शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत महायुतीची बैठक संपली; भाजपा-शिंदेसेनेचा फॉर्म्युला ठरला, शेलारांनी आकडाही सांगितला
2
BJP Assets: 2014 पूर्वी भाजपाच्या तिजोरीत किती पैसा होता? 11 वर्षांत किती वाढला? जाणून थक्क व्हाल!
3
आत्मनिर्भर भारताच्या दिशेने मोठे पाऊल, भारतातील पहिला स्वदेशी 64- बिट मायक्रोप्रोसेसर Dhruv64 लाँच
4
18 डिसेंबरपासून 'या' वाहनांवर बंदी! PUC शिवाय पेट्रोल नाही, 7 लाखांचा दंड; दिल्ली सरकारचा निर्णय
5
IPL 2026 Auction: Mumbai Indians ने घेतला पहिला खेळाडू; Rohit Sharma ला मिळाला नवा जोडीदार
6
वयोवृद्ध जोडपं दहशतवाद्याशी भिडलं, अखेरीस एकमेकांच्या मिठीत सोडले प्राण, बोरिस आणि सोफियाची थरारक कहाणी
7
मेस्सीचा इव्हेंट फसला, स्टेडियममध्ये मोठा गोंधळ झाला होता; बंगालच्या क्रीडामंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला
8
IPL 2026 Auction: विस्फोटक फलंदाज आयपीएल २०२६ च्या मेगा ऑक्शनमध्ये अनसोल्ड, नाव ऐकून चकीत व्हाल!
9
बाई, हा काय प्रकार... LinkedIn वर फुल-टाइम गर्लफ्रेंडची व्हॅकन्सी, लोक विचारतात सॅलरी किती?
10
सोनं १३०६ रुपयांनी स्वस्त, चांदीही घसरली; पटापट चेक करा कॅरेटनिहाय लेटेस्ट रेट
11
Jara Hatke: अजब प्रथा: 'या' गावात लग्नाआधी तोडले जातात वधूचे दात; पण का??? वाचा 
12
मनोज जरांगे पाटील यांनी दिल्ली गाठली; अमित शाह यांच्याकडे केली मोठी मागणी, नेमके काय घडतेय?
13
IPL Auction 2026 LIVE: केकेआरचा मोठा डाव, कॅमरून ग्रीनपाठोपाठ पतिरानावर लावली विक्रमी बोली
14
Budh Pradosh 2025: इंग्रजी वर्ष २०२५ मधील शेवटचे प्रदोष व्रत; कर्जमुक्ती, संतान प्राप्तीसाठी करा 'हे' उपाय
15
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉसह सरफराज खानला कुणीच दिला नाही भाव; सलग दुसऱ्यांदा 'अनसोल्ड'चा ठपका
16
खळबळजनक! लेकीच्या कस्टडीसाठी पतीने रचला भयंकर प्लॅन; टीव्ही अभिनेत्री पत्नीला केलं किडनॅप
17
नाईट क्लब आग प्रकरणी फरार लुथरा बंधूंना दिल्लीत आणले; थायलंडला पळून गेले होते
18
कोट्यवधी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! मार्च २०२६ पूर्वी मिळणार मोठं गिफ्ट, सरकारनं दिली महत्त्वाची माहिती
19
सेकंदात तयार होणारी मॅगी कॅप्सूल खरी की खोटी? ४० मिलियन लोकांनी बघितलेल्या व्हिडीओचं सत्य काय?
20
Numerology: अंकशास्त्रानुसार 'या' जन्मतारखेच्या लोकांनी पायात काळा धागा बांधू नये; होतो दुष्परिणाम!
Daily Top 2Weekly Top 5

३०० टन कचऱ्यावर रोज प्रक्रिया; चिकलठाण्यानंतर पडेगाव येथील कचऱ्याचा ड्रीम प्रोजेक्ट सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2020 19:43 IST

पहिल्या टप्प्यात चिकलठाणा येथील प्रकल्प अत्यंत यशस्वीपणे सुरू करण्यात आला. मागील दीड वर्षापासून या ठिकाणी दररोज १५० मेट्रिक टन कचऱ्यावर प्रक्रिया करण्यात येत आहे. 

