शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
4
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
5
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
6
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
7
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
8
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
9
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
10
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
11
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
12
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
13
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
14
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
15
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
16
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
17
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
18
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
19
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus: शहरवासीयांना नाही जमले ते ग्रामस्थांनी मनावर घेतले; संचारबंदीचे ग्रामीण भागात गांभीर्याने पालन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2020 14:53 IST

संचरबंदी काळात ग्रामस्थ घराच्या बाहेर पडत नसल्याचे चित्र

ठळक मुद्देस्वयंशिस्तीने करतायत संचारबंदीचे पालनपोलीस नसतानाही घरा बाहेर पडणे टाळतात

माजलगाव : कोरोनाची दिवसेंदिवस परिस्थिती गंभीर होत असताना मात्र शहरातील नागरिकांना याचे गांभीर्य नसून संचारबंदी असतानादेखील ते रस्त्यावर दिसत असून याउलट ग्रामीण भागातील नागरिकांना याचे गांभीर्य दिसून येत असल्याने ते घरातून बाहेर पडत नसल्याचे चित्र दिसून येत आहे.

भारतात अनेक राज्यांसह महाराष्ट्रात कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस झपाट्याने वाढ होत असताना व शासनाने संचारबंदी लावलेली असताना माजलगाव शहरातील नागरिक मात्र या संचार बंदीची दखल घेत नसून ते या काळात विनाकारण घराबाहेर पडत असल्याचे चित्र मागील तीन-चार दिवसांपासून पाहावयास मिळत आहे. नागरिकांच्या अशा वागण्यामुळे प्रशासन व पोलिसांवरील ताण वाढतांना दिसून येत आहे. संचारबंदी शिथिलच्या काळात फळ भाजीपालावाले एकदम जवळ जवळ बसत असून ते  गर्दीही जमवताना पाहावयास मिळत आहेत. त्यामुळे प्रशासनाला यांना उठवण्यात वेळ जात आहे. तर काही व्यापारी आपले दुकान अत्यावश्यक सेवेत येत नसतानाही दुकान उघडून बसलेले दिसून येत होते. या सर्व दुकाना बंद करण्यास सांगताना प्रशासनाची दमछाक होत आहे.        याउलट ग्रामीण भागातील परिस्थिती असून या ठिकाणचे नागरिक घरा बाहेर जाण्याचे टाळत आहेत. विशेष म्हणजे ग्रामीण भागातील बोटावर मोजण्याइतके गाव वगळता अनेक गावात पोलिस बंदोबस्त नसतानादेखील नागरिक सतर्क राहत आहेत. व ते बाहेर पडण्याचे टाळत आहेत.

नागरिकांनी गर्दी टाळावी संचारबंदी शिथीलच्या काळात व्यापाऱ्यांनी गर्दी जमु नये यासाठी दुकानासमोर एक रेषा मारून त्या रेषेतुनच एक एक ग्राहकांना सामान दिले पाहिजे.नागरिकांनी कोणत्याही किंमतीत  गर्दी टाळली पाहिजे व आपणच आपल्याला  एकमेकांपासून वेगळे केले पाहिजे.-- डॉ. प्रतिभा गोरे, तहसीलदार माजलगाव

नियम मोडल्यास गुन्हे दाखल करणारसंचार बंदीच्या काळात नागरिकांनी घरातच थांबावे विनाकारण रस्त्यावर येऊ नये . नागरिकांना सांगून  सांगून देखील ते ऐकत नसतील तर त्यांना चोप दिल्याशिवाय आमच्यासमोर पर्याय राहणार नाही व वेळ प्रसंगी गुन्हे देखील दाखल करण्यात येतील. तरी नागरिकांनी सबुरीने घेण्याची गरज आहे.- श्रीकांत डिसले ,उपविभागीय पोलीस अधिकारी , माजलगाव

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसBeedबीड