शहरं
Join us  
Trending Stories
1
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
2
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
3
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
4
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
5
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
6
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
7
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
8
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
9
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
10
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
11
Ahmedabad Plane Crash: कॅप्टन सुमित सभरवाल यांच्यावर अंत्यसंस्कार!
12
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
13
Ahmedabad Plane Crash: एअर होस्टेस मैथिली पाटील हिला साश्रुनयनांनी अखेरचा निरोप
14
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
15
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
16
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
17
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
18
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
19
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
20
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!

पावसा अभावी पिके करपली; पंचनामे करण्याच्या मागणीसाठी शेतकर्‍यांचे आडस येथे रास्तारोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2018 18:24 IST

अत्यल्प पर्जन्यमान झाल्याने खरीपाच्या पिकांचे नुकसान झाले आहे. यातील नुकसानीचे तात्काळ पंचनामे करण्यात यावेत. या मागणीसाठी आडस येथील शिवाजी महाराज चौकात रास्तारोको केले. 

केज (बीड ) : तालुक्यातील होळ महसूल मंडळात अत्यल्प पर्जन्यमान झाल्याने खरीपाच्या पिकांचे नुकसान झाले आहे. खरीपाच्या पिकांची पाहणी करून तात्काळ नुकसानीचे पंचनामे करण्यात यावेत. या मागणीसाठी आडस येथील शिवाजी महाराज चौकात आज सकाळी साडेनऊ वाजता शेतकऱ्यांनी रास्तारोको केले. 

तालुक्यातील होळ महसूल मंडळात पर्जन्यमान कमी झाल्याने टंचाईग्रस्त परिस्थिती निर्माण झाली आहे. थोड्याफार पडलेल्या पावसावर कशाबश्या खरीपाच्या पेरण्या करण्यात आल्या. मात्र पेरणीनंतर एक महिना संपला तरी पाऊस न पडल्याने या भागातील​ खरीपाची कापुस, सोयाबीन, तूर, मूग, बाजरी व मका ही कोवळी पिक पावसाअभावी करपली आहेत, तर कांही पिकांची वाढ खुंटली आहे. पाऊस नसल्याने जनावरांच्या चाऱ्याचा व पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. पाऊस नसल्याने पाणी पातळी खोल गेल्याने पाणी टंचाई निर्माण झाली आहे. यामुळे परीसरातील शेतकर्‍यांनी बैलगाड्या रस्त्यावर सोडून आज आडस येथील शिवाजी महाराज चौकात सकाळी एक तास रास्तारोको आंदोलन केले. 

शेतकर्‍यांनी आपल्या मागण्यांचे निवेदन नायब तहसीलदार नायब तहसीलदार एन.एम. शेख यांना देऊन रास्तारोको आंदोलन मागे घेतले. आंदोलनात रमेश आडसकर, राम माने, सरपंच बालासाहेब ढोले, उपसरपंच ओमकार आकुसकर, शिवरूद्र आकुसकर, बाळासाहेब देशमुख, राजेभाऊ पत्रवाळे, विकास काशिद, रमेश ढोले,  गफार पठाण, शिवाजी खडके, शाम गंगात्रे यांच्यासह परीसरात शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

टॅग्स :FarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्रRainपाऊसagitationआंदोलन