औरंगाबाद :  ऐतिहासिक औरंगाबाद शहराची तीन वर्षांपूर्वी कचऱ्यामुळे देशभरातच नव्हे, तर विदेशातही नाचक्की झाली होती. कचरा प्रश्न महापालिकेच्या मुख्य अजेंड्यावर असताना राज्य शासनाकडूनही १०० टक्के आर्थिक मदत मिळाली. त्यामुळे महापालिकेने दीड वर्षापूर्वी चिकलठाणा येथे ३०० मेट्रिक टन क्षमतेचा कचरा प्रक्रिया प्रकल्प सुरू केला. त्यापाठोपाठ आता पडेगाव येथील दीडशे मेट्रिक टन क्षमतेचा प्रकल्प प्रयोगिक तत्त्वावर यशस्वीरीत्या सुरू करण्यात आला आहे. आता शहरात दररोज ३०० मेट्रिक टन कचऱ्यावर प्रक्रिया होत आहे, ही विशेष बाब होय.

नारेगाव भागातील नागरिकांनी तीन वर्षांपूर्वी कचऱ्याच्या विरोधात आंदोलन केले. त्यामुळे महापालिकेला शहरात कुठेच कचरा टाकण्यासाठी डम्पिंग ग्राऊंड मिळाले नाही. तब्बल चार महिने शहरातील संपूर्ण कचरा मुख्य रस्त्यांवर साचला होता. कचऱ्याचा हा गंभीर प्रश्न महाराष्ट्र शासनाने लक्ष घालून महापालिकेला १६० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला. या निधीतून चिकलठाणा, पडेगाव आणि हर्सूल येथे १५० मेट्रिक टन क्षमतेचे तीन कचरा प्रक्रिया प्रकल्प उभे करण्याचा निर्णय घेण्यात आला. पहिल्या टप्प्यात चिकलठाणा येथील प्रकल्प अत्यंत यशस्वीपणे सुरू करण्यात आला. मागील दीड वर्षापासून या ठिकाणी दररोज १५० मेट्रिक टन कचऱ्यावर प्रक्रिया करण्यात येत आहे. 

पडेगाव येथील बांधकाम संपताच खाजगी कंत्राटदाराने यंत्रणा उभी करून थेट कचऱ्यावर प्रक्रिया करणे सुरू केले. मागील दोन महिन्यांपासून यशस्वीपणे ही प्रक्रिया सुरू असल्याचे महापालिकेतील सूत्रांनी सांगितले. हर्सूल येथील प्रकल्पाला व्यापक प्रमाणात गती देण्यात आली असून, याठिकाणी बांधकाम सुरू केले आहे. या प्रकल्पात कोणी अडथळा आणण्याचा प्रयत्न केल्यास त्यांच्यावर थेट फौजदारी कारवाई करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. हर्सूल येथे १५० मेट्रिक टन क्षमतेचा प्रकल्प सुरू झाल्यास शहराची क्षमता ४५० मेट्रिक टन कचऱ्यावर प्रक्रिया करण्याची होईल.

बायो मिथेन प्रकल्प पूर्णत्वाकडेमहापालिकेने इंदूर शहराच्या धर्तीवर चौथा अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रकल्पही पूर्ण करून ठेवला आहे. शहरात विविध हॉटेल्स आणि भाजीमंडईतील खराब पालेभाज्या आणून त्यावर प्रक्रिया करण्यासाठी बायो मिथेन प्रकल्प नक्षत्रवाडी येथे सुरू करण्यात येणार आहे. या प्रकल्पाची पाहणी काही दिवसांपूर्वीच प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय यांनीही केली होती. लवकरच या प्रकल्पातील ट्रायल घेण्याचे काम सुरू होणार असल्याचे सूत्रांनी नमूद केले. 

टॅग्स :Garbage Disposal Issueकचरा प्रश्नAurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका