शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

राजकीय चर्चांचा रोजचा ‘बस’ प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2019 00:24 IST

समस्याच समस्या; दुष्काळामुळे परेशान बीड -गेवराई- बीड 70 किमी सतीश जोशी । लोकमत न्यूज नेटवर्क बीड : बीड लोकसभा मतदार ...

ठळक मुद्दे३ विधानसभा मार्ग । ११६ किमी प्रवास । एसटीच्या लाल डब्यात बसून ‘लोकमत’ प्रतिनिधीने जाणून घेतले जनतेचे ‘मत’

समस्याच समस्या; दुष्काळामुळे परेशानबीड-गेवराई-बीड70 किमीसतीश जोशी ।लोकमत न्यूज नेटवर्कबीड : बीड लोकसभा मतदार संघात पाहिजे तसा जोर पकडला नाही. जिकडे तिकडे दुष्काळाचे सावट निवडणुकीच्या प्रचारावर घोंगावते आहे. पिण्यास पाणी नाही, जनावरांच्या चारापाण्याचा प्रश्न, खरीप आणि रबी दोन्हीही हंगाम हातचे गेल्यामुळे ग्रामीण भागात भयावह परिस्थिती असल्याचे प्रवाशांशी झालेल्या चर्चेत जाणवले.ग्रामीण भागातील निवडणुकीचे चित्र जाणून घेण्यासाठी बीड ते गेवराई आणि गेवराई ते बीड असा एसटी महामंडळाच्या लालपरीतून गेवराई विधानसभा मतदार संघाचा प्रवास केला. गेवराईपर्यंत राष्टÑीय महामार्गाचे काम अंतिम टप्प्यात असल्यामुळे रस्ता एकदम गुळगुळीत असल्यामुळे अजिबात धक्के जाणवले नाही परंतु, निवडणुकीचा जेव्हा विषय काढला तेव्हा ग्रामीण भागात भोगत असलेल्या असुविधांचे धक्क्यावर धक्के बसत होते. कशाची निवडणूक आणि कशाचे काय साहेब? सारेच पक्ष सारखे. शेतकऱ्यांचे प्रश्न आहे तसेच राहणार, असे सांगत प्रवासी दादासाहेब मोरे यांनी दुष्काळामुळे शेतकऱ्यांचे आणि जनावरांचे कसे हाल होत आहेत, हे सांगितले.

शेतक-याला जगविणारं सरकार पाहिजेबीड ते कचारवाडी24 किमीअनिल भंडारी ।लोकमत न्यूज नेटवर्कबीड : कशाचं समाधान, औंदा दुष्काळामुळे चिपटंभर दाना मिळाला, कापूस वाया गेला, जनावरांचे हाल आहेत. आरोग्य, पाण्याची वाईट परिस्थिती आहे. शहराकडंच सरकारचं लक्ष हाय, खेड्याकडं कोण पाहतंय, शेतकºयाला जगविणारे सरकार पाहिजे, अशी एकमुखी अपेक्षा बीड मतदार संघातील ग्रामीण मतदारांनी लोकमतजवळ व्यक्त केली.लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बीड ते कचारवाडी प्रवासात नागझरी, जाधववाडी, विठ्ठलवाडी, बेलखंडी, पाटोदा, मेंगडेवाडी, पिंपळवाडी येथील प्रवाशांशी लोकमतने संवाद साधला. या भागात पिण्याच्या पाण्याची मोठी योजना नसल्याने टंचाईचा नेहमी प्रश्न असतो. सध्या वस्त्यांवरच पाणी मिळतंय, गावात टॅँकर येत नसल्याचे प्रवासी महिलेने सांगितले. विठ्ठलवाडीत पाण्याची योजना, नीट रस्ता नाही, खेड्याकडं पाहयला नेत्यांना वेळच नाही, असे कांताबाई नैराळे, साहेबराव नैराळे म्हणाले. अनुदान कमी मिळाल,असे मारुती वनवे बोलत होते.या लोकांना उपचारासाठी बीडलाच यावे लागते, माणसाचं जसं तसंच जनावरांचं आहे. खाजगी डॉक्टरांकडंच जावं लागतं, असे प्रवासी सांगत होते. तुम्ही समाधानी आहात का? असा प्रश्न केला तेव्हा कशाचं समाधान ? खरीप गेला, रबी गेला, काही मिळालं नाही असे पाटोद्याचे बाबूराव शेळके म्हणाले. ओझे घेऊन लेकरांना पाच किलोमीटर लांब शाळेत जावे लागते. शिक्षणासाठी बीडला बसची सोय अपुरी आहे. जादा बस व सुरक्षेची गरज असल्याचे पल्लवी आणि दीपाली उबाळे म्हणाल्या.विकासाबरोबर उद्योग, तरुणांना रोजगार हवाधारूर ते तेलगाव22 किमीअनिल महाजन ।लोकमत न्यूज नेटवर्कधारुर : लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. धारुर ते तेलगाव प्रवासात माजलगाव मतदारसंघातील मतदारांच्या भावना जाणून घेतल्या. पाच वर्षांमध्ये विकासाला एक दिशा मिळाली आहे. विकास नाकारता येणार नाही असे काही प्रवासी म्हणाले. रस्ता, रेल्वे किंवा ग्रामीण रस्त्याचे प्रश्न सोडवताना तरुणांना नोकरी, उद्योग, व्यवसायाची जोड लावून दिली असती तर सरकारचे यश आणखी दिसून आले असते अशा भावना काही प्रवाशांनी व्यक्त केल्या.रेल्वेचे काम पूर्ण झाले असते तर विकासाला नवी दिशा मिळाली असती. डोंगरपट्ट्यातील धारुर राष्ट्रीय महामार्गावर आल्याने या भागात उद्योगाला चालना, तरुणांना रोजगार मिळण्याची संधी निर्माण झाली आहे. येथील ऐतिहासिक स्थळांचा विकास व्हावा , असेही काही प्रवासी म्हणाले. या भागातील ऊसतोड कामगारांची संख्या थोपवायची असेल केंद्राकडून विशेष उद्योग उभारणे गरजेचे आहे. सीताफळ प्रक्रिया उद्योगाबरोबर शेतकऱ्यांना मार्गदर्शनाचीही जोड देणे गरजेचे आहे अशी भावना प्रवाशांनी व्यक्त केली.

टॅग्स :BeedबीडLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक