शहरं
Join us  
Trending Stories
1
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
2
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
3
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
4
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
5
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया
6
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
7
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
8
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
9
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
10
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
11
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
12
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
13
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
14
अग्रलेख: ‘ती’च्यावर गर्भाशय काढण्याची वेळ का येते?
15
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
16
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
17
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
18
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
19
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
20
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू

तेलगाव रोड भागात २५ दिवसांपासून निर्जळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2019 23:47 IST

मागील काही दिवसांपासून शहराला होणारा नगर पालिकेचा पाणी पुरवठा विस्कळीत झाला असून शहरातील सय्यद अलीनगर ,महंमदिया कॉलनी परिसरातील काही भाग व इतर भागात २५ दिवसांपासून पाणी पुरवठा न झाल्याने टंचाईत भर पडली आहे.

ठळक मुद्दे‘पाणी दो’ आंदोलनाचा इशारा : महिला थेट कलेक्टर कचेरीत; सहयोगनगर, जिजामाता चौक परिसर सोडला वाऱ्यावर

बीड : मागील काही दिवसांपासून शहराला होणारा नगर पालिकेचा पाणी पुरवठा विस्कळीत झाला असून शहरातील सय्यद अलीनगर ,महंमदिया कॉलनी परिसरातील काही भाग, भांडवले गल्ली, आमेर कॉलनी, मिल्लत नगर, पापनेश्वर मंदिर परिसर, तेलगाव रोड, निमरा कॉलनी, मिल्लत नगर, अरीश कॉलनी व इतर भागात २५ दिवसांपासून पाणी पुरवठा न झाल्याने टंचाईत भर पडली आहे.नगरपरिषदेच्या हलगर्जीपणामुळे आणि ढिसाळ नियोजनामुळे ही टंचाई निर्माण झाल्याच्या संतप्त प्रतिक्रिया परिसरातील नागरिकांनी व्यक्त केल्या. पाणी पुरवठा सुरळीत न केल्यास तेलगाव रोडवरील राष्टÑीय महामार्गावर मुख्य रस्त्यावर पाणी दो आंदोलन करण्याचा इशारा माजी सभापती खुर्शीद आलम यांनी दिला आहे. येथील नागरिक नगर पालिकेच्या पाण्यावर मुख्यत: अवलंबून आहेत. ते पाण्यासाठी दूरपर्यंत भटकंती करत आहेत. त्यांना नगरपालिकेकडून पाणी मिळणे आवश्यक आहे, मात्र पालिकेच्या यंत्रणेकडून दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे खुर्शीद आलम यांच्यासह, इलियास सेवक, जलीलभाई, जाफरभाई, रफिकभाई, नसीरभाई, नविद भाई, सगीर भाई, इिम्तयाज भाई, चांद भाई, पप्पूभाई, मुजीब भाई, बिलाल भाई, सईद भाई, रवि भैय्या, महेश भैय्या आदींनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.मोहंमदिया कॉलनी व लगतच्या भागात तीन आठवड्यांपासून पाणीपुरवठा करण्यात आलेला नाही. त्यामुळे नागरिकांना विकतचे पाणी घेण्याची वेळ आली आहे. पाण्यासाठी नागरिकांना दूरदूर शोधाशोध करावी लागत आहे. दिवसभर पाण्यासाठी ताटकळावे लागत असून, दैनंदिन कामकाजावरही त्याचा विपरित परिणाम होत असल्याने या प्रश्नावर मंगळवारी संतप्त महिलांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले.पाणी उपलब्ध असताना अनियमितता मोठ्या प्रमाणावर होत असल्याने नागरिकांना पाणी मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत. नगरपालिका जाणीवपूर्वक पाणीपुरवठा करीत नसल्याचा नागरिकांना आरोप आहे. जिल्हा प्रशासनाने या समस्येकडे गांभिर्याने लक्ष देऊन नियोजनानुसार ११ दिवसांआड सुरळीत पाणीपुरवठा करण्यासाठी नगरपालिका प्रशासनाला सूचना करावी, अशी मागणी यावेळी आंदोलकांनी केली.पाणीपुरवठा सुरू न झाल्यास मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्याचा इशारा मोहंमदिया कॉलनी, आरेफ कॉलनी, सय्यद अलीनगर, तसेच लगतच्या भागातील नागरिकांनी निवेदनाद्वारे दिला आहे.

टॅग्स :Beedबीडwater shortageपाणीटंचाईagitationआंदोलन