पाणीपुरवठा करण्यात आलेला नाही. त्यामुळे नागरिकांना विकतचे पाणी घेण्याची वेळ आली आहे. पाण्यासाठी नागरिकांना दूरदूर शोधाशोध करावी लागत आहे. दिवसभर पाण्यासाठी ताटकळावे लागत असून, दैनंदिन कामकाजावरही त्याचा विपरित परिणाम होत असल्याने या प्रश्नावर मंगळवारी संतप्त महिलांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले.पाणी उपलब्ध असताना अनियमितता मोठ्या प्रमाणावर होत असल्याने नागरिकांना पाणी मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत. नगरपालिका जाणीवपूर्वक पाणीपुरवठा करीत नसल्याचा नागरिकांना आरोप आहे. जिल्हा प्रशासनाने या समस्येकडे गांभिर्याने लक्ष देऊन नियोजनानुसार ११ दिवसांआड सुरळीत पाणीपुरवठा करण्यासाठी नगरपालिका प्रशासनाला सूचना करावी, अशी मागणी यावेळी आंदोलकांनी केली.पाणीपुरवठा सुरू न झाल्यास मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्याचा इशारा मोहंमदिया कॉलनी, आरेफ कॉलनी, सय्यद अलीनगर, तसेच लगतच्या भागातील नागरिकांनी निवेदनाद्वारे दिला आहे.

टॅग्स :Beedबीडwater shortageपाणीटंचाईagitationआंदोलन