शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
3
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
4
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
5
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
6
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
7
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
8
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
9
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
10
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
11
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
12
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
13
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
14
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
15
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
16
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
17
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
18
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
19
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
20
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
Daily Top 2Weekly Top 5

विकासकामे करून दाखवावी लागतात - जयदत्त क्षीरसागर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2019 00:06 IST

बीड मतदारसंघातील जनतेवर माझा विश्वास आहे. नेहमीच मी त्यांचा आदर केला आहे. या जनतेला विकास हवा आहे. आणि विकासाची भूक पूर्ण करण्याचा मी प्रयत्न केला आहे असे प्रतिपादन जयदत्त क्षीरसागर यांनी बोरफडी येथे केले.

बीड : बाजारात आपण एखादी वस्तू खरेदी करताना सर्व बाजूने विचार करून खरेदी करतो. तसेच मतदान करताना देखील चौकस बुद्धी ठेऊन मतदान करावे लागते. विकासकामे करून दाखवावी लागतात. ती बोलल्याने किंवा फेकाफेकी केल्याने होत नसतात. बीड मतदारसंघातील जनतेवर माझा विश्वास आहे. नेहमीच मी त्यांचा आदर केला आहे. या जनतेला विकास हवा आहे. आणि विकासाची भूक पूर्ण करण्याचा मी प्रयत्न केला आहे असे प्रतिपादन जयदत्त क्षीरसागर यांनी बोरफडी येथे केले.बीड विधानसभा मतदारसंघातील उमेदवार जयदत्त क्षीरसागर यांनी शनिवारी कॉर्नर बैठका घेत डोंगरपट्टा पिंजून काढला. यावेळी शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख बाळासाहेब पिंगळे, सुशिल पिंगळे, पंजाब काकडे, गणेश वरेकर, राणा डोईफोडे, बप्पासाहेब घुगे, तात्या डोईफोडे, अरूण डाके, शिवानंद कदम, डॉ.आंधळे, सखाहरी गदळे, तुळशीराम महाराज, उत्तमराव महाराज, महादेव घुगे आदिंची उपस्थिती होती.जयदत्त क्षीरसागर म्हणाले, डोंगरपट्ट्यातील बोरफडी येथील ग्रामस्थांनी जेव्हा जेव्हा विकासाच्या कामाची मागणी आणि हट्ट धरला. तेव्हा तेव्हा त्यांच्या मागणीला प्राधान्य देण्याचे काम आपण केले. शिक्षण, आरोग्य आणि डोंगरी भागाच्या विकासाचा अनुशेष भरून काढण्याचे काम आपण केले. मिळालेल्या खात्याच्या माध्यमातून जनतेला आणि शेतकऱ्यांना फायदा मिळवून देण्याचे काम आपण केले.शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख बाळासाहेब पिंगळे म्हणाले की, शिवसैनिकांनी ही निवडणूक आपल्या खांद्यावर घेतली आहे. जिवाचे रान करून जयदत्त क्षीरसागरांना मोठे मताधिक्य मिळवून देणार आहे. खांद्यावर बाण घेतलेल्या जयदत्त क्षीरसागरांना थेट मंत्रालयामध्ये पाठवायचे आहे. त्यासाठी आपण मदतीचा खारीचा वाटा उचला असे आवाहन त्यांनी केले. यावेळी सुशील पिंगळे, डी.एस.कदम, अरूण बोंगाने, साहेबराव पोकळे, परमेश्वर घुमरे, तात्या डोईफोडे, सुरेश घुगे, झुंजार धांडे, लालासाहेब घुगे, विलास कुटे, महादेव घुगे यांच्यासह महिला, पुरूष, युवकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.सोंगंढोंगं करणाऱ्यांना बाजूला साराया निवडणुकीत आपल्याला संधी मिळाली तर संधीचं सोनं करण्याचे काम आपण करू. या भागातील ऊसतोड मजूर हातात कोयता घेऊन जीवन जगतो. तो कोयता घेणारा शेतकरी बागायतदार झाला पाहिजे. विकासकामे जलदगतीने करायची असतील तर सोंगंढोंगं करणाºयांना बाजूला सारा, गट -तट विसरून धनुष्यबाणाला मतदान करा. विकास बोलून होत नाही तो करून दाखवावा लागतो असे यावेळी जयदत्त क्षीरसागर म्हणाले.

टॅग्स :BeedबीडMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019beed-acबीडJaydutt Kshirsagarजयदत्त क्षीरसागर