आष्टी : आष्टी, पाटोदा, शिरूर तालुक्यातील परिवहन महामंडळाच्या बसस्थानकांच्या रखडलेल्या कामांसंदर्भात मुंबई मंत्रालय येथे परिवहनमंत्री अनिल परब यांची आ. सुरेश धस यांनी भेट घेतली. बसस्थानकांच्या प्रलंबित व महत्त्वपूर्ण विषयावर बैठक झाली. यावेळी परिवहन मंत्री अनिल परब यांनी आ. सुरेश धस यांनी केलेल्या मागण्यांबाबत सकारात्मकता दाखवत तत्काळ मार्गी लावू, अशा ‘शब्द’ दिला.
बसस्थानक बंद असल्याने गैरसोय होऊन सर्वसामान्य नागरिकांचे हाल होत आहेत. याबाबत नागरिकांच्या वारंवार तक्रारी येत आहेत. तत्काळ तिन्ही तालुक्यातील रखडलेल्या बसस्थानकाचे कामे सुरू करावेत तसेच उपलब्ध सेवासुविधा व अन्य समस्या तसेच निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी आ. सुरेश धस यांनी यावेळी केली.
दरम्यान, बसस्थानकासंदर्भात येणाऱ्या अडचणी व सर्व बाबींवर विचारविनिमय करण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाचे कार्यकारी संचालक, औरंगाबाद विभागाचे प्रादेशिक व्यवस्थापक,
बीड विभागाचे विभाग नियंत्रक तसेच स्थापत्य अभियंत्यांची संयुक्त
बैठक आपल्या दालनामध्ये तातडीने आयोजित करावी व त्यासाठी वेळ व दिनांक लवकरात लवकर निश्चित करावा, अशी मागणी आ. सुरेश धस यांनी केली.
---
बैठकीत या विषयांवर चर्चा
१) गेल्या दोन वर्षांपासून आष्टी बसस्थानकाचे काम बंद आहे. कडा (ता. आष्टी) येथील बसस्थानकाच्या जागेची मोजणी करून ग्रामपंचायत कार्यालय कडा व परिवहन महामंडळाचा वाद मिटवावा.
२) पाटोदा येथील महासांगवी रोड येथील परिवहन महामंडळाची (जुने बसस्थानक) जागा नगरपंचायतीस नाना नानी पार्क करण्यासाठी द्यावी.
३) शिरूर (का.) येथे नवीन आगाराची निर्मिती करावी, शिरूर (का.) येथील बसस्थानकास महसूल विभागाची जागा घेऊन त्याठिकाणी बसस्थानकाचे बांधकाम करावे.
----------
===Photopath===
160621\img-20210616-wa0420_14.jpg