शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus: कुटुंब रमलंय अन्नसेवेत; पोलीस अन् गरजूंसाठी रोज ३५० जेवणाचे डबे अन् गरमागरम चहा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2020 15:54 IST

संचारबंदी व जमावबंदी लागू झाल्यानंतर पोलीस प्रशासनातील कर्मचाऱ्याच्या कामकाजाची वेळ वाढली आहे. खानावळी बंद असल्यामुळे त्यांचे जेवणाचे हाल होण्याची शक्यता होती.

ठळक मुद्देबीड शहरातील पोलीस कर्मचारी व गरजूंसाठी समाजिक कार्यकर्ते सरसावले आहेत.निल जगताप व त्यांच्या कुटुंबियांकडून दररोज पोलीस कर्मचाऱ्यांना व गरजूंना जेवणाचे ३५० पेक्षा अधिक डबे पुरवले जातात.

बीड :  कोरोना संसर्ग टाळण्यासाठी नागरिकांनी गर्दी करू नये नियमांचे पालन करावे यासाठी पोलीस प्रशासन चोवीस तास कर्तव्य बजावत आहे. दरम्यान बीड शहरातील पोलीस कर्मचारी व गरजूंसाठी समाजिक कार्यकर्ते सरसावले असून, दररोज दुपारी जेवणाचे ३५० डबे पोलीस कर्मचारी व गरजू व्यक्तींना दिले जातात. तर, एका कुटुंबाकडून दिवसभराचा क्षीण घालवण्यासाठी ५ वाजता चहाची व्यवस्था केली आहे. 

शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख अनिल जगताप व त्यांच्या कुटुंबियांकडून दररोज पोलीस कर्मचाऱ्यांना व गरजूंना जेवणाचे ३५० पेक्षा अधिक डबे पुरवले जातात. यासाठी जगताप यांनी नियोजन केले असून, या कामात त्यांचे  कुटुंबातील सदस्य मदत करतात, तर डबे पोहचवण्याचे कामं हितेश बुद्धदेव, किशोर जगताप, विजय जगताप व आकाश जगताप हे करतात. संचारबंदी व जमावबंदी लागू झाल्यानंतर पोलीस प्रशासनातील कर्मचाऱ्याच्या कामकाजाची वेळ वाढली आहे. दरम्यान अनेक कर्मचाऱ्यांची जेवणाची व्यवस्था ही मेसवर आहे. मात्र, या कालवधीत खानावळी बंद असल्यामुळे जेवणाचे हाल होण्याची शक्यता होती. दरम्यान हीच गरज ओळखून अनिल जगताप यांनी तात्काळ ३५० पेक्षा जास्त जेवणाचे डबे विकत घेतले व ज्या ठिकाणी पोलीस कर्मचारी कर्तव्यावर आहेत. त्यांना आग्रह करून जेऊ घालण्याचे कामं सुरु केले. संचारबंदी उठेपर्यंत जेवणाची व्यवस्था केली जाईल अशी प्रतिक्रिया अनिल जगताप यांनी दिली. 

दरम्यान लॉकडाऊन झाल्यानंतर आपण पण सामाजिक भान राखत काहीतरी केले पाहिजे या भावनेने शहरातील संध्या राजेंद्र गुगळे व नीधी राजेंद्र गुगळे या माय-लेकी दररोज ५ ते ६.३० वाजण्याच्या दरम्यान, बीड शहरातील पोलीस मुख्यालय तसेच गस्तीवर असलेले पोलीस कर्मचारी व चौका-चौकात बंदोबस्तावर तैनात कर्मचाऱ्यांची जागेवर चहाची व्यवस्था केली. 

ही संकल्पना त्यांचे पती राजेंद्र गुगळे यांची होती. मात्र, हे कामं करताना पोलीस प्रशासनाच्या कामाचा आम्हाला अंदाज होत आहे. कारण पोलीस हे जनतेचे संरक्षण करत आहेत. आपण सर्वांनी त्यांच्या सुचनांचे पालन करून घरी बसले पाहिजे व नियमांचे पालन केले पाहिजे असे त्या म्हणाल्या. दरम्यान इतर जिल्ह्यातून आलेल्या निराधारांना आधार देण्यासाठी अनेक सामाजिक संघना पुढे सरसावत आहेत.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसCoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्याShiv SenaशिवसेनाPoliceपोलिस