शहरं
Join us  
Trending Stories
1
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
2
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
3
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
4
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
5
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
6
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
7
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
8
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
9
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
10
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
11
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
12
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
13
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
14
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
15
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
16
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
17
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
18
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
19
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
20
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

गावोगावी सोयाबीन उगवण क्षमतेची प्रात्यक्षिके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:55 IST

बीड : जिल्ह्यातील सोयाबीन क्षेत्रात मागील काही वर्षांत वाढ होत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे बियाणांचीदेखील कमतरता भासत होती. दरम्यान, ...

बीड : जिल्ह्यातील सोयाबीन क्षेत्रात मागील काही वर्षांत वाढ होत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे बियाणांचीदेखील कमतरता भासत होती. दरम्यान, बोगस बियाणांमुळे दुबार पेरणीचे संकटदेखील शेतकऱ्यांवर आले होेते. त्यामुळे घरच्या सोयाबीनचे बियाणे स्वच्छ करून वापरण्याचे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.

गावोगावी कृषी विभागाकडून सोयाबीन उगवण क्षमतेची प्रात्यक्षिके दाखवली जात असून, यामध्ये ७० टक्क्यांपेक्षा जास्त उगवण क्षमता असेल तरच, त्या बियाणांचा वापर पेरणीसाठी करावा, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.

मागील कृषी विभागाने अंदाजे १ लाख ९० हजार हेक्टर सोयाबीनचे सर्वसाधारण क्षेत्र ग्राह्य धरले होते. मात्र, जवळपास २ लाख ४१ हजार हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनचा पेरा करण्यात आला होता. यावर्षीदेखील हे क्षेत्र वाढण्याची शक्यता कृषी विभागाकडून वर्तवली जात आहे. मागील वर्षी विविध कंपनीकडून बोगस सोयाबीन बियाणे पुरवठा करण्यात आल्यामुळे अनेक शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागली होती. यामुळे आर्थिक नुकसान झाले होते. याची भरपाईदेखील अद्याप अनेकांना मिळालेली नाही. दरम्यान, यावर्षी सोयाबीन पिकाचे वाढणारे क्षेत्र लक्षात घेता, शेतकऱ्यांनी घरच्या बियाणांचा वापर जास्तीत करावा यासाठी जिल्हा कृषी विभागाकडून शेतकऱ्यांमध्ये जनजागृती केली जात आहे.

जिल्ह्यातील सर्वच तालुका कृषी अधिकारी व कर्मचारी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन सोयाबीन उगवण क्षमता कशी तपासावी याची प्रात्यक्षिके दाखवत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांमधून या मोहिमेचे स्वागत केले जात आहे.

...अशी तपासा उगवण क्षमता

सुती पोते किंवा चौकोनी कपडा पूर्णपणे भिजवून घ्यावी. त्यानंतर ती व्यवस्थितपणे जमिनीवर अंथरून ठेवावी. प्रत्येक ओळीमध्ये १०-१० बियांचा वापर करून दहा रांगा करून व्यवस्थितपणे बियाणे ठेवून घ्यावे. यानंतर पोते गोलाकार गुंडाळून घ्यावे. गुंडाळताना ओल्या पोत्यातील बिया हलणार नाहीत याची दक्षता घ्यावी. यानंतर गुंडाळलेल्या पोत्यास कडेला सुतळीने बांधून घ्यावे आणि तीन ते चार दिवस सावलीला ठेवून त्यावर दिवसातून चार वेळा हलकेसे पाणी शिंपडावे. तीन ते चार दिवस झाल्यानंतर उगवण झालेली एक एक रांग मोजून घ्यावी. १०० पैकी किती बियाणांना मोड आलेले आहेत असे सुदृढ व निरोगी बियाणे मोजून घ्यावे. ६१ ते ७० टक्के उगवण क्षमता असेल तरच बियाणे पेरण्यासाठी वापरावे.

....

गावीगावी राबवलेल्या प्रात्यक्षिक मोहिमेमुळे शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करण्यात येत आहे. ६१ ते ७० टक्के बियाणांची उगवण क्षमता असेल तर, सरासरी एकरी ३२ ते ३५ किलो सोयाबीन बियाणे वापरावे. ६० टक्क्यांपेक्षा कमी उगवण क्षमता असे तर, त्या बियाणांचा वापर शेतकऱ्यांनी करू नये.

-डी. जी. मुळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, बीड

===Photopath===

040521\04_2_bed_15_04052021_14.jpeg

===Caption===

कृषी विभागाचे कर्मचारी शेतकऱ्यांना सोयाबीन बियाणे उगवण क्षमतेचे प्रात्यक्षिक दाखवताना