शहरं
Join us  
Trending Stories
1
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
3
'मी हे विकत घेऊ शकत नाही' असे म्हणणे सोडा! रॉबर्ट कियोसाकींनी सांगितला श्रीमंतीचा नवा मंत्र
4
VIDEO : "सर्वस्व दिलं, तरीही मनासारखं नाही घडलं!" रोहित शर्मा 'त्या' गोष्टीबद्दल पहिल्यांदाच बोलला
5
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
6
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
7
सैराटची पुनरावृत्ती! आंतरजातीय विवाहामुळे बदल्याची आग; बापानेच केली गर्भवती लेकीची हत्या
8
रस्त्यांवर झाडू मारतोय भारतीय 'सॉफ्टवेअर डेव्हलपर'! महिना सव्वा लाखाची कमाई; कंपनी का देते इतके पैसे?
9
विधवा वहिनीचं दीरासोबतच सुरू झालं अफेअर अन् अचानक घरातून झाली गायब! एक महिन्यानंतर जे समोर आलं... 
10
तुम्ही वापरत असलेला चार्जर FAKE तर नाहीये ना? कसा ओळखायचा ओरिजनल चार्जर, टाळू शकता मोबाइलचं होणारं नुकसान
11
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
12
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
13
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
14
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
15
Budh Gochar 2025: २०२५ ला निरोप देताना 'या' ७ राशींचे नशीब चमकणार, आयुष्यात येणार सुवर्णकाळ
16
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
17
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
18
KVP Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
19
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
20
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

गावोगावी सोयाबीन उगवण क्षमतेची प्रात्यक्षिके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:55 IST

बीड : जिल्ह्यातील सोयाबीन क्षेत्रात मागील काही वर्षांत वाढ होत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे बियाणांचीदेखील कमतरता भासत होती. दरम्यान, ...

बीड : जिल्ह्यातील सोयाबीन क्षेत्रात मागील काही वर्षांत वाढ होत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे बियाणांचीदेखील कमतरता भासत होती. दरम्यान, बोगस बियाणांमुळे दुबार पेरणीचे संकटदेखील शेतकऱ्यांवर आले होेते. त्यामुळे घरच्या सोयाबीनचे बियाणे स्वच्छ करून वापरण्याचे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.

गावोगावी कृषी विभागाकडून सोयाबीन उगवण क्षमतेची प्रात्यक्षिके दाखवली जात असून, यामध्ये ७० टक्क्यांपेक्षा जास्त उगवण क्षमता असेल तरच, त्या बियाणांचा वापर पेरणीसाठी करावा, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.

मागील कृषी विभागाने अंदाजे १ लाख ९० हजार हेक्टर सोयाबीनचे सर्वसाधारण क्षेत्र ग्राह्य धरले होते. मात्र, जवळपास २ लाख ४१ हजार हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनचा पेरा करण्यात आला होता. यावर्षीदेखील हे क्षेत्र वाढण्याची शक्यता कृषी विभागाकडून वर्तवली जात आहे. मागील वर्षी विविध कंपनीकडून बोगस सोयाबीन बियाणे पुरवठा करण्यात आल्यामुळे अनेक शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागली होती. यामुळे आर्थिक नुकसान झाले होते. याची भरपाईदेखील अद्याप अनेकांना मिळालेली नाही. दरम्यान, यावर्षी सोयाबीन पिकाचे वाढणारे क्षेत्र लक्षात घेता, शेतकऱ्यांनी घरच्या बियाणांचा वापर जास्तीत करावा यासाठी जिल्हा कृषी विभागाकडून शेतकऱ्यांमध्ये जनजागृती केली जात आहे.

जिल्ह्यातील सर्वच तालुका कृषी अधिकारी व कर्मचारी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन सोयाबीन उगवण क्षमता कशी तपासावी याची प्रात्यक्षिके दाखवत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांमधून या मोहिमेचे स्वागत केले जात आहे.

...अशी तपासा उगवण क्षमता

सुती पोते किंवा चौकोनी कपडा पूर्णपणे भिजवून घ्यावी. त्यानंतर ती व्यवस्थितपणे जमिनीवर अंथरून ठेवावी. प्रत्येक ओळीमध्ये १०-१० बियांचा वापर करून दहा रांगा करून व्यवस्थितपणे बियाणे ठेवून घ्यावे. यानंतर पोते गोलाकार गुंडाळून घ्यावे. गुंडाळताना ओल्या पोत्यातील बिया हलणार नाहीत याची दक्षता घ्यावी. यानंतर गुंडाळलेल्या पोत्यास कडेला सुतळीने बांधून घ्यावे आणि तीन ते चार दिवस सावलीला ठेवून त्यावर दिवसातून चार वेळा हलकेसे पाणी शिंपडावे. तीन ते चार दिवस झाल्यानंतर उगवण झालेली एक एक रांग मोजून घ्यावी. १०० पैकी किती बियाणांना मोड आलेले आहेत असे सुदृढ व निरोगी बियाणे मोजून घ्यावे. ६१ ते ७० टक्के उगवण क्षमता असेल तरच बियाणे पेरण्यासाठी वापरावे.

....

गावीगावी राबवलेल्या प्रात्यक्षिक मोहिमेमुळे शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करण्यात येत आहे. ६१ ते ७० टक्के बियाणांची उगवण क्षमता असेल तर, सरासरी एकरी ३२ ते ३५ किलो सोयाबीन बियाणे वापरावे. ६० टक्क्यांपेक्षा कमी उगवण क्षमता असे तर, त्या बियाणांचा वापर शेतकऱ्यांनी करू नये.

-डी. जी. मुळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, बीड

===Photopath===

040521\04_2_bed_15_04052021_14.jpeg

===Caption===

कृषी विभागाचे कर्मचारी शेतकऱ्यांना सोयाबीन बियाणे उगवण क्षमतेचे प्रात्यक्षिक दाखवताना