शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
2
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
3
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
4
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
5
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
6
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
7
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
8
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
9
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
10
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
11
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
12
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
13
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
14
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
15
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
16
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
17
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
18
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
19
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
20
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
Daily Top 2Weekly Top 5

देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री, माझ्या दावेदारीचा प्रश्न नाही : पंकजा मुंडे 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2019 17:54 IST

मी राज्यभर फिरणार, परळीची लढाई अटीतटीची नाही

- धर्मराज हल्लाळे  

परळी (जि. बीड) : भगवानबाबा गडावर आलेल्या जनतेचा उत्साह मी समजू शकते. त्यांनी मुख्यमंत्री म्हणून माझे नाव घेतले, हा मला मिळालेला मोठेपणा आहे; परंतु, माझ्या मनात किंचितही इच्छा नाही. येणारे सरकार आमचे असेल आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच होतील, असे स्पष्ट करीत ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी दावेदारी सांगणे ही भाजपची संस्कृती नसल्याचे म्हटले आहे. 

‘लोकमत’शी बोलताना त्या म्हणाल्या, भगवानबाबा गडावर सबंध राज्यातून लोक येतात. इथे आलेल्या काही तरुणांनी उत्साह दाखविला. २०१४ मध्ये आणि पुन्हा आता अमित शहा यांच्या उपस्थितीत झालेल्या सोहळ्यात लोकभावना समोर आली. ते काही कार्यकर्ते नव्हते. 

कार्यकर्त्यांची भावना आहे, मग तुमची भावना काय?जनतेच्या भावनेचा आदर केला पाहिजे. परंतु, मला दावेदार दाखविले जात असेल  तर ते चुकीचे आहे. २०१४ मध्येही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होणार, हे मला माहीत होते. ते कर्तृत्ववान आहेत. त्यांनी उत्तम काम केले आहे. त्यामुळे पक्षानेही फडणवीस यांचेच नेतृत्व राज्यात मान्य केले आहे.

भविष्यातही दावा नाही का?  

पक्ष मोठा आहे. संघटन मोठे आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांच्यासारखे दिग्गज नेतृत्व लाभले आहे. त्यांना सगळ्यांच्या क्षमता आणि भविष्य माहीत आहे. त्यांना दूरचे कळते. शिवाय, दावा करायला माझी व्यक्तिगत मालमत्ता नाही. त्यामुळे अकारण नवीन चर्चा वाढवू नये.

निवडणुकीच्या तोंडावर शरद पवार यांच्यावर गुन्हा दाखल करणे सत्ताधाऱ्यांसाठी अडचणीचे ठरले का? गुन्हा दाखल करण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. शरद पवार यांचे राजकारणही प्रदीर्घ व मोठे आहे. ते अनुभवी आहेत. त्यांना गुन्हा  आत्ताच दाखल का झाला, हे कळते. त्यात सरकारचे राजकारण नाही. 

मतदारसंघातच तुम्ही अडकलात का? मी राज्यभर सभा घेत आहे. माझ्यासाठी परळीची लढाई अटीतटीची नाही. मराठवाड्यातील नेतृत्वाला डावलले जाते का? तिकीट वाटपात नाराजी झाली? यावर पंकजा मुंडे म्हणाल्या, नेतृत्व मराठवाड्यातील असो, विदर्भातील की पश्चिम महाराष्ट्रातील. ते ब्रेक करण्याचा प्रयत्न कोणी करू नये. तसे झाले, तर ते अजून मोठे होते हा इतिहास आहे. मुळात तसे घडलेले नाही. तसेच तिकीट वाटपात युती करणे याला प्राधान्य होते. त्यामुळे काही ठिकाणी नाराजी झाली. ज्यांना तिकीट मिळाले नाही, त्यांनी स्वत: पुढे येऊन निर्णय मान्य असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे पुन्हा ते उगाळणे नको.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Pankaja Mundeपंकजा मुंडेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसMaharashtraमहाराष्ट्र