शहरं
Join us  
Trending Stories
1
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
2
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
3
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
4
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
5
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
6
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
7
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
8
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
9
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
10
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
11
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
12
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
13
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
14
भारताच्या शेजारील देश भूकंपाने हादरला; म्यानमारमध्ये ४.० तीव्रतेचा भूकंप, भारतावरही परिणाम?
15
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
16
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही
17
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
18
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ
19
YouTube वरून पैसे कमवायचे आहेत? मग ‘या’ महत्त्वाच्या अटी पूर्ण करा, लगेच सुरू होईल कमाई!
20
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...

CoronaVirus : सुखद ! लॉकडाऊनमुळे उदयपूरमध्ये अडकलेले सहा नवोदित शिल्पकार परतले; थेट गावी जाणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2020 16:01 IST

राज्यातील सहा जिल्ह्यातील अकरा नवोदीत शिल्पकार राजस्थानमधील उदयपूर येथे लॉकडाऊन दरम्यान अडकले होते

ठळक मुद्देलोकमतने वृत्त केले होते प्रकाशित

 - अनिल महाजनधारूर : राजस्थान मधील उदयपूर येथे झालेल्या राष्ट्रीय कला प्रदर्शनस गेलेले महाराष्ट्रातील सहा जिल्ह्यातील  11 नवोदीत शिल्पकार  लाॕकडाऊनमुळे अडकले होते. तब्बल दिड महिन्यानंतर त्यांना सर्वांना घरी परतण्याची संधी मिळाली  असून राज्य शासनाने त्यांना आणण्याची सोय केली. दोन गट करून त्यांना आणण्यात आले असून ते आज आपल्या गावी पोहचतील. दरम्यान, शिल्पकार अडकल्याबाबत 'लोकमत'ने वृत्त प्रकाशित केल्यामुळे घरी परण्याचा आनंद लवकर घेता आल्याचे त्यांनी आवर्जून सांगीतले .

महाराष्ट्र राज्यातील अकरा शिल्पकार राजस्थान येथे केंद्र सरकारच्या शिल्पग्राम उदयपूर येथे फायबर  प्रोजेक्टच्या निमित्त गेले आहेत. फायबर प्रोजेक्ट सुरवात 3  मार्च ते 23 मार्च पर्यंत होते ते संपल्या वर    त्याना 24 मार्चचे   विमानाची तिकीट बुकिंग केली होती पण 23 मार्च  ला राञी 12 वाजता देशात  लॅाकडाउन केल्यामुळे तिकीट कॕन्सल करण्यात  आले त्यामुळे त्यांना परत येता आले नाही  . राजस्थान उदयपूर येथे जे अकरा जण होते ते राज्यातील विविध जिल्हयातील आहेत .  यामध्ये  सुधीर उमाप ( बीड ) ,किरण भोईर (नाशिक ) वरूण भोईर ( नाशिक ), नहर्ष पाटील (धुळे ) अभिषेक साळवे(अ.नगर ), प्रदीप कुंभार (कोल्हापूर ), बीरदेव एडके (कोल्हापूर) ,अभिषेक कुंभार (कोल्हापूर), संदीप वडगेंकर (कोल्हापूर),  सुमेध सावंत (रत्नागिरी ) ,आकाश तीरिमल (मुंबई ) यांचा समावेश आहे 

शिल्पप्रदर्शन संपून महिना उलटलाप्रदर्शन संपून लॉकडाऊनमध्ये अडकलेला महिना उलटला. यामुळे सर्वांना घराची ओढ लागली होती. येथे राहणे व जेवणाची सोय होती माञ दिवस काढणे अवघड जात होते. दै.लोकमतमध्ये वृत्त प्रकाशीत होताच उदयपूरच्या जिल्हाधिकारी आनंदीजी यांना परिस्थिती लक्षात आणूण दिली. त्यानंतर त्यांनी सर्व परिस्थिती जाणूण घेत नाशिक, धुळे, अहमदनगर व बीडच्या सहा जणांचा एक गट तर कोल्हापूर, रत्नागिरी येथील शिल्पकारांचा दुसरा गट करून महाराष्ट्रात येण्याची व्यवस्था केली. मंगळवारी हे नवोदीत शिल्पकार आपल्या घरी पोहचले. यावेळी त्यांच्या कुटुंबांनी समाधान व्यक्त केले.

चार राज्यांचे कला व संस्कृतीचे दर्शन घडवणारे केंद्रउदयपूर शहरापासून चार किमी वर राजस्थान सरकार केंद्रशासनाचे मदतीने साठ ते सत्तर एक्कर मध्ये हे शिल्प ग्राम असून महाराष्ट्र गुजरात राजस्थान व गोवा या चार राज्याचे संस्कृतीचे दर्शन येथे आहे मुंबईतील गणेशउत्सवाचे शिल्प तयार करण्या साठी या निमंञीत शिल्पकाराांना येथे बोलवण्यात आले होते. मातीकाम संपले होते फक्त फायबरचे काम शिल्लक राहीले आहेत. ते इतर राज्यातील कलाकार करणार आहेत.यांचे मांडणी साठी पुन्हा जावे लागणार आहे असे नवोदीत शिल्पकार सुधिर उमाप यांनी सांगीतले.