शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर पाकिस्तान जगाच्या नकाशावरही दिसणार नाही"; एकनाथ शिंदे यांचे सडेतोड वक्तव्य
2
Robert Prevost: काल काळा धूर, आज पांढरा बाहेर पडला; अमेरिकेचे रॉबर्ट प्रीव्होस्ट बनले नवे पोप
3
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
4
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
5
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
6
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाचा भडका? युद्धकाळात या गोष्टी टाळा, या गोष्टी करा   
7
भारताचे पाकिस्तानवर जोरदार हल्ले; लाहोर, सियालकोट, फैसलाबादमधील संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त
8
India Pakistan War: पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या घरापासून २० किमी अंतरावर स्फोट
9
'मी माझ्या देशात, मला कशाची भीती...', सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकाचा व्हिडिओ व्हायरल
10
पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारताकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाणार, एस जयशंकर यांचे मोठे विधान
11
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानने दहशतवादाला पाठिंबा देणं थांबवावं, भारताच्या कारवाईदरम्यान अमेरिकेने सुनावले
12
मोदी सरकारचा पाकिस्तानवर 'सोशल मीडिया'वार! भारताकडून ८ हजार एक्स अकाऊंट बंद
13
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
14
JF 17 लढाऊ विमानासह हद्दीत घुसलेला पायलट भारताच्या ताब्यात
15
नियंत्रण रेषेवर गोळीबार, एकमेकांवर क्षेपणास्त्र हल्ले, भारत-पाकिस्तानमध्ये युद्धाला तोंड फुटलंय की...
16
पठाणकोट, राजौरीमध्ये दहशतवाद्यांनी खरंच आत्मघाती हल्ला केला का? भारतीय लष्कराने दिली माहिती
17
पाकिस्तानने अमेरिका, चीनचे नाक कापले! भारताने जैसलमेरमध्ये आणखी एक एफ-१६ पाडले
18
India Pakistan War: 'आताच लाहोर सोडा', अमेरिकेने पाकिस्तानात राहणाऱ्या नागरिकांना सूचना दिल्या
19
लढाऊ विमाने पाकिस्तानवर हल्ल्यासाठी झेपावली; पाकिस्तानी AWACS विमान उडविले, लाहोरकडे कूच
20
India Pakistan War : पाकिस्तानने कुपवाडा, बारामुल्लामध्ये केला हल्ला; लोकांना सुरक्षित ठिकाणी पाठवले

CoronaVirus: कुटुंब रमलंय अन्नसेवेत; पोलीस अन् गरजूंसाठी रोज ३५० जेवणाचे डबे अन् गरमागरम चहा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2020 15:54 IST

संचारबंदी व जमावबंदी लागू झाल्यानंतर पोलीस प्रशासनातील कर्मचाऱ्याच्या कामकाजाची वेळ वाढली आहे. खानावळी बंद असल्यामुळे त्यांचे जेवणाचे हाल होण्याची शक्यता होती.

ठळक मुद्देबीड शहरातील पोलीस कर्मचारी व गरजूंसाठी समाजिक कार्यकर्ते सरसावले आहेत.निल जगताप व त्यांच्या कुटुंबियांकडून दररोज पोलीस कर्मचाऱ्यांना व गरजूंना जेवणाचे ३५० पेक्षा अधिक डबे पुरवले जातात.

बीड :  कोरोना संसर्ग टाळण्यासाठी नागरिकांनी गर्दी करू नये नियमांचे पालन करावे यासाठी पोलीस प्रशासन चोवीस तास कर्तव्य बजावत आहे. दरम्यान बीड शहरातील पोलीस कर्मचारी व गरजूंसाठी समाजिक कार्यकर्ते सरसावले असून, दररोज दुपारी जेवणाचे ३५० डबे पोलीस कर्मचारी व गरजू व्यक्तींना दिले जातात. तर, एका कुटुंबाकडून दिवसभराचा क्षीण घालवण्यासाठी ५ वाजता चहाची व्यवस्था केली आहे. 

शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख अनिल जगताप व त्यांच्या कुटुंबियांकडून दररोज पोलीस कर्मचाऱ्यांना व गरजूंना जेवणाचे ३५० पेक्षा अधिक डबे पुरवले जातात. यासाठी जगताप यांनी नियोजन केले असून, या कामात त्यांचे  कुटुंबातील सदस्य मदत करतात, तर डबे पोहचवण्याचे कामं हितेश बुद्धदेव, किशोर जगताप, विजय जगताप व आकाश जगताप हे करतात. संचारबंदी व जमावबंदी लागू झाल्यानंतर पोलीस प्रशासनातील कर्मचाऱ्याच्या कामकाजाची वेळ वाढली आहे. दरम्यान अनेक कर्मचाऱ्यांची जेवणाची व्यवस्था ही मेसवर आहे. मात्र, या कालवधीत खानावळी बंद असल्यामुळे जेवणाचे हाल होण्याची शक्यता होती. दरम्यान हीच गरज ओळखून अनिल जगताप यांनी तात्काळ ३५० पेक्षा जास्त जेवणाचे डबे विकत घेतले व ज्या ठिकाणी पोलीस कर्मचारी कर्तव्यावर आहेत. त्यांना आग्रह करून जेऊ घालण्याचे कामं सुरु केले. संचारबंदी उठेपर्यंत जेवणाची व्यवस्था केली जाईल अशी प्रतिक्रिया अनिल जगताप यांनी दिली. 

दरम्यान लॉकडाऊन झाल्यानंतर आपण पण सामाजिक भान राखत काहीतरी केले पाहिजे या भावनेने शहरातील संध्या राजेंद्र गुगळे व नीधी राजेंद्र गुगळे या माय-लेकी दररोज ५ ते ६.३० वाजण्याच्या दरम्यान, बीड शहरातील पोलीस मुख्यालय तसेच गस्तीवर असलेले पोलीस कर्मचारी व चौका-चौकात बंदोबस्तावर तैनात कर्मचाऱ्यांची जागेवर चहाची व्यवस्था केली. 

ही संकल्पना त्यांचे पती राजेंद्र गुगळे यांची होती. मात्र, हे कामं करताना पोलीस प्रशासनाच्या कामाचा आम्हाला अंदाज होत आहे. कारण पोलीस हे जनतेचे संरक्षण करत आहेत. आपण सर्वांनी त्यांच्या सुचनांचे पालन करून घरी बसले पाहिजे व नियमांचे पालन केले पाहिजे असे त्या म्हणाल्या. दरम्यान इतर जिल्ह्यातून आलेल्या निराधारांना आधार देण्यासाठी अनेक सामाजिक संघना पुढे सरसावत आहेत.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसCoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्याShiv SenaशिवसेनाPoliceपोलिस