शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

३०० टन कचऱ्यावर रोज प्रक्रिया; चिकलठाण्यानंतर पडेगाव येथील कचऱ्याचा ड्रीम प्रोजेक्ट सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2020 19:43 IST

पहिल्या टप्प्यात चिकलठाणा येथील प्रकल्प अत्यंत यशस्वीपणे सुरू करण्यात आला. मागील दीड वर्षापासून या ठिकाणी दररोज १५० मेट्रिक टन कचऱ्यावर प्रक्रिया करण्यात येत आहे. 

औरंगाबाद :  ऐतिहासिक औरंगाबाद शहराची तीन वर्षांपूर्वी कचऱ्यामुळे देशभरातच नव्हे, तर विदेशातही नाचक्की झाली होती. कचरा प्रश्न महापालिकेच्या मुख्य अजेंड्यावर असताना राज्य शासनाकडूनही १०० टक्के आर्थिक मदत मिळाली. त्यामुळे महापालिकेने दीड वर्षापूर्वी चिकलठाणा येथे ३०० मेट्रिक टन क्षमतेचा कचरा प्रक्रिया प्रकल्प सुरू केला. त्यापाठोपाठ आता पडेगाव येथील दीडशे मेट्रिक टन क्षमतेचा प्रकल्प प्रयोगिक तत्त्वावर यशस्वीरीत्या सुरू करण्यात आला आहे. आता शहरात दररोज ३०० मेट्रिक टन कचऱ्यावर प्रक्रिया होत आहे, ही विशेष बाब होय.

नारेगाव भागातील नागरिकांनी तीन वर्षांपूर्वी कचऱ्याच्या विरोधात आंदोलन केले. त्यामुळे महापालिकेला शहरात कुठेच कचरा टाकण्यासाठी डम्पिंग ग्राऊंड मिळाले नाही. तब्बल चार महिने शहरातील संपूर्ण कचरा मुख्य रस्त्यांवर साचला होता. कचऱ्याचा हा गंभीर प्रश्न महाराष्ट्र शासनाने लक्ष घालून महापालिकेला १६० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला. या निधीतून चिकलठाणा, पडेगाव आणि हर्सूल येथे १५० मेट्रिक टन क्षमतेचे तीन कचरा प्रक्रिया प्रकल्प उभे करण्याचा निर्णय घेण्यात आला. पहिल्या टप्प्यात चिकलठाणा येथील प्रकल्प अत्यंत यशस्वीपणे सुरू करण्यात आला. मागील दीड वर्षापासून या ठिकाणी दररोज १५० मेट्रिक टन कचऱ्यावर प्रक्रिया करण्यात येत आहे. 

पडेगाव येथील बांधकाम संपताच खाजगी कंत्राटदाराने यंत्रणा उभी करून थेट कचऱ्यावर प्रक्रिया करणे सुरू केले. मागील दोन महिन्यांपासून यशस्वीपणे ही प्रक्रिया सुरू असल्याचे महापालिकेतील सूत्रांनी सांगितले. हर्सूल येथील प्रकल्पाला व्यापक प्रमाणात गती देण्यात आली असून, याठिकाणी बांधकाम सुरू केले आहे. या प्रकल्पात कोणी अडथळा आणण्याचा प्रयत्न केल्यास त्यांच्यावर थेट फौजदारी कारवाई करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. हर्सूल येथे १५० मेट्रिक टन क्षमतेचा प्रकल्प सुरू झाल्यास शहराची क्षमता ४५० मेट्रिक टन कचऱ्यावर प्रक्रिया करण्याची होईल.

बायो मिथेन प्रकल्प पूर्णत्वाकडेमहापालिकेने इंदूर शहराच्या धर्तीवर चौथा अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रकल्पही पूर्ण करून ठेवला आहे. शहरात विविध हॉटेल्स आणि भाजीमंडईतील खराब पालेभाज्या आणून त्यावर प्रक्रिया करण्यासाठी बायो मिथेन प्रकल्प नक्षत्रवाडी येथे सुरू करण्यात येणार आहे. या प्रकल्पाची पाहणी काही दिवसांपूर्वीच प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय यांनीही केली होती. लवकरच या प्रकल्पातील ट्रायल घेण्याचे काम सुरू होणार असल्याचे सूत्रांनी नमूद केले. 

टॅग्स :Garbage Disposal Issueकचरा प्रश्नAurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका