शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
5
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
6
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
7
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
8
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
9
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
10
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
11
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
12
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
13
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
14
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
15
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
16
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
17
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
18
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
19
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
20
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...

राजकीय चर्चांचा रोजचा ‘बस’ प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2019 00:24 IST

समस्याच समस्या; दुष्काळामुळे परेशान बीड -गेवराई- बीड 70 किमी सतीश जोशी । लोकमत न्यूज नेटवर्क बीड : बीड लोकसभा मतदार ...

ठळक मुद्दे३ विधानसभा मार्ग । ११६ किमी प्रवास । एसटीच्या लाल डब्यात बसून ‘लोकमत’ प्रतिनिधीने जाणून घेतले जनतेचे ‘मत’

समस्याच समस्या; दुष्काळामुळे परेशानबीड-गेवराई-बीड70 किमीसतीश जोशी ।लोकमत न्यूज नेटवर्कबीड : बीड लोकसभा मतदार संघात पाहिजे तसा जोर पकडला नाही. जिकडे तिकडे दुष्काळाचे सावट निवडणुकीच्या प्रचारावर घोंगावते आहे. पिण्यास पाणी नाही, जनावरांच्या चारापाण्याचा प्रश्न, खरीप आणि रबी दोन्हीही हंगाम हातचे गेल्यामुळे ग्रामीण भागात भयावह परिस्थिती असल्याचे प्रवाशांशी झालेल्या चर्चेत जाणवले.ग्रामीण भागातील निवडणुकीचे चित्र जाणून घेण्यासाठी बीड ते गेवराई आणि गेवराई ते बीड असा एसटी महामंडळाच्या लालपरीतून गेवराई विधानसभा मतदार संघाचा प्रवास केला. गेवराईपर्यंत राष्टÑीय महामार्गाचे काम अंतिम टप्प्यात असल्यामुळे रस्ता एकदम गुळगुळीत असल्यामुळे अजिबात धक्के जाणवले नाही परंतु, निवडणुकीचा जेव्हा विषय काढला तेव्हा ग्रामीण भागात भोगत असलेल्या असुविधांचे धक्क्यावर धक्के बसत होते. कशाची निवडणूक आणि कशाचे काय साहेब? सारेच पक्ष सारखे. शेतकऱ्यांचे प्रश्न आहे तसेच राहणार, असे सांगत प्रवासी दादासाहेब मोरे यांनी दुष्काळामुळे शेतकऱ्यांचे आणि जनावरांचे कसे हाल होत आहेत, हे सांगितले.

शेतक-याला जगविणारं सरकार पाहिजेबीड ते कचारवाडी24 किमीअनिल भंडारी ।लोकमत न्यूज नेटवर्कबीड : कशाचं समाधान, औंदा दुष्काळामुळे चिपटंभर दाना मिळाला, कापूस वाया गेला, जनावरांचे हाल आहेत. आरोग्य, पाण्याची वाईट परिस्थिती आहे. शहराकडंच सरकारचं लक्ष हाय, खेड्याकडं कोण पाहतंय, शेतकºयाला जगविणारे सरकार पाहिजे, अशी एकमुखी अपेक्षा बीड मतदार संघातील ग्रामीण मतदारांनी लोकमतजवळ व्यक्त केली.लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बीड ते कचारवाडी प्रवासात नागझरी, जाधववाडी, विठ्ठलवाडी, बेलखंडी, पाटोदा, मेंगडेवाडी, पिंपळवाडी येथील प्रवाशांशी लोकमतने संवाद साधला. या भागात पिण्याच्या पाण्याची मोठी योजना नसल्याने टंचाईचा नेहमी प्रश्न असतो. सध्या वस्त्यांवरच पाणी मिळतंय, गावात टॅँकर येत नसल्याचे प्रवासी महिलेने सांगितले. विठ्ठलवाडीत पाण्याची योजना, नीट रस्ता नाही, खेड्याकडं पाहयला नेत्यांना वेळच नाही, असे कांताबाई नैराळे, साहेबराव नैराळे म्हणाले. अनुदान कमी मिळाल,असे मारुती वनवे बोलत होते.या लोकांना उपचारासाठी बीडलाच यावे लागते, माणसाचं जसं तसंच जनावरांचं आहे. खाजगी डॉक्टरांकडंच जावं लागतं, असे प्रवासी सांगत होते. तुम्ही समाधानी आहात का? असा प्रश्न केला तेव्हा कशाचं समाधान ? खरीप गेला, रबी गेला, काही मिळालं नाही असे पाटोद्याचे बाबूराव शेळके म्हणाले. ओझे घेऊन लेकरांना पाच किलोमीटर लांब शाळेत जावे लागते. शिक्षणासाठी बीडला बसची सोय अपुरी आहे. जादा बस व सुरक्षेची गरज असल्याचे पल्लवी आणि दीपाली उबाळे म्हणाल्या.विकासाबरोबर उद्योग, तरुणांना रोजगार हवाधारूर ते तेलगाव22 किमीअनिल महाजन ।लोकमत न्यूज नेटवर्कधारुर : लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. धारुर ते तेलगाव प्रवासात माजलगाव मतदारसंघातील मतदारांच्या भावना जाणून घेतल्या. पाच वर्षांमध्ये विकासाला एक दिशा मिळाली आहे. विकास नाकारता येणार नाही असे काही प्रवासी म्हणाले. रस्ता, रेल्वे किंवा ग्रामीण रस्त्याचे प्रश्न सोडवताना तरुणांना नोकरी, उद्योग, व्यवसायाची जोड लावून दिली असती तर सरकारचे यश आणखी दिसून आले असते अशा भावना काही प्रवाशांनी व्यक्त केल्या.रेल्वेचे काम पूर्ण झाले असते तर विकासाला नवी दिशा मिळाली असती. डोंगरपट्ट्यातील धारुर राष्ट्रीय महामार्गावर आल्याने या भागात उद्योगाला चालना, तरुणांना रोजगार मिळण्याची संधी निर्माण झाली आहे. येथील ऐतिहासिक स्थळांचा विकास व्हावा , असेही काही प्रवासी म्हणाले. या भागातील ऊसतोड कामगारांची संख्या थोपवायची असेल केंद्राकडून विशेष उद्योग उभारणे गरजेचे आहे. सीताफळ प्रक्रिया उद्योगाबरोबर शेतकऱ्यांना मार्गदर्शनाचीही जोड देणे गरजेचे आहे अशी भावना प्रवाशांनी व्यक्त केली.

टॅग्स :BeedबीडLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक