शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
3
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
4
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
5
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
6
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
7
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
8
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
9
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
10
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
11
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
12
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
13
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
14
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
16
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
17
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
18
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
19
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
20
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख

तेलगाव रोड भागात २५ दिवसांपासून निर्जळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2019 23:47 IST

मागील काही दिवसांपासून शहराला होणारा नगर पालिकेचा पाणी पुरवठा विस्कळीत झाला असून शहरातील सय्यद अलीनगर ,महंमदिया कॉलनी परिसरातील काही भाग व इतर भागात २५ दिवसांपासून पाणी पुरवठा न झाल्याने टंचाईत भर पडली आहे.

ठळक मुद्दे‘पाणी दो’ आंदोलनाचा इशारा : महिला थेट कलेक्टर कचेरीत; सहयोगनगर, जिजामाता चौक परिसर सोडला वाऱ्यावर

बीड : मागील काही दिवसांपासून शहराला होणारा नगर पालिकेचा पाणी पुरवठा विस्कळीत झाला असून शहरातील सय्यद अलीनगर ,महंमदिया कॉलनी परिसरातील काही भाग, भांडवले गल्ली, आमेर कॉलनी, मिल्लत नगर, पापनेश्वर मंदिर परिसर, तेलगाव रोड, निमरा कॉलनी, मिल्लत नगर, अरीश कॉलनी व इतर भागात २५ दिवसांपासून पाणी पुरवठा न झाल्याने टंचाईत भर पडली आहे.नगरपरिषदेच्या हलगर्जीपणामुळे आणि ढिसाळ नियोजनामुळे ही टंचाई निर्माण झाल्याच्या संतप्त प्रतिक्रिया परिसरातील नागरिकांनी व्यक्त केल्या. पाणी पुरवठा सुरळीत न केल्यास तेलगाव रोडवरील राष्टÑीय महामार्गावर मुख्य रस्त्यावर पाणी दो आंदोलन करण्याचा इशारा माजी सभापती खुर्शीद आलम यांनी दिला आहे. येथील नागरिक नगर पालिकेच्या पाण्यावर मुख्यत: अवलंबून आहेत. ते पाण्यासाठी दूरपर्यंत भटकंती करत आहेत. त्यांना नगरपालिकेकडून पाणी मिळणे आवश्यक आहे, मात्र पालिकेच्या यंत्रणेकडून दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे खुर्शीद आलम यांच्यासह, इलियास सेवक, जलीलभाई, जाफरभाई, रफिकभाई, नसीरभाई, नविद भाई, सगीर भाई, इिम्तयाज भाई, चांद भाई, पप्पूभाई, मुजीब भाई, बिलाल भाई, सईद भाई, रवि भैय्या, महेश भैय्या आदींनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.मोहंमदिया कॉलनी व लगतच्या भागात तीन आठवड्यांपासून पाणीपुरवठा करण्यात आलेला नाही. त्यामुळे नागरिकांना विकतचे पाणी घेण्याची वेळ आली आहे. पाण्यासाठी नागरिकांना दूरदूर शोधाशोध करावी लागत आहे. दिवसभर पाण्यासाठी ताटकळावे लागत असून, दैनंदिन कामकाजावरही त्याचा विपरित परिणाम होत असल्याने या प्रश्नावर मंगळवारी संतप्त महिलांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले.पाणी उपलब्ध असताना अनियमितता मोठ्या प्रमाणावर होत असल्याने नागरिकांना पाणी मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत. नगरपालिका जाणीवपूर्वक पाणीपुरवठा करीत नसल्याचा नागरिकांना आरोप आहे. जिल्हा प्रशासनाने या समस्येकडे गांभिर्याने लक्ष देऊन नियोजनानुसार ११ दिवसांआड सुरळीत पाणीपुरवठा करण्यासाठी नगरपालिका प्रशासनाला सूचना करावी, अशी मागणी यावेळी आंदोलकांनी केली.पाणीपुरवठा सुरू न झाल्यास मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्याचा इशारा मोहंमदिया कॉलनी, आरेफ कॉलनी, सय्यद अलीनगर, तसेच लगतच्या भागातील नागरिकांनी निवेदनाद्वारे दिला आहे.

टॅग्स :Beedबीडwater shortageपाणीटंचाईagitationआंदोलन